शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘गोल्डन ट्रँगल’ एक वर्षानंतर

By admin | Updated: May 10, 2016 01:00 IST

विकास राऊत , औरंगाबाद दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला ‘गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगल’मध्ये आणण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांचा

विकास राऊत , औरंगाबाददिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला ‘गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगल’मध्ये आणण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांचा नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम (एनएचडीपी) तयार करण्यात आला आहे. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर)नंतर भूसंपादन, अंदाजपत्रके आणि मग कंत्राटदार निश्चिती अशा टप्प्यांतून जाण्यासाठी ‘गोल्डन ट्रँगल’ला कागदावरून जमिनीवर येण्यासाठी १ वर्षाचा काळ लागणार आहे. डिसेंबर २०१५ मध्ये त्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची थाटात कोनशिला लावण्यात आली असली तरी ग्राऊंडवर काम सुरू होण्यासाठी काही काळ लागणार असल्याची माहिती नशॅनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या प्रशासकीय सूत्रांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) या तीन संस्थांच्या समन्वयाने ती कामे होणार आहेत. सध्या तरी एनएचएआय ही संस्थाच सर्वांसमोर काम करीत असल्याचे दिसते. भूसंपादन मोठा विषय असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वात मोठी भूमिका यात आहे; परंतु जिल्हाधिकारी कार्यालय या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करीत आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग विकासाचा तो कार्यक्रम आहे. आगामी काही वर्षांत डीएमआयसी आणि एनएचडीपीमुळे मराठवाडा आणि औरंगाबाद शहर देशातील महत्त्वाचा विकसित भौगोलिक प्रदेश म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी गुंतवणूक दळणवळण सुधारण्यासाठी होत आहे. शहराला ऐतिहासिकेसोबतच ट्रान्स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सिटी म्हणूनही ओळख मिळू शकेल. वाहतूक विकासासाठी ७-फेसचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. आजवर विविध कार्यक्रमांतर्गत रस्ते विकसित करण्यात आले. या नवीन विकास कार्यक्रमाला ‘भारतमाला’ असे नाव देण्यात आले आहे. पूर्वीच्या ७ कार्यक्रमांपैकी ३ टप्पे पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यात औरंगाबाद व सीआरएफ (सेंट्रल रोड फंड वर्क्स)च्या रस्ते विकासाला प्रारंभ होईल. सीआरएफमधील रस्ते राज्य बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येतील, तर एनएचएआय (नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया) यांच्याकडे एनएचडीपीअंतर्गत निर्माण होणाऱ्या रस्त्यांचे नियंत्रण राहील.जालना रोड सध्या सहापदरी असून, त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. येडशी-औरंगाबाद ते धुळे महामार्गाच्या कामातच ९ कि़मी. अंतराच्या जालना रोडचे काँक्रिटीकरण होणार आहे. या कामात भूसंपादनाचा खोडा निर्माण झाल्याने मुहूर्त केव्हा लागणार हे सांगता येणे शक्य नाही. ४राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ औरंगाबाद शहर चौपदरीकरण येडशी-औरंगाबाद ते धुळे आणि इतर रस्त्यांचे एकत्रित काम करण्यात येणार आहे. जालना रस्ता हा केम्ब्रिज शाळा ते नगर नाका असा १४.५ कि.मी. लांब व ४५ मीटर रुंदीचा दहा पदरी रस्ता व बीड रोडवरील झाल्टा फाटा ते पैठण रोडवरील महानुभाव आश्रम या रस्त्याचेही विस्तारीकरण याच योजनेत होणार असून, हा प्रकल्प ८५० कोटींचा आहे.