शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

अवयवदानाच्या चळवळीसाठी भूलतज्ज्ञांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 01:15 IST

औरंगाबाद : देशभरात हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. अवयवदानाविषयी समाजात योग्य माहितीचा अभाव आहे.

औरंगाबाद : देशभरात हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. अवयवदानाविषयी समाजात योग्य माहितीचा अभाव आहे. अवयवदान व प्रत्यारोपण या दोन्ही प्रक्रियांमध्ये भूलशास्त्र तज्ज्ञांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याशिवाय ही प्रक्रिया पार पडू शकत नाही. त्यामुळे अवयवदानाला समाजहिताच्या चळवळीचे स्वरूप देण्यासाठी भूलतज्ज्ञांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.इंडियन सोसायटी आॅफ अनेस्थेसियालॉजिस्ट आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीनदिवसीय राज्यस्तरीय भूलशास्त्रावरील परिषदेचा (मिसाकॉन-२०१६) रविवारी समारोप झाला. शेवटच्या दिवशी विविध विषयांवरील परिसंवाद, मार्गदर्शन आणि चर्चासत्रांसह सायकल रॅली, पथनाट्य आणि प्रथमोपचार प्रात्यक्षिक, प्रशिक्षण, रक्तदान शिबीर, पोस्टर प्रदर्शन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. एखाद्या रुग्णास ब्रेन डेड घोषित करण्याच्या प्रक्रियेत भूलतज्ज्ञांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अवयव प्रत्यारोपणातही त्यांचा तितकाच महत्त्वाचा सहभाग असतो. अवयवदानासाठी प्रोत्साहित करणे, अशी कामे भूलतज्ज्ञांनी करायला हवी, असा सूर परिषदेत निघाला. मुंबई येथील डॉ. ऊर्मिला थत्ते यांनी भूलशास्त्र या विषयावरील वैज्ञानिक संशोधनावर मार्गदर्शन केले. हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. अनिल तेंडूलकर यांनी सर्जन व भूलतज्ज्ञ यांच्यातील संबंधाचे महत्त्व विशद केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख, सचिव डॉ. बालाजी आसेगावकर, औरंगाबाद भूलशास्त्र शाखेच्या अध्यक्षा डॉ. रोशन रानडे, सचिव डॉ. सुजित खाडे यांच्यासह डॉ. प्रसाद देशपांडे, डॉ. गणेश देशपांडे, डॉ. प्रमोद भाले आदींनी परिश्रम घेतले.