शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वडवळमध्ये ग्रामसभा उधळली

By admin | Updated: August 17, 2014 01:04 IST

वडवळ ना़ : स्वातंत्र्यदिनी येथे आयोजित ग्रामसभेत गारपिटीतील नुकसानीच्या अनुदानाचा वाद निर्माण झाला़ अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी

वडवळ ना़ : स्वातंत्र्यदिनी येथे आयोजित ग्रामसभेत गारपिटीतील नुकसानीच्या अनुदानाचा वाद निर्माण झाला़ अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांना हजर करा अशी मागणी केल्याने गोंधळ निर्माण झाला़ परिणामी ही ग्रामसभा तहकुब करण्यात येऊन २६ आॅगस्ट रोजी घेण्याचे ठरले़शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती़ यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य, नागरिक व ग्रामविकास अधिकारी पी़ व्ही़ रेड्डी उपस्थित होते़ ग्रामसभेस प्रारंभ होताच गारपिटग्रस्त शेतकऱ्यांनी अनुदानाचा मुद्दा उपस्थित केला़ परिणामी ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाला़ फेब्रुवारी- मार्चमध्ये झालेल्या गारपिटीत रबी पिकाबरोबरच टोमॅटो व इतर भाजीपाल्याचेही नुकसान झाले़ या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले असता तलाठी व महसूल मंडळ अधिकाऱ्यांनी ते काम पूर्ण केले़ हे पंचनामे वरिष्ठांकडे सादर करण्यात आले़ या पंचनाम्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांऐवजी अन्य शेतकऱ्यांचाच भरणा करण्यात आला आहे़ ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कुठल्याही फळ झाडाचे नुकसान झाले नाही, ज्यांची जमीन पडिक आहे़ तसेच ज्यांच्या शेतात संपूर्णपणे ऊस आहे, अशा शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश करण्यात आला़ त्यामुळे शासनाच्या वतीने सध्या अनुदान देण्याचे काम सुरु आहे़ चुकीच्या पंचनाम्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत़ अनुदान यादीतील १३५२ पैैकी ३१८ खातेदारांना २४ लाख ४२ हजार ५०० रूपयांचे अनुदान वाटप सुरु आहे़ या खातेदारांमध्ये एकाच घरातील तिघा-चौघा जणांचा समावेश आहे़ खरोखर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली़मंजूर यादीची चौकशी करून यातील दोषींवर कार्यवाही करण्यात येईल़ अनुदानापासून वंचित असलेल्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे चाकूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले़(वार्ताहर)