शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

राज्य व विभागात प्रथम येणाऱ्या मुला-मुलींचा गौरव

By admin | Updated: March 5, 2015 00:02 IST

लातूर : दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत मुला-मुलींना वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

लातूर : दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत मुला-मुलींना वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर बोर्डात प्रथम येणाऱ्यास प्रत्येकी ५१ हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन या पुरस्काराने गौरविले जाईल. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने गेल्या २५ फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेतला असून, राज्यस्तरावर दरवर्षी १ जुलै रोजी या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी १ लाख रुपये देऊन सन्मान केला जाईल. २ लाख रुपये या पुरस्कारासाठी खर्च केले जातील. तर बोर्डामध्ये याच प्रवर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी ५१ हजार रुपये असे ८.१६ लाख रुपये पुरस्कारावर खर्च केले जातील. बारावीच्या परीक्षेत विमुक्त जाती व भटक्या जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम आलेल्या मुला व मुलीस प्रत्येकी १ लाख असे २ लाख तर बोर्डात प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी ५१ हजार रुपये देऊन पुरस्कार दिला जाईल. असे एकूण ८.१६ लाख रुपये बोर्डातील विद्यार्थ्यांवर खर्च होईल. २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना अंमलात आली आहे. योजना केवळ विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींसाठी आहे़ (प्रतिनिधी)विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाने पारितोषीक योजना जाहीर केली आहे़ विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या प्रवर्गातून राज्यात प्रथम येणाऱ्या दहावीच्या व बारावीच्या मुलांना व मुलींना प्रत्येकी १ लाख रुपयाचे पारितोषीक गौरवपूर्वक दिले जाणार आहे़ शिवाय, दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत विभागात प्रथम येणाऱ्या मुला-मुलींनाही प्रत्येकी रोख ५१ हजार रुपये या योजनेत पारितोषीक आहे़ उच्च माध्यमिक शिक्षणातील या प्रवर्गातील मुला-मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना शासनाने सुरु केली आहे़