शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

पिण्यासाठी पाणी द्या, अथवा अंत्यविधीला या

By admin | Updated: March 30, 2016 00:04 IST

नांदेड : जिल्ह्यात पाणीटंचाईचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत असून लोहा तालुक्यातील १२ हजार लोकसंख्येच्या माळाकोळी गावाचीही पाण्यासाठी फरफट होत आहे़

नांदेड : जिल्ह्यात पाणीटंचाईचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत असून लोहा तालुक्यातील १२ हजार लोकसंख्येच्या माळाकोळी गावाचीही पाण्यासाठी फरफट होत आहे़ त्यामुळे लिंबोटी धरणातून माळाकोळी गावाला पिण्यासाठी पाणी द्या, अन्यथा आमच्या अंत्यविधीला या असा निर्वाणीचा इशारा देत माळाकोळी ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आत्मदहनचा निश्चय केला आहे़ लोहा तालुक्यातील माळाकोळी हे सर्वात मोठे गाव आहे़ माळाकोळी ग्रामपंचायत अंतर्गत विठोबा, हरिश्चंद्र, देवलालष्करी, रुपता, खिरु, सीताराम, परसू, भिल्लू असे आठ तांडे आणि नागदरवाडी व कामजळगेवाडी या वाड्या येतात़ माळाकोळी गावात असलेली पाणीपुरवठा योजना ही ४४ वर्षे जुनी आहे़ त्यामुळे ही योजना पूर्णपणे कोलमडली असून त्याचा नागरिकांना प्रत्यक्षात कोणताही फायदा होत नाही़ ज्या तलावातून ही योजना चालविण्यात येते़ तो पाण्याचा स्त्रोत वर्षातून फक्त दोन महिने पुरेल एवढ्याच क्षमतेचा आहे़ त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या या गावाला लिंबोटी धरणातून पाणी पुरवठा केल्याशिवाय पर्याय नाही़ मागील २० वर्षांपासून या मागणीसाठी ग्रामस्थ लढा देत आहेत़ मात्र शासनाकडून दखल घेतली जात नाही़ त्यामुळे आता ८ एप्रिल रोजी स्मशानभूमीत सरण रचून उपोषण सुरु करण्यात येणार आहे़ शासनाने आम्हाला पिण्यासाठी पाणी द्यावे अन्यथा अंत्यविधीला तरी यावे अशी संतप्त भावना यावेळी सरपंच जालिंदर कागणे यांनी व्यक्त केली़