शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

फळबागा वाचविण्यासाठी शासनाला साकडे

By admin | Updated: July 9, 2015 00:18 IST

राजेश खराडे , बीड मध्यंतरीच्या अवकाळीने व आताच्या पावसाच्या ओढीने जिल्ह्यातील फळबागा धोक्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अद्यापपर्यंत

राजेश खराडे , बीडमध्यंतरीच्या अवकाळीने व आताच्या पावसाच्या ओढीने जिल्ह्यातील फळबागा धोक्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अद्यापपर्यंत ३ कोटी ९८ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना देखील मदत मिळवून देण्याकरिता कृषी विभागाने प्रशासनाकडे साकडे घातले असून, ५ कोटी ६० लाख रूपयांची मागणी केली आहे.मध्यंतरीचा अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका आष्टी तालुक्यातील फळबागायतदारांना बसला होता. त्यामुळे हजारो हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले होते. यामुळे फळबागा संकटात सापडल्या होत्या. यामधूनही बचाव होण्याकरिता शेतकऱ्यांनी प्रशासकीय मदतीची मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून येथील कृषी विभागाने ३ कोटी ९८ लाख रूपयांचे वाटप केले असल्याचे कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड यांनी सांगितले. वाटप केलेल्या रकमेत ३६४५ हेक्टरावर फळबागा आहेत. जिल्ह्यातील सुमारे ५८४० फळबागायतदारांना याचा अद्याप लाभ भेटला आहे. तरी जिल्ह्यातील सुमारे ७२६६ शेतकरी मदतीविनाच आहेत. त्यामुळे ४५३९ हेक्टवरील फळबागांवर धोक्याची घंटा आहे.फळबागा जगविण्यासाठी छाटणी, पीक संरक्षण, पुनर्जीवन, कीड व्यवस्थापन करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली आहे. जिल्ह्यातील फळबागांचे नुकसान पाहता कृषी विभागाने १० कोटी रूपयांची मागणी केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३ कोटी ९८ लाख रूपये उपलब्ध झाले होते. उर्वरित ७२६६ फळबागायतदारांकरिता वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आहे.