शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

By admin | Updated: December 19, 2014 00:59 IST

प्रश्न : महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त का आहेत? उत्तर : डॉ. आर. एस. देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रातला शेतकरी हा पूर्णत: सरकारवरच अवलंबून आहे.

प्रश्न : महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त का आहेत?उत्तर : डॉ. आर. एस. देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रातला शेतकरी हा पूर्णत: सरकारवरच अवलंबून आहे. सरकारच आमचे सर्व काही करू शकेल, अशी मानसिकता येथील शेतकऱ्यांची झालेली आहे. जेव्हा परावलंबी माणूस हतबल होतो, तेव्हा त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. दुसरीकडे शेतीचा पोत कमी झालेला आहे. जमिनीची प्रतिकारशक्ती खालावलेली आहे. सिंचनक्षमता वाईट आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने सिंचनावर सर्वाधिक खर्च केलेला आहे. तरीसुद्धा मागील १०-११ वर्षांत अवघ्या १ टक्का एवढीच सिंचनात वाढ होऊ शकली, हे दुर्दैव. प्रश्न : आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना अपेक्षित आहे?उत्तर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर त्यांनी स्वत:चा मार्ग स्वत:च निवडण्याची मानसिकता केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी छोटे-छोटे गट स्थापन केले पाहिजे. त्यात सरकारचा होणारा हस्तक्षेप झुगारला पाहिजे. शेतमालाच्या किमतीची ‘बार्गेनिंग’ करण्याची ताकद वाढविली पाहिजे. पीक पद्धती बदलली पाहिजे. सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता आता बदलली पाहिजे.प्रश्न : शेतकरी हा सतत भरडला जातो ?उत्तर : तो सर्वात जास्त भरडला जातो बाजारात. माल विकण्यासाठी जेव्हा शेतकरी बाजारात जातो. तेव्हा मालाच्या किमतीची ‘बार्गेनिंग’करण्यामध्ये शेतकरी कमी पडतो. शेतकऱ्याला मालाचा भाव ठरवता येत नाही. दुसरेच भाव ठरवतात. जणू काही शेतकरी हा भाव ठरवून घेण्यासाठीच असतो, अशी भावना बाजारातल्या दलालांची आणि अडत्यावाल्यांची झालेली आहे. जो पर्यंत शेतकरी हा आपल्या मालाचा भाव ठरवणार नाही, तोपर्यंत तो सक्षम होणारच नाही. प्रश्न : शेतीचे चुकलेले अर्थकारण आणि सरकारच्या धोरणाबद्दल आपण काय म्हणाल?उत्तर : महाराष्ट्रात शेतीचे अर्थकारण कोलमडलेले आहे. या राज्यात एखादे कृषी धोरण अमलात आणले असे वाटत नाही. अमुक एक पीकपद्धती वापरली पाहिजे, बाजार पद्धत विकसित केली पाहिजे, असे कुठेच दिसत नाही. शेजारचे राज्य असलेल्या कर्नाटकात आतापर्यंत ४ कृषी धोरणे अमलात आलेली आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रात एकही धोरण अमलात आणले, असे मी ऐकलेले नाही. या राज्यात कृषी खात्याला गौण समजले जाते. पूर्वी ज्या राज्यात हरित क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख यांना ओळखले जायचे. त्यांनी स्वत: मागून कृषी मंत्रालय घेतले होते. आता ते बळजबरीने कोणाच्या तरी गळ्यात टाकले जाते.