शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पर्यायी स्त्रोत मिळाले

By admin | Updated: September 6, 2014 00:28 IST

नांदेड : शहर व परिसराची भिस्त विष्णूपुरी जलाशयावरच अवलंबून आहे़ त्यामुळे टंचाईच्या काळात पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी मनपाने महत्वाकांक्षी योजना शासनाकडे सादर केली होती़

नांदेड : शहर व परिसराची भिस्त विष्णूपुरी जलाशयावरच अवलंबून आहे़ त्यामुळे टंचाईच्या काळात पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी मनपाने महत्वाकांक्षी योजना शासनाकडे सादर केली होती़ त्यानुसार, पैनंगगा नदीवरील इसापूर धरणाचे पाणी कॅनालद्वारे नंतर नाल्याद्वारे काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणार आहे़ या योजनेसाठी १४़८७ कोटींच्या निधीलाही मंजुरी मिळाली आहे़शहराची पाणीपुरवठा योजना गोदावरीवर अवलंबून आहे़ मागील दहा वर्षांत जेव्हा-जेव्हा गोदावरीच्या खोऱ्यात अल्पवृष्टी झाली तेव्हा-तेव्हा शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ या काळात जायकवाडी, सिद्धेश्वर व येलदरी या तीन धरणातून पाणी घेण्यात येत होते़ यंदा मात्र या तीनही धरणांत अत्यंत अल्प पाणीसाठा असल्यामुळे पाणी मिळण्याची शक्यता कमी झालेली होती़ त्यात विष्णूपुरीमध्येही केवळ ८ दलघमी पाणी राहिले होते़ त्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत होते़ या सर्व बाबी लक्षात घेवून २०१५ मधील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता मनपाने शहरासाठी खात्रीशिर पर्यायी स्त्रोत निर्माण होण्याच्या दृष्टीने योजना तयार केली होती़ त्यानुसार, इसापूर धरणाचे पाणी कॅनालद्वारे अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथपर्यंत आणण्यात येईल़ त्यापुढे मेंढला नाल्याद्वारे महादेव पिंपळगाव व सांगवी बंधाऱ्यात घेवून सांगवी येथे आसना नदीवर विहिरीचे बांधकाम करुन पम्पींगद्वारे काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणाऱ या योजनेसाठी १४़८७ कोटी रुपयांना शासनाने २६ आॅगस्ट रोजी मान्यता दिली असून येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे़ त्यानंतर गोदावरी नदी व पैनगंगा नदीवरील विष्णूपुरी व इसापूर धरण हे दोन स्त्रोत कायमचे उपलब्ध होणार असल्यामुळे शहराला यापुढे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही़ या योजनेसाठी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण, पालकमंत्री डी़ पी़ सावंत, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी धीरजकुमार, महापौर अब्दुल सत्तार, आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे यांनी प्रयत्न केले़ (प्रतिनिधी)विष्णूपुरी बंधाऱ्याने तळ गाठल्यावर शहरात पाणी कपात करण्यात येते़ वेळप्रसंगी सिद्धेश्वर, येलदरी येथून पाणी आणावे लागते, परंतु आता पैनगंगेवरील इसापूर धरणातूनही पाणी उपलब्ध होणार आहे़