शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

गोदावरी खोऱ्याचा जल आराखडा दीड महिन्यात अंतिम

By admin | Updated: May 29, 2016 00:17 IST

औरंगाबाद : गोदावरी खोऱ्याचा बहुप्रलंबित एकात्मिक जल आराखडा अंतिम करण्यासाठी शासनातर्फे नियुक्त उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

औरंगाबाद : गोदावरी खोऱ्याचा बहुप्रलंबित एकात्मिक जल आराखडा अंतिम करण्यासाठी शासनातर्फे नियुक्त उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. या तज्ज्ञ समितीची पहिली बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. यामध्ये पुढील दीड महिन्यात हा आराखडा अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आराखड्यामुळे गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे अंतर्गत वाटप निश्चित होणार आहे.गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जल आराखडा दहा वर्षांपासून रखडलेला आहे. राज्य सरकारने २००५ साली महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम लागू केला. त्यानंतर सहा महिन्यांत नदी खोऱ्यांचा एकात्मिक जल आराखडा तयार करणे अपेक्षित होते. मात्र, शासनाकडून त्याविषयी कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळेच अंतर्गत पाणी वाटप निश्चित नसल्यामुळे गोदावरी खोऱ्यात जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर राज्य सरकारने गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जल आराखडा तयार केला. मात्र, त्यात त्रुटी असल्यामुळे त्यावर आक्षेप नोंदविले गेले. आक्षेप आणि सूचनांचा विचार करून आराखडा अंतिम करण्यासाठी राज्य सरकारने १२ एप्रिल रोजी तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. एस. बिराजदार आणि विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक हे सहअध्यक्ष आहेत, तर सदस्य म्हणून हिरालाल मेंढेगिरी, प्रा. प्रदीप पुरंदरे, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव वि. म. रानडे आदींचा समावेश आहे. शासनाने समितीला हा आराखडा अंतिम करण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी दिला आहे; परंतु दिलेल्या मुदतीपैकी दीड महिना होईपर्यंत समितीचे कामच सुरू होऊ शकले नव्हते. आता दीड महिन्यानंतर नुकतीच मुंबईत शुक्रवारी अतिरिक्त मुख्य सचिव बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत आराखड्याच्या सर्व पैलूंवर चर्चा झाली. तसेच शासनाने दिलेल्या मुदतीतच म्हणजे पुढील दीड महिन्यात हा आराखडा अंतिम करण्याचा निर्णय झाला.