शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

पर्यायी स्त्रोत मिळाले

By admin | Updated: September 6, 2014 00:28 IST

नांदेड : शहर व परिसराची भिस्त विष्णूपुरी जलाशयावरच अवलंबून आहे़ त्यामुळे टंचाईच्या काळात पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी मनपाने महत्वाकांक्षी योजना शासनाकडे सादर केली होती़

नांदेड : शहर व परिसराची भिस्त विष्णूपुरी जलाशयावरच अवलंबून आहे़ त्यामुळे टंचाईच्या काळात पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी मनपाने महत्वाकांक्षी योजना शासनाकडे सादर केली होती़ त्यानुसार, पैनंगगा नदीवरील इसापूर धरणाचे पाणी कॅनालद्वारे नंतर नाल्याद्वारे काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणार आहे़ या योजनेसाठी १४़८७ कोटींच्या निधीलाही मंजुरी मिळाली आहे़शहराची पाणीपुरवठा योजना गोदावरीवर अवलंबून आहे़ मागील दहा वर्षांत जेव्हा-जेव्हा गोदावरीच्या खोऱ्यात अल्पवृष्टी झाली तेव्हा-तेव्हा शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ या काळात जायकवाडी, सिद्धेश्वर व येलदरी या तीन धरणातून पाणी घेण्यात येत होते़ यंदा मात्र या तीनही धरणांत अत्यंत अल्प पाणीसाठा असल्यामुळे पाणी मिळण्याची शक्यता कमी झालेली होती़ त्यात विष्णूपुरीमध्येही केवळ ८ दलघमी पाणी राहिले होते़ त्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत होते़ या सर्व बाबी लक्षात घेवून २०१५ मधील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता मनपाने शहरासाठी खात्रीशिर पर्यायी स्त्रोत निर्माण होण्याच्या दृष्टीने योजना तयार केली होती़ त्यानुसार, इसापूर धरणाचे पाणी कॅनालद्वारे अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथपर्यंत आणण्यात येईल़ त्यापुढे मेंढला नाल्याद्वारे महादेव पिंपळगाव व सांगवी बंधाऱ्यात घेवून सांगवी येथे आसना नदीवर विहिरीचे बांधकाम करुन पम्पींगद्वारे काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणाऱ या योजनेसाठी १४़८७ कोटी रुपयांना शासनाने २६ आॅगस्ट रोजी मान्यता दिली असून येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे़ त्यानंतर गोदावरी नदी व पैनगंगा नदीवरील विष्णूपुरी व इसापूर धरण हे दोन स्त्रोत कायमचे उपलब्ध होणार असल्यामुळे शहराला यापुढे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही़ या योजनेसाठी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण, पालकमंत्री डी़ पी़ सावंत, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी धीरजकुमार, महापौर अब्दुल सत्तार, आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे यांनी प्रयत्न केले़ (प्रतिनिधी)विष्णूपुरी बंधाऱ्याने तळ गाठल्यावर शहरात पाणी कपात करण्यात येते़ वेळप्रसंगी सिद्धेश्वर, येलदरी येथून पाणी आणावे लागते, परंतु आता पैनगंगेवरील इसापूर धरणातूनही पाणी उपलब्ध होणार आहे़