शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

अवयवदानाच्या चळवळीसाठी भूलतज्ज्ञांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 01:15 IST

औरंगाबाद : देशभरात हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. अवयवदानाविषयी समाजात योग्य माहितीचा अभाव आहे.

औरंगाबाद : देशभरात हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. अवयवदानाविषयी समाजात योग्य माहितीचा अभाव आहे. अवयवदान व प्रत्यारोपण या दोन्ही प्रक्रियांमध्ये भूलशास्त्र तज्ज्ञांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याशिवाय ही प्रक्रिया पार पडू शकत नाही. त्यामुळे अवयवदानाला समाजहिताच्या चळवळीचे स्वरूप देण्यासाठी भूलतज्ज्ञांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.इंडियन सोसायटी आॅफ अनेस्थेसियालॉजिस्ट आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीनदिवसीय राज्यस्तरीय भूलशास्त्रावरील परिषदेचा (मिसाकॉन-२०१६) रविवारी समारोप झाला. शेवटच्या दिवशी विविध विषयांवरील परिसंवाद, मार्गदर्शन आणि चर्चासत्रांसह सायकल रॅली, पथनाट्य आणि प्रथमोपचार प्रात्यक्षिक, प्रशिक्षण, रक्तदान शिबीर, पोस्टर प्रदर्शन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. एखाद्या रुग्णास ब्रेन डेड घोषित करण्याच्या प्रक्रियेत भूलतज्ज्ञांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अवयव प्रत्यारोपणातही त्यांचा तितकाच महत्त्वाचा सहभाग असतो. अवयवदानासाठी प्रोत्साहित करणे, अशी कामे भूलतज्ज्ञांनी करायला हवी, असा सूर परिषदेत निघाला. मुंबई येथील डॉ. ऊर्मिला थत्ते यांनी भूलशास्त्र या विषयावरील वैज्ञानिक संशोधनावर मार्गदर्शन केले. हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. अनिल तेंडूलकर यांनी सर्जन व भूलतज्ज्ञ यांच्यातील संबंधाचे महत्त्व विशद केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख, सचिव डॉ. बालाजी आसेगावकर, औरंगाबाद भूलशास्त्र शाखेच्या अध्यक्षा डॉ. रोशन रानडे, सचिव डॉ. सुजित खाडे यांच्यासह डॉ. प्रसाद देशपांडे, डॉ. गणेश देशपांडे, डॉ. प्रमोद भाले आदींनी परिश्रम घेतले.