शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण बँकांना हवेत १,५०० कोटी

By admin | Updated: May 11, 2016 00:53 IST

औरंगाबाद : येत्या खरीप हंगामातील पीककर्जासाठी मराठवाड्यातील ग्रामीण बँकांनी शासनाकडे १,५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

औरंगाबाद : येत्या खरीप हंगामातील पीककर्जासाठी मराठवाड्यातील ग्रामीण बँकांनी शासनाकडे १,५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. एवढी मागणी पूर्ण झाली तरच कर्जवाटपासाठी बँका पुढाकार घेतील, असे मत बँकांनी शासनाकडे व्यक्त केले आहे. २०० कोटी रुपये खरीप हंगाम पिकांसाठी पतपुरवठा करण्याची तयारी बँकांनी दर्शविली आहे. १,७५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ग्रामीण बँकांना पीककर्ज वाटपासाठी देण्यात आले आहे. १,५०० कोटी शासनाने उपलब्ध करून दिले तरच बँका कर्जवाटपासाठी पुढे येणार असल्यामुळे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत बुधवारी मुंबईत एक बैठक होणार असल्याची माहिती विभागीय सूत्रांनी दिली. वर्ष २०१४-१५ च्या कर्जाची ज्या शेतकऱ्यांकडे थकबाकी असेल त्याचे पुनर्गठन पाच हप्त्यांमध्ये होईल. त्यातील एक पहिला हप्ता पुढच्या वर्षी वसुलीसाठी पात्र ठरेल. कर्ज १ लाख असेल, तर त्यावर व्याज लागणार नाही. जुन्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. विभागात ४० लाख शेतकरी असून, यातील ८० टक्के शेतकऱ्यांपर्यंत पीककर्ज पोहोचविण्यासाठी बँका हाच एकमेव पर्याय आहे. यावर्षी ९ हजार ८६३ कोटी रुपयांचे कर्जवाटप खरीप हंगामात करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँकांकडून ते वाटप होईल. अग्रणी बँक, नाबार्ड, राष्ट्रीयीकृत बँकांकडून हे कर्ज उभे केले जाईल. औरंगाबाद, लातूर वगळता मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील सहकारी बँकांचे आर्थिक आरोग्य खालावलेले आहे. त्यामुळे तेथून शेतकऱ्यांना लाभ मिळेल, अशी शक्यता नाही. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कार्यक्षेत्र ३ हजार गावांत आहे. बँकेकडे निधी मर्यादित आहे. २०० कोटी बँकेकडे असून बँकेची मागणी १,५०० कोटींची आहे. त्यांनी कर्जवाटप केले नाही तर, राष्ट्रीयीकृत बँकांकडे त्यांचे उद्दिष्ट वर्ग करण्याची वेळ येऊ शकते. राष्ट्रीयीकृत बँकांकडे निधीची कमतरता नाही; परंतु त्या बँकांची कर्जवाटप करण्याची मानसिकता नाही. पीककर्ज कर्जवसुलीसाठी बँक व्यवस्थापकांना जबाबदार धरण्यात येऊ नये, अशी विनंती शासनाकडे करण्यात आली आहे.