शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

गोपीनाथ मुंडे अपघात विमा भरपाई किचकट प्रक्रियेमुळे मिळेना!

By admin | Updated: January 25, 2017 00:47 IST

जालना : शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू अथवा अपंगत्व आल्यावर गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेतून मदत दिली जाते.

जालना : शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू अथवा अपंगत्व आल्यावर गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेतून मदत दिली जाते. वर्षभरात जिल्ह्यातील १०९ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, केवळ दहा शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. ९९ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने कागदपत्रांची जमवाजमव करताना संबंधित शेतकरी त्रस्त आहेत.विमा मिळविण्यासाठी योजना चांगली असली तरी दोन लाख रूपयांसाठी विविध प्रकारची कागदपत्रे वेगवेगळ्या कार्यालयातून संकलित करावे लागतात. ग्रामीण भागात कागदपत्र सहज मिळत नसल्याने समस्या बिकट बनली आहे. बहुतांश शेतकरी विमा काढण्याकडे दुर्लक्ष करतात. आर्थिक विवंचनेमुळे विम्याचे हप्ते भरण्यास अडचणी येतात. दरम्यान, शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मदत मिळावी म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. या योजनेला शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे. परंतु दरवर्षी विमा कंपनी बदलत असल्याने शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळण्यास मर्यादा येते. २०१५-२०१६ मध्ये जिल्ह्यात एकूण १०९ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १०२ शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रस्ताव त्यांच्या कुटुंबियांनी तर दोन अपंगत्वाचे प्रस्ताव संबंधित शेतकऱ्यांनी दाखल केले. यासाठी लाभार्थी कुटुंबियांनी सातबारासह विविध १३ प्रकारची कागदपत्रे गोळा करून प्रस्ताव सादर केले.कृषी विभागाने प्रस्तावांचे संकलन करून संबंधित विमा कंपनीला ते पाठविले. त्यानुसार केवळ ९ मृत शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रूपये याप्रमाणे मदत मिळू शकली. इतर शेतकऱ्यांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. कृषी विभागातील संबंधित विभाग पाहणारे वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा जायका या सेवा पुरवठादार कपंनीने सदर प्रस्तावाचे संकलन केले असून, युनायटेड इशुरन्स ही कंपनी विमा वाटप करते. वर्षभरात १०९ प्रस्ताव दाखल होऊनही फक्त १० शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला. इतर शेतकऱ्यांच्या प्रस्तावाबाबत नेमके काय झाले याबाबत विमा कंपनीच सांगू शकेल असे त्यांचे म्हणणे आहे. प्रस्ताव पाठविल्यानंतर विमा कंपनी पुन्हा फेरतपासणी करून विमा द्यायचा की नाही निश्चित करते.गतवर्षीही ८७ प्रस्तावांपैकी फक्त आठ ते दहा शेतकऱ्यांना फायदा मिळाला. प्रस्तावांची तपासणी सुरू असल्याचे संबंधित विमाकडून सांगण्यात येते असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)