शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

गोदावरी खोऱ्याचा जल आराखडा दीड महिन्यात अंतिम

By admin | Updated: May 29, 2016 00:17 IST

औरंगाबाद : गोदावरी खोऱ्याचा बहुप्रलंबित एकात्मिक जल आराखडा अंतिम करण्यासाठी शासनातर्फे नियुक्त उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

औरंगाबाद : गोदावरी खोऱ्याचा बहुप्रलंबित एकात्मिक जल आराखडा अंतिम करण्यासाठी शासनातर्फे नियुक्त उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. या तज्ज्ञ समितीची पहिली बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. यामध्ये पुढील दीड महिन्यात हा आराखडा अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आराखड्यामुळे गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे अंतर्गत वाटप निश्चित होणार आहे.गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जल आराखडा दहा वर्षांपासून रखडलेला आहे. राज्य सरकारने २००५ साली महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम लागू केला. त्यानंतर सहा महिन्यांत नदी खोऱ्यांचा एकात्मिक जल आराखडा तयार करणे अपेक्षित होते. मात्र, शासनाकडून त्याविषयी कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळेच अंतर्गत पाणी वाटप निश्चित नसल्यामुळे गोदावरी खोऱ्यात जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर राज्य सरकारने गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जल आराखडा तयार केला. मात्र, त्यात त्रुटी असल्यामुळे त्यावर आक्षेप नोंदविले गेले. आक्षेप आणि सूचनांचा विचार करून आराखडा अंतिम करण्यासाठी राज्य सरकारने १२ एप्रिल रोजी तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. एस. बिराजदार आणि विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक हे सहअध्यक्ष आहेत, तर सदस्य म्हणून हिरालाल मेंढेगिरी, प्रा. प्रदीप पुरंदरे, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव वि. म. रानडे आदींचा समावेश आहे. शासनाने समितीला हा आराखडा अंतिम करण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी दिला आहे; परंतु दिलेल्या मुदतीपैकी दीड महिना होईपर्यंत समितीचे कामच सुरू होऊ शकले नव्हते. आता दीड महिन्यानंतर नुकतीच मुंबईत शुक्रवारी अतिरिक्त मुख्य सचिव बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत आराखड्याच्या सर्व पैलूंवर चर्चा झाली. तसेच शासनाने दिलेल्या मुदतीतच म्हणजे पुढील दीड महिन्यात हा आराखडा अंतिम करण्याचा निर्णय झाला.