शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

फळबागा वाचविण्यासाठी शासनाला साकडे

By admin | Updated: July 9, 2015 00:18 IST

राजेश खराडे , बीड मध्यंतरीच्या अवकाळीने व आताच्या पावसाच्या ओढीने जिल्ह्यातील फळबागा धोक्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अद्यापपर्यंत

राजेश खराडे , बीडमध्यंतरीच्या अवकाळीने व आताच्या पावसाच्या ओढीने जिल्ह्यातील फळबागा धोक्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अद्यापपर्यंत ३ कोटी ९८ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना देखील मदत मिळवून देण्याकरिता कृषी विभागाने प्रशासनाकडे साकडे घातले असून, ५ कोटी ६० लाख रूपयांची मागणी केली आहे.मध्यंतरीचा अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका आष्टी तालुक्यातील फळबागायतदारांना बसला होता. त्यामुळे हजारो हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले होते. यामुळे फळबागा संकटात सापडल्या होत्या. यामधूनही बचाव होण्याकरिता शेतकऱ्यांनी प्रशासकीय मदतीची मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून येथील कृषी विभागाने ३ कोटी ९८ लाख रूपयांचे वाटप केले असल्याचे कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड यांनी सांगितले. वाटप केलेल्या रकमेत ३६४५ हेक्टरावर फळबागा आहेत. जिल्ह्यातील सुमारे ५८४० फळबागायतदारांना याचा अद्याप लाभ भेटला आहे. तरी जिल्ह्यातील सुमारे ७२६६ शेतकरी मदतीविनाच आहेत. त्यामुळे ४५३९ हेक्टवरील फळबागांवर धोक्याची घंटा आहे.फळबागा जगविण्यासाठी छाटणी, पीक संरक्षण, पुनर्जीवन, कीड व्यवस्थापन करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली आहे. जिल्ह्यातील फळबागांचे नुकसान पाहता कृषी विभागाने १० कोटी रूपयांची मागणी केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३ कोटी ९८ लाख रूपये उपलब्ध झाले होते. उर्वरित ७२६६ फळबागायतदारांकरिता वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आहे.