शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

सरकारचा प्रशासनावर वचक नाही

By admin | Updated: May 8, 2016 23:37 IST

तुळजापूर : राज्यात विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे़ चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून,

तुळजापूर : राज्यात विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे़ चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, या दुष्काळाबाबत राज्य शासन मात्र उदासिन दिसत आहे़ चाऱ्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत़ छावणीला शासनाकडून वेळेवर पैसे मिळत नाहीत़अधिकारी वर्ग मंत्र्यांचे ऐकत नाही़ प्रशासनावरच शासनाचा वचक राहिलेला नाही, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले़खा़ अशोक चव्हाण यांनी रविवारी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले़ यानंतर त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी वार्तालाप केला. खा़ चव्हाण म्हणाले, युती शासनामध्ये असलेल्या भाजपा- शिवसेनेत सुसंवाद नाही़ त्यामुळे दोन्ही पक्षाचे मंत्री आपापल्यात कुरघोड्या करण्यात व्यस्त आहेत़ परिणामी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न गंभीर बनत आहेत़ विरोधक म्हणून आम्हाला दुष्काळात राजकारण करायचे नाही़ कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्न पाणी न्यायप्राधिकरणाने सोडविला पाहिजे़ परंतु, ते हा प्रश्न सोडवित नसल्याने न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागतो़ सध्याची नैसर्गिक आपत्ती मोठी आहे़ परंतु पालकमंत्र्यांना याचे गांभीर्य नाही, अशी टीकाही खा़ चव्हाण यांनी केली़ यावेळी आ़ मधुकरराव चव्हाण, जिप अध्यक्ष धीरज पाटील, आ़ अमर राजूरकर, अप्पासाहेब पाटील, विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने, सचिन पाटील, विनित कोंडो, अनंत कोंडो, सिध्दार्थ बनसोडे, महेबुब पटेल, विशाल कोंडो आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)आगामी काळात होणाऱ्या नगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी बरोबर आघाडी करायची की नाही, हा निर्णय जिल्हा काँग्रेस कमिटी घेणार आहे़ परिस्थिती पाहून स्वबळ किंवा आघाडी हे दोन्ही पर्याय जिल्हा कमिटीच्या समोर असल्याचेही खा़ चव्हाण यांनी सांगितले़