शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांची दांडी; शेतकर्‍यांची गैरसोय

By admin | Updated: May 14, 2014 01:01 IST

राजकुमार देशमुख ल्ल सेनगाव ग्रामीण भागाच्या ग्रामविकासाचा कणा म्हणून ग्रामसेवकांकडे पाहिले जाते.

राजकुमार देशमुख ल्ल सेनगाव ग्रामीण भागाच्या ग्रामविकासाचा कणा म्हणून ग्रामसेवकांकडे पाहिले जाते. अत्यंत महत्वाच्या असणार्‍या या यंत्रणेला तालुक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घरघर लागली असून, ग्रामसेवक महिना- पंधरा दिवस गावातच येत नसल्याचे चित्र तालुक्यातील बहुतांश गावांत काही महिन्यांपासून वाढले आहे. ग्रामीण भागातील गाव, वाडी, तांड्याचा प्रशासनाच्या वतीने विकास करण्याची जबाबदारी खर्‍या अर्थाने ग्रामसेवक यंत्रणेवर आहे. तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींकरिता ६६ ग्रामसेवक कार्यरत आहेत. ग्रामसेवकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील पंचायत समिती कार्यालयात तीन विस्तार अधिकार्‍यांसह गटविकास अधिकारी कार्यरत आहेत. असे असताना मुख्यालयाचे वावडे, परजिल्ह्यातून, जिल्ह्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करीत कारभार पाहणारी ग्रामसेवक यंत्रणा कमालीची ढिसाळ झाली आहे. सरासरी दोन ते तीन गावचा कारभार पाहण्यासाठी कार्यरत असणार्‍या ग्रामसेवकाला गावभेटीचे दिवस निश्चित करून दिले असताना ग्रामसेवक संबंधित गावामध्ये जात नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे. परजिल्ह्यातून कारभार पाहणारी ग्रामसेवक मंडळी गावात महिना-महिना येत नसल्याच्या असंख्य तक्रारी पंचायत समिती पातळीवर वाढल्या आहेत. काही ग्रामसेवक महाशय केवळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाच हजेरी लावतात व पुन्हा मासिक बैठकीच्या निमित्ताने वेळ मिळाला तर नेमून दिलेल्या गावात भेट देतात. सातत्याने गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकांचे प्रमाण तालुक्यात वाढले आहे. ग्रामसेवक सर्रासपणे कोणतीही रजा न देता प्रदीर्घ काळ गैरहजर आहेत. या सर्वांचा त्रास सर्वसामान्य ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे, कायम गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकांचे वेतनही पंचायत समिती स्तरावरून विना अडथळा काढले जाते. त्यामुळे एकप्रकारे सातत्याने गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकांना पंचायत समिती प्रशासनच पाठबळ देत आहे. ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच यंत्रणा ग्रामसेवकांच्या अनधिकृत गैरहजेरीला पाठबळ देऊन आपले हित जोपासण्यात धन्यता मानत आहे. या प्रकारामुळे सातत्याने गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकाचे मनोधेर्ये वाढले असून, त्यांना कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा वरिष्ठांची भीती राहिलेली नाही. या संदर्भात सेनगावचे प्रभारी गटविकास अधिकारी पंकज राठोड यांना विचारले असता, एखाद्या ग्रामसेवकाची पंचायत समितीकडे तक्रार आल्यास त्याची लगेच दखल घेण्यात आले. अनेकवेळा गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकांना नोटिसा पाठवून त्यांच्या वेतनकपात व प्रशासकीय कार्यवाहीचे प्रस्ताव जि.प.च्या पंचायत विभागाकडे पाठविण्यात येतात, असे त्यांनी सांगितले.