शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

ग्रामीण बँकांना हवेत १,५०० कोटी

By admin | Updated: May 11, 2016 00:53 IST

औरंगाबाद : येत्या खरीप हंगामातील पीककर्जासाठी मराठवाड्यातील ग्रामीण बँकांनी शासनाकडे १,५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

औरंगाबाद : येत्या खरीप हंगामातील पीककर्जासाठी मराठवाड्यातील ग्रामीण बँकांनी शासनाकडे १,५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. एवढी मागणी पूर्ण झाली तरच कर्जवाटपासाठी बँका पुढाकार घेतील, असे मत बँकांनी शासनाकडे व्यक्त केले आहे. २०० कोटी रुपये खरीप हंगाम पिकांसाठी पतपुरवठा करण्याची तयारी बँकांनी दर्शविली आहे. १,७५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ग्रामीण बँकांना पीककर्ज वाटपासाठी देण्यात आले आहे. १,५०० कोटी शासनाने उपलब्ध करून दिले तरच बँका कर्जवाटपासाठी पुढे येणार असल्यामुळे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत बुधवारी मुंबईत एक बैठक होणार असल्याची माहिती विभागीय सूत्रांनी दिली. वर्ष २०१४-१५ च्या कर्जाची ज्या शेतकऱ्यांकडे थकबाकी असेल त्याचे पुनर्गठन पाच हप्त्यांमध्ये होईल. त्यातील एक पहिला हप्ता पुढच्या वर्षी वसुलीसाठी पात्र ठरेल. कर्ज १ लाख असेल, तर त्यावर व्याज लागणार नाही. जुन्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. विभागात ४० लाख शेतकरी असून, यातील ८० टक्के शेतकऱ्यांपर्यंत पीककर्ज पोहोचविण्यासाठी बँका हाच एकमेव पर्याय आहे. यावर्षी ९ हजार ८६३ कोटी रुपयांचे कर्जवाटप खरीप हंगामात करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँकांकडून ते वाटप होईल. अग्रणी बँक, नाबार्ड, राष्ट्रीयीकृत बँकांकडून हे कर्ज उभे केले जाईल. औरंगाबाद, लातूर वगळता मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील सहकारी बँकांचे आर्थिक आरोग्य खालावलेले आहे. त्यामुळे तेथून शेतकऱ्यांना लाभ मिळेल, अशी शक्यता नाही. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कार्यक्षेत्र ३ हजार गावांत आहे. बँकेकडे निधी मर्यादित आहे. २०० कोटी बँकेकडे असून बँकेची मागणी १,५०० कोटींची आहे. त्यांनी कर्जवाटप केले नाही तर, राष्ट्रीयीकृत बँकांकडे त्यांचे उद्दिष्ट वर्ग करण्याची वेळ येऊ शकते. राष्ट्रीयीकृत बँकांकडे निधीची कमतरता नाही; परंतु त्या बँकांची कर्जवाटप करण्याची मानसिकता नाही. पीककर्ज कर्जवसुलीसाठी बँक व्यवस्थापकांना जबाबदार धरण्यात येऊ नये, अशी विनंती शासनाकडे करण्यात आली आहे.