शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

सरकारचा प्रशासनावर वचक नाही

By admin | Updated: May 8, 2016 23:37 IST

तुळजापूर : राज्यात विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे़ चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून,

तुळजापूर : राज्यात विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे़ चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, या दुष्काळाबाबत राज्य शासन मात्र उदासिन दिसत आहे़ चाऱ्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत़ छावणीला शासनाकडून वेळेवर पैसे मिळत नाहीत़अधिकारी वर्ग मंत्र्यांचे ऐकत नाही़ प्रशासनावरच शासनाचा वचक राहिलेला नाही, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले़खा़ अशोक चव्हाण यांनी रविवारी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले़ यानंतर त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी वार्तालाप केला. खा़ चव्हाण म्हणाले, युती शासनामध्ये असलेल्या भाजपा- शिवसेनेत सुसंवाद नाही़ त्यामुळे दोन्ही पक्षाचे मंत्री आपापल्यात कुरघोड्या करण्यात व्यस्त आहेत़ परिणामी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न गंभीर बनत आहेत़ विरोधक म्हणून आम्हाला दुष्काळात राजकारण करायचे नाही़ कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्न पाणी न्यायप्राधिकरणाने सोडविला पाहिजे़ परंतु, ते हा प्रश्न सोडवित नसल्याने न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागतो़ सध्याची नैसर्गिक आपत्ती मोठी आहे़ परंतु पालकमंत्र्यांना याचे गांभीर्य नाही, अशी टीकाही खा़ चव्हाण यांनी केली़ यावेळी आ़ मधुकरराव चव्हाण, जिप अध्यक्ष धीरज पाटील, आ़ अमर राजूरकर, अप्पासाहेब पाटील, विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने, सचिन पाटील, विनित कोंडो, अनंत कोंडो, सिध्दार्थ बनसोडे, महेबुब पटेल, विशाल कोंडो आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)आगामी काळात होणाऱ्या नगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी बरोबर आघाडी करायची की नाही, हा निर्णय जिल्हा काँग्रेस कमिटी घेणार आहे़ परिस्थिती पाहून स्वबळ किंवा आघाडी हे दोन्ही पर्याय जिल्हा कमिटीच्या समोर असल्याचेही खा़ चव्हाण यांनी सांगितले़