शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वृत्तपत्र वितरणाबाबत शासनाचे विधान आधारहीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 05:50 IST

वर्तमानपत्रांच्या घरोघर वितरणावरील बंदी उठवताना शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्बंध घातले आहेत.

औरंगाबाद : वृत्तपत्र अनेक व्यक्ती हाताळतात. त्यामुळे कोरोनाचा अनेकांना प्रादुर्भाव होऊ शकतो, या राज्य शासनाच्या शपथपत्रातील विधानाला कोणत्याही तज्ज्ञांच्या मताचा अथवा आरोग्य क्षेत्रातील व्यक्तीच्या मताचा आधार नाही. शासनाच्या शपथपत्रातील हे विधान केवळ सर्वसाधारण निवेदन असल्याचे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी सोमवारी व्यक्त केले.वर्तमानपत्रांच्या घरोघर वितरणावरील बंदी उठवताना शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्बंध घातले आहेत. यामागील कारण विशद करताना ‘वृत्तपत्र अनेक व्यक्ती हाताळतात. त्यामुळे कोरोना विषाणूचा अनेकांना प्रादुर्भाव होऊ शकतो’, असे शासनाने शपथपत्रात म्हटले आहे. सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायालयाचे मित्र अ‍ॅड. सत्यजित बोरा यांनी मद्रास उच्च न्यायालयाने मुद्रित माध्यमांवरील बंदी उठविण्यास विरोध करणाऱ्या याचिकेचा संदर्भ दिला. या निकालपत्राची प्रत मिळवून याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी देण्याची त्यांनी तोंडी विनंती केली. त्यांची विनंती खंडपीठाने मान्य केली. त्याचप्रमाणे नागपूर खंडपीठातील याच विषयावरील याचिकेची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार असल्याचे निवेदन करून या खंडपीठाच्या आदेशाची प्रतसुद्धा सादर करण्यासाठी वेळ मागितला. तर सरकारी वकील डी. आर. काळे यांनी अतिरिक्त शपथपत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला असता, त्यांना खंडपीठाने तीन आठवड्यांचा वेळ दिला. शासनाच्या शपथपत्रावर अ‍ॅड.बोरा यांना प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी खंडपीठाने त्यानंतरचा एक आठवड्याचा वेळ दिला. या स्यूमोटो जनहित याचिकेवर आता ११ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.वृत्तपत्र अत्यावश्यक नसल्याच्या निवेदनावरही नाराजीशासनाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यामार्फत दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटल्यानुसार वृत्तपत्र हे इतर अन्न पदार्थांप्रमाणे अत्यावश्यक नाही. वृत्तपत्रांची अन्न पदार्थांसोबत तुलना करणे योग्य नाही. नागरिकांना इंटरनेटद्वारे दररोज ‘ई-पेपर’ वाचावयास मिळू शकतो. त्यामुळे वृत्तपत्र वितरित झाले नाही तर वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या अधिकाराचा भंग होत नाही. शपथपत्रातील या निवेदनावरही खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे.> ‘लोकमत’च्या वृत्ताची दखलदेशात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात केवळ वृत्तपत्र वाचन वाढले नाही, तर लोकांनी वृत्तपत्र वाचनात जास्तीत जास्त वेळ ाालविल्याबाबतच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची तसेच वृत्तपत्र व्हायरसमुक्त आहे या ‘लोकमत’च्या निवेदनाची खंडपीठाने दखल घेतली आहे.सर्वसामान्य लोकांना सद्य:स्थितीची माहिती करुन घेण्यासाठी वृत्तपत्रांच्या वाचनात खूप रस असतो, असे असताना महाराष्ट्र शासनाच्या शपथपत्रात वृत्तपत्र अनेक लोक हाताळत असल्यामुळे प्रादुर्भाव वाढत असल्याचे निवेदन करण्यामागे काय उद्देश आहे. हे अनाकलनीय आहे, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस