शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

‘गोल्डन ट्रँगल’ एक वर्षानंतर

By admin | Updated: May 10, 2016 01:00 IST

विकास राऊत , औरंगाबाद दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला ‘गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगल’मध्ये आणण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांचा

विकास राऊत , औरंगाबाददिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला ‘गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगल’मध्ये आणण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांचा नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम (एनएचडीपी) तयार करण्यात आला आहे. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर)नंतर भूसंपादन, अंदाजपत्रके आणि मग कंत्राटदार निश्चिती अशा टप्प्यांतून जाण्यासाठी ‘गोल्डन ट्रँगल’ला कागदावरून जमिनीवर येण्यासाठी १ वर्षाचा काळ लागणार आहे. डिसेंबर २०१५ मध्ये त्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची थाटात कोनशिला लावण्यात आली असली तरी ग्राऊंडवर काम सुरू होण्यासाठी काही काळ लागणार असल्याची माहिती नशॅनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या प्रशासकीय सूत्रांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) या तीन संस्थांच्या समन्वयाने ती कामे होणार आहेत. सध्या तरी एनएचएआय ही संस्थाच सर्वांसमोर काम करीत असल्याचे दिसते. भूसंपादन मोठा विषय असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वात मोठी भूमिका यात आहे; परंतु जिल्हाधिकारी कार्यालय या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करीत आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग विकासाचा तो कार्यक्रम आहे. आगामी काही वर्षांत डीएमआयसी आणि एनएचडीपीमुळे मराठवाडा आणि औरंगाबाद शहर देशातील महत्त्वाचा विकसित भौगोलिक प्रदेश म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी गुंतवणूक दळणवळण सुधारण्यासाठी होत आहे. शहराला ऐतिहासिकेसोबतच ट्रान्स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सिटी म्हणूनही ओळख मिळू शकेल. वाहतूक विकासासाठी ७-फेसचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. आजवर विविध कार्यक्रमांतर्गत रस्ते विकसित करण्यात आले. या नवीन विकास कार्यक्रमाला ‘भारतमाला’ असे नाव देण्यात आले आहे. पूर्वीच्या ७ कार्यक्रमांपैकी ३ टप्पे पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यात औरंगाबाद व सीआरएफ (सेंट्रल रोड फंड वर्क्स)च्या रस्ते विकासाला प्रारंभ होईल. सीआरएफमधील रस्ते राज्य बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येतील, तर एनएचएआय (नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया) यांच्याकडे एनएचडीपीअंतर्गत निर्माण होणाऱ्या रस्त्यांचे नियंत्रण राहील.जालना रोड सध्या सहापदरी असून, त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. येडशी-औरंगाबाद ते धुळे महामार्गाच्या कामातच ९ कि़मी. अंतराच्या जालना रोडचे काँक्रिटीकरण होणार आहे. या कामात भूसंपादनाचा खोडा निर्माण झाल्याने मुहूर्त केव्हा लागणार हे सांगता येणे शक्य नाही. ४राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ औरंगाबाद शहर चौपदरीकरण येडशी-औरंगाबाद ते धुळे आणि इतर रस्त्यांचे एकत्रित काम करण्यात येणार आहे. जालना रस्ता हा केम्ब्रिज शाळा ते नगर नाका असा १४.५ कि.मी. लांब व ४५ मीटर रुंदीचा दहा पदरी रस्ता व बीड रोडवरील झाल्टा फाटा ते पैठण रोडवरील महानुभाव आश्रम या रस्त्याचेही विस्तारीकरण याच योजनेत होणार असून, हा प्रकल्प ८५० कोटींचा आहे.