शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

फळबागा वाचविण्यासाठी शासनाला साकडे

By admin | Updated: July 9, 2015 00:18 IST

राजेश खराडे , बीड मध्यंतरीच्या अवकाळीने व आताच्या पावसाच्या ओढीने जिल्ह्यातील फळबागा धोक्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अद्यापपर्यंत

राजेश खराडे , बीडमध्यंतरीच्या अवकाळीने व आताच्या पावसाच्या ओढीने जिल्ह्यातील फळबागा धोक्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अद्यापपर्यंत ३ कोटी ९८ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना देखील मदत मिळवून देण्याकरिता कृषी विभागाने प्रशासनाकडे साकडे घातले असून, ५ कोटी ६० लाख रूपयांची मागणी केली आहे.मध्यंतरीचा अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका आष्टी तालुक्यातील फळबागायतदारांना बसला होता. त्यामुळे हजारो हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले होते. यामुळे फळबागा संकटात सापडल्या होत्या. यामधूनही बचाव होण्याकरिता शेतकऱ्यांनी प्रशासकीय मदतीची मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून येथील कृषी विभागाने ३ कोटी ९८ लाख रूपयांचे वाटप केले असल्याचे कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड यांनी सांगितले. वाटप केलेल्या रकमेत ३६४५ हेक्टरावर फळबागा आहेत. जिल्ह्यातील सुमारे ५८४० फळबागायतदारांना याचा अद्याप लाभ भेटला आहे. तरी जिल्ह्यातील सुमारे ७२६६ शेतकरी मदतीविनाच आहेत. त्यामुळे ४५३९ हेक्टवरील फळबागांवर धोक्याची घंटा आहे.फळबागा जगविण्यासाठी छाटणी, पीक संरक्षण, पुनर्जीवन, कीड व्यवस्थापन करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली आहे. जिल्ह्यातील फळबागांचे नुकसान पाहता कृषी विभागाने १० कोटी रूपयांची मागणी केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३ कोटी ९८ लाख रूपये उपलब्ध झाले होते. उर्वरित ७२६६ फळबागायतदारांकरिता वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आहे.