शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

राष्ट्रीय सणाच्या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्काराचा ग्रामसेवक युनियनचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:47 IST

प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्‍या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात. ग्रामसेवकांना जीव मुठीत धरून ग्रामसभा घ्याव्या लागतात. त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.

ठळक मुद्दे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्‍या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात.त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्‍या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात. ग्रामसेवकांना जीव मुठीत धरून ग्रामसभा घ्याव्या लागतात. त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.

यासंदर्भात ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रमेश मुळे यांनी सांगितले की,राष्ट्रीय सणाच्या सुटीचा आनंद आम्हालाही घेता आला पाहिजे. नियमानुसार प्रत्येक आर्थिक वर्षात पहिली ग्रामसभा ही सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे. अर्थात ३० मे पूर्वी पहिली ग्रामसभा घेणे अपेक्षित असून १ मे अर्थात महाराष्ट्र दिनी ग्रामसभा घेणे बंधनकारक नाही. दुसरी ग्रामसभा ९ ते १५ आॅगस्टदरम्यान घेणे अपेक्षित आहे. तिसरी ग्रामसभा सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंचांनी ठरवून दिलेल्या तारखेत अर्थात नोव्हेंबर अखेर घेतली पाहिजे. चौथी ग्रामसभा ही २६ जानेवारी रोजी घेण्याच्या सूचना असतात; पण तो दिवस हा प्रजासत्ताक दिन असून राष्ट्रीय सण आहे. या दिवशी केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सुटी असते.

राष्ट्रीय सणाच्या सुटीचा आनंद ग्रामसेवकांनाही घेता आला पाहिजे. ध्वजारोहण आटोपल्यानंतर त्या दिवशी आयोजित केली जाणारी ग्रामसभा अन्य दिवशी घेण्याची राज्य कार्यकारिणीची मागणी आहे. राष्ट्रीय सणाचे महत्त्व कायम राहावे. या दिवशी गावात शांतता, समता, बंधूता व सलोख्याचे वातावरण कायम टिकून राहावे यासाठी २६ जानेवारी, १ मे व १५ आॅगस्ट रोजी आयोजित केल्या जाणार्‍या ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे. 

ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थितीया संदर्भात ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष रमेश मुळे यांनी सांगितले की, आम्ही आज सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना निवेदन सादर केले आहे. २६ जानेवारी, १ मे व १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रम निर्विघ्न पार पाडून त्या दिवशी ग्रामसभा घेणार नाहीत. अन्य कोणत्याही दिवशी ग्रामसभा घेण्यास आमची हरकत नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAurangabadऔरंगाबाद