शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वृत्तपत्र वितरणाबाबत शासनाचे विधान आधारहीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 05:50 IST

वर्तमानपत्रांच्या घरोघर वितरणावरील बंदी उठवताना शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्बंध घातले आहेत.

औरंगाबाद : वृत्तपत्र अनेक व्यक्ती हाताळतात. त्यामुळे कोरोनाचा अनेकांना प्रादुर्भाव होऊ शकतो, या राज्य शासनाच्या शपथपत्रातील विधानाला कोणत्याही तज्ज्ञांच्या मताचा अथवा आरोग्य क्षेत्रातील व्यक्तीच्या मताचा आधार नाही. शासनाच्या शपथपत्रातील हे विधान केवळ सर्वसाधारण निवेदन असल्याचे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी सोमवारी व्यक्त केले.वर्तमानपत्रांच्या घरोघर वितरणावरील बंदी उठवताना शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्बंध घातले आहेत. यामागील कारण विशद करताना ‘वृत्तपत्र अनेक व्यक्ती हाताळतात. त्यामुळे कोरोना विषाणूचा अनेकांना प्रादुर्भाव होऊ शकतो’, असे शासनाने शपथपत्रात म्हटले आहे. सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायालयाचे मित्र अ‍ॅड. सत्यजित बोरा यांनी मद्रास उच्च न्यायालयाने मुद्रित माध्यमांवरील बंदी उठविण्यास विरोध करणाऱ्या याचिकेचा संदर्भ दिला. या निकालपत्राची प्रत मिळवून याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी देण्याची त्यांनी तोंडी विनंती केली. त्यांची विनंती खंडपीठाने मान्य केली. त्याचप्रमाणे नागपूर खंडपीठातील याच विषयावरील याचिकेची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार असल्याचे निवेदन करून या खंडपीठाच्या आदेशाची प्रतसुद्धा सादर करण्यासाठी वेळ मागितला. तर सरकारी वकील डी. आर. काळे यांनी अतिरिक्त शपथपत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला असता, त्यांना खंडपीठाने तीन आठवड्यांचा वेळ दिला. शासनाच्या शपथपत्रावर अ‍ॅड.बोरा यांना प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी खंडपीठाने त्यानंतरचा एक आठवड्याचा वेळ दिला. या स्यूमोटो जनहित याचिकेवर आता ११ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.वृत्तपत्र अत्यावश्यक नसल्याच्या निवेदनावरही नाराजीशासनाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यामार्फत दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटल्यानुसार वृत्तपत्र हे इतर अन्न पदार्थांप्रमाणे अत्यावश्यक नाही. वृत्तपत्रांची अन्न पदार्थांसोबत तुलना करणे योग्य नाही. नागरिकांना इंटरनेटद्वारे दररोज ‘ई-पेपर’ वाचावयास मिळू शकतो. त्यामुळे वृत्तपत्र वितरित झाले नाही तर वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या अधिकाराचा भंग होत नाही. शपथपत्रातील या निवेदनावरही खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे.> ‘लोकमत’च्या वृत्ताची दखलदेशात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात केवळ वृत्तपत्र वाचन वाढले नाही, तर लोकांनी वृत्तपत्र वाचनात जास्तीत जास्त वेळ ाालविल्याबाबतच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची तसेच वृत्तपत्र व्हायरसमुक्त आहे या ‘लोकमत’च्या निवेदनाची खंडपीठाने दखल घेतली आहे.सर्वसामान्य लोकांना सद्य:स्थितीची माहिती करुन घेण्यासाठी वृत्तपत्रांच्या वाचनात खूप रस असतो, असे असताना महाराष्ट्र शासनाच्या शपथपत्रात वृत्तपत्र अनेक लोक हाताळत असल्यामुळे प्रादुर्भाव वाढत असल्याचे निवेदन करण्यामागे काय उद्देश आहे. हे अनाकलनीय आहे, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस