शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

By admin | Updated: December 19, 2014 00:59 IST

प्रश्न : महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त का आहेत? उत्तर : डॉ. आर. एस. देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रातला शेतकरी हा पूर्णत: सरकारवरच अवलंबून आहे.

प्रश्न : महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त का आहेत?उत्तर : डॉ. आर. एस. देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रातला शेतकरी हा पूर्णत: सरकारवरच अवलंबून आहे. सरकारच आमचे सर्व काही करू शकेल, अशी मानसिकता येथील शेतकऱ्यांची झालेली आहे. जेव्हा परावलंबी माणूस हतबल होतो, तेव्हा त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. दुसरीकडे शेतीचा पोत कमी झालेला आहे. जमिनीची प्रतिकारशक्ती खालावलेली आहे. सिंचनक्षमता वाईट आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने सिंचनावर सर्वाधिक खर्च केलेला आहे. तरीसुद्धा मागील १०-११ वर्षांत अवघ्या १ टक्का एवढीच सिंचनात वाढ होऊ शकली, हे दुर्दैव. प्रश्न : आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना अपेक्षित आहे?उत्तर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर त्यांनी स्वत:चा मार्ग स्वत:च निवडण्याची मानसिकता केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी छोटे-छोटे गट स्थापन केले पाहिजे. त्यात सरकारचा होणारा हस्तक्षेप झुगारला पाहिजे. शेतमालाच्या किमतीची ‘बार्गेनिंग’ करण्याची ताकद वाढविली पाहिजे. पीक पद्धती बदलली पाहिजे. सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता आता बदलली पाहिजे.प्रश्न : शेतकरी हा सतत भरडला जातो ?उत्तर : तो सर्वात जास्त भरडला जातो बाजारात. माल विकण्यासाठी जेव्हा शेतकरी बाजारात जातो. तेव्हा मालाच्या किमतीची ‘बार्गेनिंग’करण्यामध्ये शेतकरी कमी पडतो. शेतकऱ्याला मालाचा भाव ठरवता येत नाही. दुसरेच भाव ठरवतात. जणू काही शेतकरी हा भाव ठरवून घेण्यासाठीच असतो, अशी भावना बाजारातल्या दलालांची आणि अडत्यावाल्यांची झालेली आहे. जो पर्यंत शेतकरी हा आपल्या मालाचा भाव ठरवणार नाही, तोपर्यंत तो सक्षम होणारच नाही. प्रश्न : शेतीचे चुकलेले अर्थकारण आणि सरकारच्या धोरणाबद्दल आपण काय म्हणाल?उत्तर : महाराष्ट्रात शेतीचे अर्थकारण कोलमडलेले आहे. या राज्यात एखादे कृषी धोरण अमलात आणले असे वाटत नाही. अमुक एक पीकपद्धती वापरली पाहिजे, बाजार पद्धत विकसित केली पाहिजे, असे कुठेच दिसत नाही. शेजारचे राज्य असलेल्या कर्नाटकात आतापर्यंत ४ कृषी धोरणे अमलात आलेली आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रात एकही धोरण अमलात आणले, असे मी ऐकलेले नाही. या राज्यात कृषी खात्याला गौण समजले जाते. पूर्वी ज्या राज्यात हरित क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख यांना ओळखले जायचे. त्यांनी स्वत: मागून कृषी मंत्रालय घेतले होते. आता ते बळजबरीने कोणाच्या तरी गळ्यात टाकले जाते.