शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

राज्य व विभागात प्रथम येणाऱ्या मुला-मुलींचा गौरव

By admin | Updated: March 5, 2015 00:02 IST

लातूर : दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत मुला-मुलींना वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

लातूर : दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत मुला-मुलींना वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर बोर्डात प्रथम येणाऱ्यास प्रत्येकी ५१ हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन या पुरस्काराने गौरविले जाईल. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने गेल्या २५ फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेतला असून, राज्यस्तरावर दरवर्षी १ जुलै रोजी या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी १ लाख रुपये देऊन सन्मान केला जाईल. २ लाख रुपये या पुरस्कारासाठी खर्च केले जातील. तर बोर्डामध्ये याच प्रवर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी ५१ हजार रुपये असे ८.१६ लाख रुपये पुरस्कारावर खर्च केले जातील. बारावीच्या परीक्षेत विमुक्त जाती व भटक्या जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम आलेल्या मुला व मुलीस प्रत्येकी १ लाख असे २ लाख तर बोर्डात प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी ५१ हजार रुपये देऊन पुरस्कार दिला जाईल. असे एकूण ८.१६ लाख रुपये बोर्डातील विद्यार्थ्यांवर खर्च होईल. २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना अंमलात आली आहे. योजना केवळ विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींसाठी आहे़ (प्रतिनिधी)विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाने पारितोषीक योजना जाहीर केली आहे़ विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या प्रवर्गातून राज्यात प्रथम येणाऱ्या दहावीच्या व बारावीच्या मुलांना व मुलींना प्रत्येकी १ लाख रुपयाचे पारितोषीक गौरवपूर्वक दिले जाणार आहे़ शिवाय, दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत विभागात प्रथम येणाऱ्या मुला-मुलींनाही प्रत्येकी रोख ५१ हजार रुपये या योजनेत पारितोषीक आहे़ उच्च माध्यमिक शिक्षणातील या प्रवर्गातील मुला-मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना शासनाने सुरु केली आहे़