शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

राष्ट्रीय सणाच्या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्काराचा ग्रामसेवक युनियनचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:47 IST

प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्‍या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात. ग्रामसेवकांना जीव मुठीत धरून ग्रामसभा घ्याव्या लागतात. त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.

ठळक मुद्दे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्‍या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात.त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्‍या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात. ग्रामसेवकांना जीव मुठीत धरून ग्रामसभा घ्याव्या लागतात. त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.

यासंदर्भात ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रमेश मुळे यांनी सांगितले की,राष्ट्रीय सणाच्या सुटीचा आनंद आम्हालाही घेता आला पाहिजे. नियमानुसार प्रत्येक आर्थिक वर्षात पहिली ग्रामसभा ही सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे. अर्थात ३० मे पूर्वी पहिली ग्रामसभा घेणे अपेक्षित असून १ मे अर्थात महाराष्ट्र दिनी ग्रामसभा घेणे बंधनकारक नाही. दुसरी ग्रामसभा ९ ते १५ आॅगस्टदरम्यान घेणे अपेक्षित आहे. तिसरी ग्रामसभा सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंचांनी ठरवून दिलेल्या तारखेत अर्थात नोव्हेंबर अखेर घेतली पाहिजे. चौथी ग्रामसभा ही २६ जानेवारी रोजी घेण्याच्या सूचना असतात; पण तो दिवस हा प्रजासत्ताक दिन असून राष्ट्रीय सण आहे. या दिवशी केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सुटी असते.

राष्ट्रीय सणाच्या सुटीचा आनंद ग्रामसेवकांनाही घेता आला पाहिजे. ध्वजारोहण आटोपल्यानंतर त्या दिवशी आयोजित केली जाणारी ग्रामसभा अन्य दिवशी घेण्याची राज्य कार्यकारिणीची मागणी आहे. राष्ट्रीय सणाचे महत्त्व कायम राहावे. या दिवशी गावात शांतता, समता, बंधूता व सलोख्याचे वातावरण कायम टिकून राहावे यासाठी २६ जानेवारी, १ मे व १५ आॅगस्ट रोजी आयोजित केल्या जाणार्‍या ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे. 

ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थितीया संदर्भात ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष रमेश मुळे यांनी सांगितले की, आम्ही आज सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना निवेदन सादर केले आहे. २६ जानेवारी, १ मे व १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रम निर्विघ्न पार पाडून त्या दिवशी ग्रामसभा घेणार नाहीत. अन्य कोणत्याही दिवशी ग्रामसभा घेण्यास आमची हरकत नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAurangabadऔरंगाबाद