शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील वर्ग-२ च्या जमिनींच्या विक्री परवानगीमध्ये शासनाचे २२ लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 19:16 IST

जिल्ह्यातील वर्ग-२ च्या जमिनींच्या विक्री परवानगीमध्ये शासनाचे सुमारे २२ लाख ८१ हजार ६८६ रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान कसे व केव्हा भरून घेणार, असा प्रश्न आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील वर्ग-२ च्या जमिनींच्या विक्री परवानगीमध्ये शासनाचे सुमारे २२ लाख ८१ हजार ६८६ रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान कसे व केव्हा भरून घेणार, असा प्रश्न आहे. १८ जानेवारी रोजी वर्ग-२ चे जमीन प्रकरण चव्हाट्यावर येऊन १ महिना पूर्ण झाला असून, यामध्ये निलंबित उपजिल्हाधिकार्‍यांपैकी एकाने कोर्टात धाव घेतली आहे, तर दुसर्‍या अधिकार्‍याने मौन धारण केले आहे. कारणे दाखवा नोटीस दिलेल्या दोघांनी अद्याप खुलासा केलेला नाही.

निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे व तत्कालीन उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी सिलिंग जमिनीची विक्री परवानगी देताना २० लाख ८१ हजार ६८६ रुपये इतक्या अनर्जित रकमेचा कमी भरणा करून घेत जमीन विक्रीची परवानगी दिली, असा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे, तर निलंबित उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी इनाम जमिनीची विक्री परवानगी देताना ३०९ रुपयांचे शासनाचे नुकसान केले आहे, दुसर्‍या गायरान जमीन प्रकरणात विक्री परवानगी देताना गावंडे यांनी २ लाख ६८५ रुपये इतकी रक्कम भरणा न करून घेता शासनाचे नुकसान केले आहे. सध्या सुरू असलेल्या वादाच्या प्रकरणांत शासनाचे झालेले नुकसान कसे भरून घेणार, असा प्रश्न आहे. 

१० निलंबने केली आयुक्तांनी विभागीय आयुक्तांनी निलंबनाच्या अधिकारात मागील काही वर्षांत १० निलंबने केल्याची माहिती पुढे आली आहे. ७ प्रकरणे खात्याचे मंत्री आणि सचिवांशी निगडित आहेत, तर ३ प्रकरणे लाचलुचपत खात्याशी निगडित आहेत. ७ प्रकरणांमध्ये मंत्री आणि सचिवांनी निलंबनाचे आदेश आयुक्तांना दिले आहेत, तर ३ प्रकरणांत संबंधित अधिकारी लाचेच्या प्रकरणात तुरुं गात गेले होते. त्यामुळे आयुक्तांनी सदरील प्रकरणात त्या अधिकार्‍यांचे निलंबन केले होते. महसूल प्रधान सचिव विभागप्रमुख आहेत की विभागीय आयुक्त विभागप्रमुख आहेत, निलंबनाचे अधिकार कोणाला आहेत. हा विषय सध्या तरी संशोधनाचा झालेला आहे. 

पोलीस अभिप्राय मागणारनिलंबित उपजिल्हाधिकारी कटके यांनी आयुक्त डॉ.भापकर यांच्या विरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या अ‍ॅट्रॉसिटी व लाच मागितल्याच्या तक्रारीबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्या तक्रारीचा अभ्यास करून शहर पोलिसांनी शासनाकडे अहवाल पाठवून पुढील कार्यवाहीसंदर्भात मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद