शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

शासनाने काढले अन् दुष्काळाने लादले

By admin | Updated: December 22, 2015 00:11 IST

विनोद जाधव , लासूर स्टेशन शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या सरासरी दहा टक्के असावे, त्याकरिता राज्यस्तरीय नियोजन करण्यात आले आहे.

विनोद जाधव , लासूर स्टेशनशालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या सरासरी दहा टक्के असावे, त्याकरिता राज्यस्तरीय नियोजन करण्यात आले आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शाळेत पिण्याचे पाणीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच किलोभर वजनाची पाण्याची बाटली सोबत घेऊन शाळा गाठावी लागत आहे. ‘शासनाने काढलेले वजन दुष्काळाने पुन्हा लादले’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या वीस ते तीस टक्के असल्याचे निदर्शनास आले होते. या अतिरिक्त वजनामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आजार उद्भवू शकतात, असे तज्ज्ञांच्या अहवालावरून स्पष्ट झाले. ‘हे विद्यार्थी की ओझे वाहणारे हमाल’ अशी हेटाळणीही केली जात होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे त्यांच्या वजनाच्या दहा टक्के करण्यासाठी शासनाने राज्यस्तरावर अंमलबजावणी सुरू केली आहे.पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वजन वीस किलोपेक्षा जास्त व बेचाळीस किलोपर्यंत असते. याप्रमाणे दप्तराचे वजन दोन किलो ते सव्वा चार किलो अपेक्षित आहे. सहा ते सात तास शाळेत विद्यार्थ्यांना बसावे लागते, त्यावेळेस त्यांना या ऋतूत किमान एक लिटर पाण्याची गरज असते, असे तज्ज्ञ डॉ. गणेश डोईफोडे यांनी सांगितले. ही गरज भागविण्यासाठी शाळेत पाणी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरातील अनेक शाळांत पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच एक किलो वजनाच्या पाण्याच्या बाटलीचे ओझे घेऊन शाळा गाठावी लागत आहे. यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.लासूर स्टेशन येथील न्यू हायस्कूल शाळेत ८७० विद्यार्थ्यांपैकी ३०० विद्यार्थी पंचक्रोशीतील गावातून किमान १० किलोमीटर अंतराहून येतात. स्थानिक विद्यार्थ्यांपेक्षा त्यांना वजनाचा जास्त त्रास होतो. मुख्याध्यापक कहाटे यांनी सांगितले की, शाळेत पाणी उपलब्ध असल्यास घरून पाणी आणण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पाण्याचे वजन कमी होईल. सिद्धनाथ वाडगाव येथील न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक पटारे यांनी आॅगस्ट महिन्यात ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच गेल्या वर्षी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली होती; परंतु अद्यापही शाळेला पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना घरूनच पाणी आणावे लागते, तर पोषण आहारासाठी पाणी विकत घ्यावे लागते, असेही त्यांनी सांगितले.