शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

गुड न्यूज! छत्रपती संभाजीनगरहून विमानाने सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी परत येता येणार

By संतोष हिरेमठ | Updated: June 14, 2023 14:24 IST

मुंबईसाठी जुलैपासून छत्रपती संभाजीनगरहून सायंकाळी ‘टेकऑफ’

छत्रपती संभाजीनगर : तब्बल ९७ दिवसांनंतर अखेर १ जुलैपासून इंडिगोकडून पुन्हा एकदा सायंकाळच्या वेळेत मुंबई-छत्रपती संभाजीनगर-मुंबई विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून पर्यटक, उद्योजक आणि प्रवाशांची मुंबई विमान प्रवासासाठी होणारी गैरसोय संपणार आहे. सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी पुन्हा शहरात परतणे शक्य होणार आहे.

इंडिगोने २६ मार्चपासून सायंकाळी उड्डाण घेणारे मुंबईचे विमान अचानक बंद केले. त्यामुळे प्रवाशांना विमानाने मुंबईहून शहरात येण्यासाठी आणि शहरातून मुंबई गाठण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत होता. शहरातील विमानसेवेच्या अवस्थेविषयी ’लोकमत’ने ‘विमानसेवा जमिनीवर’ ही वृत्तमालिका प्रकाशित करून विमानसेवेसाठी पाठपुरावा केला तेव्हा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड आणि खा. इम्तियाज जलिल यांनी मुंबईसाठी सायंकाळचे विमान पुन्हा सुरू होईल, असे सांगितले होते.

आजघडीला मुंबईसाठी एअर इंडिया आणि इंडिगोकडून सकाळच्या वेळेतच विमानसेवा आहे. त्यामुळे सकाळीच विमानतळावर जावे लागते. परंतु आता १ जुलैपासून सकाळच्या वेळेतील दोन विमानांबरोबर सायंकाळीही मुंबईसाठी विमान उपलब्ध राहणार आहे.

मुंबईच्या सायंकाळच्या विमानाचे वेळापत्रक- मुंबईहून सायं. ६.१० वाजता उड्डाण आणि सायं.७.२० वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन.- छत्रपती संभाजीनगरहून रात्री ७.५० वाजता उड्डाण आणि रात्री ९ वाजता मुंबईत पोहोचणार.

सर्वांच्या प्रयत्नांमुळे यशसर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मुंबईची सायंकाळची विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे. हा सगळ्यांचाच विजय आहे. अहमदाबाद आणि उदयपूर विमानसेवा सुरू होण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन

आता ८ विमानांची ये-जामुंबईसाठी सायंकाळच्या विमानाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. मुंबईचे सायंकाळचे विमान सुरू झाल्यानंतर दिवसभरात ८ विमानांची ये-जा म्हणजे १६ उड्डाणे होतील.- शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ