शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांचा औरंगाबादेत भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 11:18 IST

‘एमपीएससी’तील सर्व पदांची प्रतीक्षा यादी जाहीर करा, ‘पीएसआय’ची स्वतंत्र पूर्व परीक्षा घ्या, खाजगी संस्थांवरील शिक्षक भरती शासनाने करावी, परीक्षा शुल्कांवरील जीएसटी रद्द करावी, कंत्राटी पदभरती धोरण रद्द करा, रिक्त जागा भरा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.६) काढण्यात आलेल्या मोर्चात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयाचा मार्ग दणाणून गेला.

ठळक मुद्देआंदोलन : घोषणांनी शहर दणाणले

औरंगाबाद : ‘एमपीएससी’तील सर्व पदांची प्रतीक्षा यादी जाहीर करा, ‘पीएसआय’ची स्वतंत्र पूर्व परीक्षा घ्या, खाजगी संस्थांवरील शिक्षक भरती शासनाने करावी, परीक्षा शुल्कांवरील जीएसटी रद्द करावी, कंत्राटी पदभरती धोरण रद्द करा, रिक्त जागा भरा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.६) काढण्यात आलेल्या मोर्चात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयाचा मार्ग दणाणून गेला.

जय भगवान महासंघ महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीतर्फे सकाळी ११ वाजता हा मोर्चा काढण्यात आला. राज्यात गेल्या काही वर्षांपासून रिक्त पदे भरली जात नसल्याने स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना नोकरीसाठी नुसती वाट बघावी लागत आहे. याविषयी विद्यार्थ्यांनी मोर्चाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.

‘तलाठी ३०८४ पदाची रिक्त पदे भरावी’, ‘जिल्हा परिषदेची एकही शाळा बंद करू नये’, ‘परीक्षेत बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी’, ‘३० टक्के नोकर भरती कपातीचे धोरण रद्द करावे, अशा विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले. विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, जय भगवान महासंघ विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष राज आव्हाड, सचिन डोईफोडे, बाबा मिसाळ, विशाल सानप, योगेश जाधव आदींची उपस्थिती होती. विभागीय आयुक्तालयासमोरील मैदानावर जोरदार घोषणाबाजीने मोर्चाची सांगता झाली. समितीतर्फे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन देण्यात आले.

५०० स्वयंसेवकांची फौजमोर्चा शांततेत आणि सुरळीत पार पडावा, यासाठी ५०० स्वयंसेवकांची फौज प्रयत्नशील होती. विशेषत: विद्यार्थिनींना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. वॉकीटॉकीच्या मदतीने संपर्क साधून स्वयंसेवक वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, मोर्चाची शिस्त बिघडणार नाही, याची प्रामुख्याने काळजी घेत होते.

विद्यार्थ्यांना पाणी वाटपमोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी विविध संस्थांकडून पाणी, बिस्किटांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. पाण्याचे पाऊच, वाटलेली पत्रके रस्त्यावर पडत होती. हे पाहून अनेकांची हाते हा कचरा दूर करण्यासाठी सरसावली.

हजारोंचा सहभागपहिल्यांदाच मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधले. तीन हजारांवर विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. गर्दीमुळे क्रांतीचौकाकडे येणारी वाहतूक वळविण्यात आली होती.

अन्य काही मागण्याराज्यात शिक्षकांची रिक्त २३,४३५ पदे केंद्रीय पद्धतीने अभियोगितेद्वारे भरावी.जि.प.,जलसंपदा, समाजकल्याण, महिला व बालविकास, तलाठी, महसूल विभागातील जागा भराव्यात.परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवावे.डमी परीक्षार्थीच्या रॅकेटवर आळा घालण्यासाठी परीक्षा बायोमेट्रिक पद्धतीने घ्यावात.पोलीस पदाची महाभरती लवकर घेण्यात यावी.राज्यात भरती प्रक्रियेचा तामिळनाडू पॅटर्न राबवावा.प्रत्येक खात्यातील पदभरती ही शासनानेच करावी.