शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

By admin | Updated: December 19, 2014 00:59 IST

प्रश्न : महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त का आहेत? उत्तर : डॉ. आर. एस. देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रातला शेतकरी हा पूर्णत: सरकारवरच अवलंबून आहे.

प्रश्न : महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त का आहेत?उत्तर : डॉ. आर. एस. देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रातला शेतकरी हा पूर्णत: सरकारवरच अवलंबून आहे. सरकारच आमचे सर्व काही करू शकेल, अशी मानसिकता येथील शेतकऱ्यांची झालेली आहे. जेव्हा परावलंबी माणूस हतबल होतो, तेव्हा त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. दुसरीकडे शेतीचा पोत कमी झालेला आहे. जमिनीची प्रतिकारशक्ती खालावलेली आहे. सिंचनक्षमता वाईट आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने सिंचनावर सर्वाधिक खर्च केलेला आहे. तरीसुद्धा मागील १०-११ वर्षांत अवघ्या १ टक्का एवढीच सिंचनात वाढ होऊ शकली, हे दुर्दैव. प्रश्न : आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना अपेक्षित आहे?उत्तर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर त्यांनी स्वत:चा मार्ग स्वत:च निवडण्याची मानसिकता केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी छोटे-छोटे गट स्थापन केले पाहिजे. त्यात सरकारचा होणारा हस्तक्षेप झुगारला पाहिजे. शेतमालाच्या किमतीची ‘बार्गेनिंग’ करण्याची ताकद वाढविली पाहिजे. पीक पद्धती बदलली पाहिजे. सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता आता बदलली पाहिजे.प्रश्न : शेतकरी हा सतत भरडला जातो ?उत्तर : तो सर्वात जास्त भरडला जातो बाजारात. माल विकण्यासाठी जेव्हा शेतकरी बाजारात जातो. तेव्हा मालाच्या किमतीची ‘बार्गेनिंग’करण्यामध्ये शेतकरी कमी पडतो. शेतकऱ्याला मालाचा भाव ठरवता येत नाही. दुसरेच भाव ठरवतात. जणू काही शेतकरी हा भाव ठरवून घेण्यासाठीच असतो, अशी भावना बाजारातल्या दलालांची आणि अडत्यावाल्यांची झालेली आहे. जो पर्यंत शेतकरी हा आपल्या मालाचा भाव ठरवणार नाही, तोपर्यंत तो सक्षम होणारच नाही. प्रश्न : शेतीचे चुकलेले अर्थकारण आणि सरकारच्या धोरणाबद्दल आपण काय म्हणाल?उत्तर : महाराष्ट्रात शेतीचे अर्थकारण कोलमडलेले आहे. या राज्यात एखादे कृषी धोरण अमलात आणले असे वाटत नाही. अमुक एक पीकपद्धती वापरली पाहिजे, बाजार पद्धत विकसित केली पाहिजे, असे कुठेच दिसत नाही. शेजारचे राज्य असलेल्या कर्नाटकात आतापर्यंत ४ कृषी धोरणे अमलात आलेली आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रात एकही धोरण अमलात आणले, असे मी ऐकलेले नाही. या राज्यात कृषी खात्याला गौण समजले जाते. पूर्वी ज्या राज्यात हरित क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख यांना ओळखले जायचे. त्यांनी स्वत: मागून कृषी मंत्रालय घेतले होते. आता ते बळजबरीने कोणाच्या तरी गळ्यात टाकले जाते.