शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

राष्ट्रीय सणाच्या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्काराचा ग्रामसेवक युनियनचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:47 IST

प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्‍या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात. ग्रामसेवकांना जीव मुठीत धरून ग्रामसभा घ्याव्या लागतात. त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.

ठळक मुद्दे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्‍या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात.त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्‍या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात. ग्रामसेवकांना जीव मुठीत धरून ग्रामसभा घ्याव्या लागतात. त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.

यासंदर्भात ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रमेश मुळे यांनी सांगितले की,राष्ट्रीय सणाच्या सुटीचा आनंद आम्हालाही घेता आला पाहिजे. नियमानुसार प्रत्येक आर्थिक वर्षात पहिली ग्रामसभा ही सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे. अर्थात ३० मे पूर्वी पहिली ग्रामसभा घेणे अपेक्षित असून १ मे अर्थात महाराष्ट्र दिनी ग्रामसभा घेणे बंधनकारक नाही. दुसरी ग्रामसभा ९ ते १५ आॅगस्टदरम्यान घेणे अपेक्षित आहे. तिसरी ग्रामसभा सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंचांनी ठरवून दिलेल्या तारखेत अर्थात नोव्हेंबर अखेर घेतली पाहिजे. चौथी ग्रामसभा ही २६ जानेवारी रोजी घेण्याच्या सूचना असतात; पण तो दिवस हा प्रजासत्ताक दिन असून राष्ट्रीय सण आहे. या दिवशी केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सुटी असते.

राष्ट्रीय सणाच्या सुटीचा आनंद ग्रामसेवकांनाही घेता आला पाहिजे. ध्वजारोहण आटोपल्यानंतर त्या दिवशी आयोजित केली जाणारी ग्रामसभा अन्य दिवशी घेण्याची राज्य कार्यकारिणीची मागणी आहे. राष्ट्रीय सणाचे महत्त्व कायम राहावे. या दिवशी गावात शांतता, समता, बंधूता व सलोख्याचे वातावरण कायम टिकून राहावे यासाठी २६ जानेवारी, १ मे व १५ आॅगस्ट रोजी आयोजित केल्या जाणार्‍या ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे. 

ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थितीया संदर्भात ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष रमेश मुळे यांनी सांगितले की, आम्ही आज सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना निवेदन सादर केले आहे. २६ जानेवारी, १ मे व १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रम निर्विघ्न पार पाडून त्या दिवशी ग्रामसभा घेणार नाहीत. अन्य कोणत्याही दिवशी ग्रामसभा घेण्यास आमची हरकत नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAurangabadऔरंगाबाद