शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मराठी चित्रपटांना चांगले दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:31 IST

गेल्या दहा वर्षांत मराठी चित्रपटात बदल झाला असून, राष्ट्रीय पुरस्कारासाठी अग्रस्थानी असलेल्या मल्याळम, तामिळी चित्रपटांची जागा आता मराठी सिनेमा घेत आहेत, असे मत दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘गेल्या दहा वर्षांत मराठी चित्रपटात बदल झाला असून, राष्ट्रीय पुरस्कारासाठी अग्रस्थानी असलेल्या मल्याळम, तामिळी चित्रपटांची जागा आता मराठी सिनेमा घेत आहेत, असे मत दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले. शहरात आयोजित पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात रविवारी ते बोलत होते. या महोत्सवात क्षितिज चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र औरंगाबाद, नाथ ग्रुप, एमजीएमतर्फे प्रोझोन मॉलच्या आयनॉक्स थिएटरमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले होते. सांगता समारंभात महोत्सवाचे संचालक अशोक राणे, अभिनेता उपेंद्र लिमये, परीक्षक विकास देसाई, अ‍ॅनी कॅटलिग, अजित दळवी, सुजाता कांगो, सचिन मुळे, नंदकिशोर कागलीवाल, सतीश कागलीवाल, दासू वैद्य, डॉ. रेखा शेळके, सिद्धार्थ मनोहर, विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, मोहम्मद अर्शद, शिव कदम, नीलेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गोपालकृष्णन म्हणाले, माझ्यावर व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या गाण्याचा प्रभाव होता. साठच्या दशकात मी पुण्याच्या एफटीआयला प्रवेश घेतला. याठिकाणी तेव्हा मराठी मुले दुर्मिळ होती. मराठी भाषा, नाटक, संगीत यांची महाराष्ट्रात एक मोठी परंपरा आहे. गेल्या दहा वर्षांत मराठी सिनेमांना चांगला काळ आलाआहे. जयप्रद देसाई यांनी सूत्रसंचालन केले.