शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांचा औरंगाबादेत भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 11:18 IST

‘एमपीएससी’तील सर्व पदांची प्रतीक्षा यादी जाहीर करा, ‘पीएसआय’ची स्वतंत्र पूर्व परीक्षा घ्या, खाजगी संस्थांवरील शिक्षक भरती शासनाने करावी, परीक्षा शुल्कांवरील जीएसटी रद्द करावी, कंत्राटी पदभरती धोरण रद्द करा, रिक्त जागा भरा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.६) काढण्यात आलेल्या मोर्चात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयाचा मार्ग दणाणून गेला.

ठळक मुद्देआंदोलन : घोषणांनी शहर दणाणले

औरंगाबाद : ‘एमपीएससी’तील सर्व पदांची प्रतीक्षा यादी जाहीर करा, ‘पीएसआय’ची स्वतंत्र पूर्व परीक्षा घ्या, खाजगी संस्थांवरील शिक्षक भरती शासनाने करावी, परीक्षा शुल्कांवरील जीएसटी रद्द करावी, कंत्राटी पदभरती धोरण रद्द करा, रिक्त जागा भरा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.६) काढण्यात आलेल्या मोर्चात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयाचा मार्ग दणाणून गेला.

जय भगवान महासंघ महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीतर्फे सकाळी ११ वाजता हा मोर्चा काढण्यात आला. राज्यात गेल्या काही वर्षांपासून रिक्त पदे भरली जात नसल्याने स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना नोकरीसाठी नुसती वाट बघावी लागत आहे. याविषयी विद्यार्थ्यांनी मोर्चाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.

‘तलाठी ३०८४ पदाची रिक्त पदे भरावी’, ‘जिल्हा परिषदेची एकही शाळा बंद करू नये’, ‘परीक्षेत बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी’, ‘३० टक्के नोकर भरती कपातीचे धोरण रद्द करावे, अशा विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले. विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, जय भगवान महासंघ विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष राज आव्हाड, सचिन डोईफोडे, बाबा मिसाळ, विशाल सानप, योगेश जाधव आदींची उपस्थिती होती. विभागीय आयुक्तालयासमोरील मैदानावर जोरदार घोषणाबाजीने मोर्चाची सांगता झाली. समितीतर्फे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन देण्यात आले.

५०० स्वयंसेवकांची फौजमोर्चा शांततेत आणि सुरळीत पार पडावा, यासाठी ५०० स्वयंसेवकांची फौज प्रयत्नशील होती. विशेषत: विद्यार्थिनींना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. वॉकीटॉकीच्या मदतीने संपर्क साधून स्वयंसेवक वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, मोर्चाची शिस्त बिघडणार नाही, याची प्रामुख्याने काळजी घेत होते.

विद्यार्थ्यांना पाणी वाटपमोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी विविध संस्थांकडून पाणी, बिस्किटांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. पाण्याचे पाऊच, वाटलेली पत्रके रस्त्यावर पडत होती. हे पाहून अनेकांची हाते हा कचरा दूर करण्यासाठी सरसावली.

हजारोंचा सहभागपहिल्यांदाच मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधले. तीन हजारांवर विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. गर्दीमुळे क्रांतीचौकाकडे येणारी वाहतूक वळविण्यात आली होती.

अन्य काही मागण्याराज्यात शिक्षकांची रिक्त २३,४३५ पदे केंद्रीय पद्धतीने अभियोगितेद्वारे भरावी.जि.प.,जलसंपदा, समाजकल्याण, महिला व बालविकास, तलाठी, महसूल विभागातील जागा भराव्यात.परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवावे.डमी परीक्षार्थीच्या रॅकेटवर आळा घालण्यासाठी परीक्षा बायोमेट्रिक पद्धतीने घ्यावात.पोलीस पदाची महाभरती लवकर घेण्यात यावी.राज्यात भरती प्रक्रियेचा तामिळनाडू पॅटर्न राबवावा.प्रत्येक खात्यातील पदभरती ही शासनानेच करावी.