शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शासनाच्या ‘त्या’ निर्णयाचा राज्यातील ५० हजार पोलिसांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:02 IST

खात्यांतर्गत फौजदार पदासाठी एमपीएससीची तीन वर्षांपासून जाहिरातच नाही औरंगाबाद: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस न केलेल्या तब्बल ६३६ पोलिसांना ...

खात्यांतर्गत फौजदार पदासाठी एमपीएससीची तीन वर्षांपासून जाहिरातच नाही

औरंगाबाद: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस न केलेल्या तब्बल ६३६ पोलिसांना फौजदारपदावर सामावून घेण्याचा तत्कालीन सरकारच्या निर्णयाचा फटका खात्यांतर्गत फौजदारपदाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील ५० हजार पोलिसांना थेट बसला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे लोकसेवा आयोगाने खात्यांतर्गत फौजदारपदासाठी ३ वर्षांपासून जाहिरात काढली नाही.

राज्य पोलीस दलातील फौजदार पदाची ५० टक्के रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरती प्रक्रियेतून, २५ टक्के पदे खात्यांतर्गत उमेदवारांची स्पर्धा परीक्षा घेऊन लोकसेवा आयोगाच्या शिफारशीने तर उर्वरित २५ टक्के पदे पोलीस खात्यांतर्गत पदोन्नतीने भरण्यात येतात.

लोकसेवा आयोगाने २०१६ साली खात्यांतर्गत फौजदारपदाच्या ८२८ रिक्त पदाकरिता भरती प्रक्रिया राबविली होती. या भरती प्रक्रियेत कमी गुण असलेल्या उमेदवारांना लोकसेवा आयोगाने अपात्र ठरवले होते. आयोगाने सादर केलेल्या निवड प्रक्रियेत मागासवर्गीय प्रवर्गातील १५४ उमेदवारांची पदोन्नतीतील आरक्षणानुसार निवड केली होती. दरम्यान २०१७ साली न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले. या निर्णयाची अंमलबजावणी करताना १५४ उमेदवारांची निवड रद्द केली. यामुळे मेरीट २३० गुणापर्यंत खाली आले. मेरीटखाली आलेल्या ६३६ उमेदवारांनीही आम्ही पात्र ठरलो आहोत, असे म्हणून तत्कालीन राज्य सरकारकडे अर्ज करून फौजदारपदावर सामावून घेण्याची विनंती केली. एवढेच नव्हे तर विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधीचे शिफारसपत्र सोबत जोडून त्यांनी शासनाकडे अर्ज केले. विशेष म्हणजे आयोगाने त्यांच्या नावाची शिफारस केली नसताना राज्य सरकारने या उमेदवारांना फौजदारपदी सामावून घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला अनेक उमेदवारांनी मॅटमध्ये आव्हान दिले.

सध्या हे प्रकरण मॅट न्यायालयासमोर प्रलंबित आहे. असे असले तरी तत्कालीन शासनाने भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा फटका राज्यातील सुमारे ५० हजार पोलिसांना बसला. एमपीएससीची खात्यांतर्गत परीक्षा देण्यासाठी ते रात्रंदिवस अभ्यास करीत आहेत;मात्र ६३६ उमेदवारांच्या निवड प्रक्रियेचा घोळ मिटलेला नसल्याने तीन वर्षांपासून एमपीएससीने खात्यांतर्गत फौजदारपदासाठी जाहिरात काढली नाही.

=============

चौकट

कॉन्स्टेबलने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू नये का ?

पोलीस कॉन्स्टेबलपदी कार्यरत असलेली एक महिला अंमलदार भरती झाल्यापासून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहे. चार वर्षांपासून त्या खात्यांतर्गत फौजदारपदासाठी लोकसेवा आयोगाची जाहिरात येण्याची प्रतीक्षा करीत आहेत. याकरिता त्या वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करतात;मात्र २०१७ पासून एमपीएससीची जाहिरात आली नाही. परिणामी वय वाढत असल्याने अधिकारी पदासाठी आवश्यक असलेला फिटनेस सांभाळणे शक्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

================