शहरं
Join us  
Trending Stories
1
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
2
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
3
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
4
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
5
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
6
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
7
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
8
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
9
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
10
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
11
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
12
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
13
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
14
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
15
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
16
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
17
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
18
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
19
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
20
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने काढले अन् दुष्काळाने लादले

By admin | Updated: December 22, 2015 00:11 IST

विनोद जाधव , लासूर स्टेशन शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या सरासरी दहा टक्के असावे, त्याकरिता राज्यस्तरीय नियोजन करण्यात आले आहे.

विनोद जाधव , लासूर स्टेशनशालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या सरासरी दहा टक्के असावे, त्याकरिता राज्यस्तरीय नियोजन करण्यात आले आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शाळेत पिण्याचे पाणीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच किलोभर वजनाची पाण्याची बाटली सोबत घेऊन शाळा गाठावी लागत आहे. ‘शासनाने काढलेले वजन दुष्काळाने पुन्हा लादले’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या वीस ते तीस टक्के असल्याचे निदर्शनास आले होते. या अतिरिक्त वजनामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आजार उद्भवू शकतात, असे तज्ज्ञांच्या अहवालावरून स्पष्ट झाले. ‘हे विद्यार्थी की ओझे वाहणारे हमाल’ अशी हेटाळणीही केली जात होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे त्यांच्या वजनाच्या दहा टक्के करण्यासाठी शासनाने राज्यस्तरावर अंमलबजावणी सुरू केली आहे.पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वजन वीस किलोपेक्षा जास्त व बेचाळीस किलोपर्यंत असते. याप्रमाणे दप्तराचे वजन दोन किलो ते सव्वा चार किलो अपेक्षित आहे. सहा ते सात तास शाळेत विद्यार्थ्यांना बसावे लागते, त्यावेळेस त्यांना या ऋतूत किमान एक लिटर पाण्याची गरज असते, असे तज्ज्ञ डॉ. गणेश डोईफोडे यांनी सांगितले. ही गरज भागविण्यासाठी शाळेत पाणी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरातील अनेक शाळांत पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच एक किलो वजनाच्या पाण्याच्या बाटलीचे ओझे घेऊन शाळा गाठावी लागत आहे. यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.लासूर स्टेशन येथील न्यू हायस्कूल शाळेत ८७० विद्यार्थ्यांपैकी ३०० विद्यार्थी पंचक्रोशीतील गावातून किमान १० किलोमीटर अंतराहून येतात. स्थानिक विद्यार्थ्यांपेक्षा त्यांना वजनाचा जास्त त्रास होतो. मुख्याध्यापक कहाटे यांनी सांगितले की, शाळेत पाणी उपलब्ध असल्यास घरून पाणी आणण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पाण्याचे वजन कमी होईल. सिद्धनाथ वाडगाव येथील न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक पटारे यांनी आॅगस्ट महिन्यात ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच गेल्या वर्षी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली होती; परंतु अद्यापही शाळेला पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना घरूनच पाणी आणावे लागते, तर पोषण आहारासाठी पाणी विकत घ्यावे लागते, असेही त्यांनी सांगितले.