शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

‘गोल्डन ट्रँगल’ एक वर्षानंतर

By admin | Updated: May 10, 2016 01:00 IST

विकास राऊत , औरंगाबाद दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला ‘गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगल’मध्ये आणण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांचा

विकास राऊत , औरंगाबाददिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला ‘गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगल’मध्ये आणण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांचा नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम (एनएचडीपी) तयार करण्यात आला आहे. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर)नंतर भूसंपादन, अंदाजपत्रके आणि मग कंत्राटदार निश्चिती अशा टप्प्यांतून जाण्यासाठी ‘गोल्डन ट्रँगल’ला कागदावरून जमिनीवर येण्यासाठी १ वर्षाचा काळ लागणार आहे. डिसेंबर २०१५ मध्ये त्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची थाटात कोनशिला लावण्यात आली असली तरी ग्राऊंडवर काम सुरू होण्यासाठी काही काळ लागणार असल्याची माहिती नशॅनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या प्रशासकीय सूत्रांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) या तीन संस्थांच्या समन्वयाने ती कामे होणार आहेत. सध्या तरी एनएचएआय ही संस्थाच सर्वांसमोर काम करीत असल्याचे दिसते. भूसंपादन मोठा विषय असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वात मोठी भूमिका यात आहे; परंतु जिल्हाधिकारी कार्यालय या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करीत आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग विकासाचा तो कार्यक्रम आहे. आगामी काही वर्षांत डीएमआयसी आणि एनएचडीपीमुळे मराठवाडा आणि औरंगाबाद शहर देशातील महत्त्वाचा विकसित भौगोलिक प्रदेश म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी गुंतवणूक दळणवळण सुधारण्यासाठी होत आहे. शहराला ऐतिहासिकेसोबतच ट्रान्स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सिटी म्हणूनही ओळख मिळू शकेल. वाहतूक विकासासाठी ७-फेसचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. आजवर विविध कार्यक्रमांतर्गत रस्ते विकसित करण्यात आले. या नवीन विकास कार्यक्रमाला ‘भारतमाला’ असे नाव देण्यात आले आहे. पूर्वीच्या ७ कार्यक्रमांपैकी ३ टप्पे पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यात औरंगाबाद व सीआरएफ (सेंट्रल रोड फंड वर्क्स)च्या रस्ते विकासाला प्रारंभ होईल. सीआरएफमधील रस्ते राज्य बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येतील, तर एनएचएआय (नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया) यांच्याकडे एनएचडीपीअंतर्गत निर्माण होणाऱ्या रस्त्यांचे नियंत्रण राहील.जालना रोड सध्या सहापदरी असून, त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. येडशी-औरंगाबाद ते धुळे महामार्गाच्या कामातच ९ कि़मी. अंतराच्या जालना रोडचे काँक्रिटीकरण होणार आहे. या कामात भूसंपादनाचा खोडा निर्माण झाल्याने मुहूर्त केव्हा लागणार हे सांगता येणे शक्य नाही. ४राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ औरंगाबाद शहर चौपदरीकरण येडशी-औरंगाबाद ते धुळे आणि इतर रस्त्यांचे एकत्रित काम करण्यात येणार आहे. जालना रस्ता हा केम्ब्रिज शाळा ते नगर नाका असा १४.५ कि.मी. लांब व ४५ मीटर रुंदीचा दहा पदरी रस्ता व बीड रोडवरील झाल्टा फाटा ते पैठण रोडवरील महानुभाव आश्रम या रस्त्याचेही विस्तारीकरण याच योजनेत होणार असून, हा प्रकल्प ८५० कोटींचा आहे.