शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

सरकार खरंच विचित्र निर्णय घेतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:48 IST

सध्याचे सरकार खरोखरच विचित्र निर्णय घेत असल्याने शेतकºयांना तर अनेक अडचणीला तोंड द्यावेच लागते. त्यामुळे आता शेती अस्तीत्वाचीही भीती निर्माण झाल्याने तेवढीतरी वाचविण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती ‘शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचे’ राज्य निमंत्रक शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्याचे सरकार खरोखरच विचित्र निर्णय घेत असल्याने शेतकºयांना तर अनेक अडचणीला तोंड द्यावेच लागते. त्यामुळे आता शेती अस्तीत्वाचीही भीती निर्माण झाल्याने तेवढीतरी वाचविण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती ‘शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचे’ राज्य निमंत्रक शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.हिंगोलीतील शासकीय विश्राम गृह येथे १६ आॅगस्ट रोजी किसान मंत्र कार्यकारी समितीची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कार्यकारी समिती सदस्य दत्ता पवार, आ. रामराव वडकुते, रा. कॉ. अध्यक्ष मुनिर पटेल यांची उपस्थिती होती. किसन मंच कार्यकारी समिती महाराष्टÑ च्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षाअभियान राबविण्यात येत असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. हे अभियान ५५ दिवसांचे असून यात एकूण ८ प्रकारच्या मागण्यांचा समावेश आहे. आज घडीला वारंवार सरकार निर्णय घेत असल्याने या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांचे आतोनात नुकसान होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. कुठल्याही अटी व निकष न लावता सन २०१७ पर्यंतच्या शेतकºयांना कर्जातून मुक्त करावे. तर राज्याच्या व केंद्राच्या शेतीमालाला भाव ठरविणाºया समितीला घटनात्मक अधिकार देऊन शेतीमालाला कायद्याप्रमाणे योग्य भावाची हमी द्यावी, शिवाय शेतकºयांनाही व्यवसायिकाप्रमाणे तारण जमिनीच्या मुल्यांकनाच्या ७० टक्के एवढे कर्ज उपलब्ध करुन द्यावे आदी मागण्यासाठी हे अभियान राबविले जात असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. ९ आॅगस्ट पासून अभियानास प्रारंभ झाला असून, राज्यातील ३० जिल्ह्यात फिरुन २ आॅक्टोबर रोजी सरकारच्या विरोधात असहकार आंदोलनानंतर समारोप केला जाणार आहे.