शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

ग्रामसेवकांची दांडी; शेतकर्‍यांची गैरसोय

By admin | Updated: May 14, 2014 01:01 IST

राजकुमार देशमुख ल्ल सेनगाव ग्रामीण भागाच्या ग्रामविकासाचा कणा म्हणून ग्रामसेवकांकडे पाहिले जाते.

राजकुमार देशमुख ल्ल सेनगाव ग्रामीण भागाच्या ग्रामविकासाचा कणा म्हणून ग्रामसेवकांकडे पाहिले जाते. अत्यंत महत्वाच्या असणार्‍या या यंत्रणेला तालुक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घरघर लागली असून, ग्रामसेवक महिना- पंधरा दिवस गावातच येत नसल्याचे चित्र तालुक्यातील बहुतांश गावांत काही महिन्यांपासून वाढले आहे. ग्रामीण भागातील गाव, वाडी, तांड्याचा प्रशासनाच्या वतीने विकास करण्याची जबाबदारी खर्‍या अर्थाने ग्रामसेवक यंत्रणेवर आहे. तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींकरिता ६६ ग्रामसेवक कार्यरत आहेत. ग्रामसेवकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील पंचायत समिती कार्यालयात तीन विस्तार अधिकार्‍यांसह गटविकास अधिकारी कार्यरत आहेत. असे असताना मुख्यालयाचे वावडे, परजिल्ह्यातून, जिल्ह्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करीत कारभार पाहणारी ग्रामसेवक यंत्रणा कमालीची ढिसाळ झाली आहे. सरासरी दोन ते तीन गावचा कारभार पाहण्यासाठी कार्यरत असणार्‍या ग्रामसेवकाला गावभेटीचे दिवस निश्चित करून दिले असताना ग्रामसेवक संबंधित गावामध्ये जात नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे. परजिल्ह्यातून कारभार पाहणारी ग्रामसेवक मंडळी गावात महिना-महिना येत नसल्याच्या असंख्य तक्रारी पंचायत समिती पातळीवर वाढल्या आहेत. काही ग्रामसेवक महाशय केवळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाच हजेरी लावतात व पुन्हा मासिक बैठकीच्या निमित्ताने वेळ मिळाला तर नेमून दिलेल्या गावात भेट देतात. सातत्याने गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकांचे प्रमाण तालुक्यात वाढले आहे. ग्रामसेवक सर्रासपणे कोणतीही रजा न देता प्रदीर्घ काळ गैरहजर आहेत. या सर्वांचा त्रास सर्वसामान्य ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे, कायम गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकांचे वेतनही पंचायत समिती स्तरावरून विना अडथळा काढले जाते. त्यामुळे एकप्रकारे सातत्याने गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकांना पंचायत समिती प्रशासनच पाठबळ देत आहे. ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच यंत्रणा ग्रामसेवकांच्या अनधिकृत गैरहजेरीला पाठबळ देऊन आपले हित जोपासण्यात धन्यता मानत आहे. या प्रकारामुळे सातत्याने गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकाचे मनोधेर्ये वाढले असून, त्यांना कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा वरिष्ठांची भीती राहिलेली नाही. या संदर्भात सेनगावचे प्रभारी गटविकास अधिकारी पंकज राठोड यांना विचारले असता, एखाद्या ग्रामसेवकाची पंचायत समितीकडे तक्रार आल्यास त्याची लगेच दखल घेण्यात आले. अनेकवेळा गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकांना नोटिसा पाठवून त्यांच्या वेतनकपात व प्रशासकीय कार्यवाहीचे प्रस्ताव जि.प.च्या पंचायत विभागाकडे पाठविण्यात येतात, असे त्यांनी सांगितले.