शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! छत्रपती संभाजीनगरहून विमानाने सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी परत येता येणार

By संतोष हिरेमठ | Updated: June 14, 2023 14:24 IST

मुंबईसाठी जुलैपासून छत्रपती संभाजीनगरहून सायंकाळी ‘टेकऑफ’

छत्रपती संभाजीनगर : तब्बल ९७ दिवसांनंतर अखेर १ जुलैपासून इंडिगोकडून पुन्हा एकदा सायंकाळच्या वेळेत मुंबई-छत्रपती संभाजीनगर-मुंबई विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून पर्यटक, उद्योजक आणि प्रवाशांची मुंबई विमान प्रवासासाठी होणारी गैरसोय संपणार आहे. सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी पुन्हा शहरात परतणे शक्य होणार आहे.

इंडिगोने २६ मार्चपासून सायंकाळी उड्डाण घेणारे मुंबईचे विमान अचानक बंद केले. त्यामुळे प्रवाशांना विमानाने मुंबईहून शहरात येण्यासाठी आणि शहरातून मुंबई गाठण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत होता. शहरातील विमानसेवेच्या अवस्थेविषयी ’लोकमत’ने ‘विमानसेवा जमिनीवर’ ही वृत्तमालिका प्रकाशित करून विमानसेवेसाठी पाठपुरावा केला तेव्हा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड आणि खा. इम्तियाज जलिल यांनी मुंबईसाठी सायंकाळचे विमान पुन्हा सुरू होईल, असे सांगितले होते.

आजघडीला मुंबईसाठी एअर इंडिया आणि इंडिगोकडून सकाळच्या वेळेतच विमानसेवा आहे. त्यामुळे सकाळीच विमानतळावर जावे लागते. परंतु आता १ जुलैपासून सकाळच्या वेळेतील दोन विमानांबरोबर सायंकाळीही मुंबईसाठी विमान उपलब्ध राहणार आहे.

मुंबईच्या सायंकाळच्या विमानाचे वेळापत्रक- मुंबईहून सायं. ६.१० वाजता उड्डाण आणि सायं.७.२० वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन.- छत्रपती संभाजीनगरहून रात्री ७.५० वाजता उड्डाण आणि रात्री ९ वाजता मुंबईत पोहोचणार.

सर्वांच्या प्रयत्नांमुळे यशसर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मुंबईची सायंकाळची विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे. हा सगळ्यांचाच विजय आहे. अहमदाबाद आणि उदयपूर विमानसेवा सुरू होण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन

आता ८ विमानांची ये-जामुंबईसाठी सायंकाळच्या विमानाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. मुंबईचे सायंकाळचे विमान सुरू झाल्यानंतर दिवसभरात ८ विमानांची ये-जा म्हणजे १६ उड्डाणे होतील.- शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ