शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या

By admin | Updated: August 20, 2014 01:00 IST

राजेश चोबे, सिल्लोडराज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला.

राजेश चोबे, सिल्लोडदेशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष न दिल्यामुळे देशातून काँग्रेसला जनतेने हद्दपार केले आहे. राज्यातील अनेक तालुके पावसाअभावी दुष्काळाच्या खाईत जात आहेत, ही भीषण परिस्थिती लक्षात घेता राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला.सिल्लोड -सोयगाव तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश बनकर, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मकरंद कोरडे, जिल्हा परिषदेचे गटनेते ज्ञानेश्वर मोटे, पंचायत समितीचे गटनेते इद्रिस मुलतानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीरंग पाटील साळवे, नगरपालिकेचे गटनेते सुनील मिरकर, माजी सभापती अशोक गरुड, किरणदेवी जैस्वाल, राजेंद्र जैस्वाल, कैलास जंजाळ, डॉ. मच्छिंद्र पाखरे, गंगा ताठे, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, तालुका अध्यक्ष दिलीप दाणेकर, सोयगावचे शिवाजी दुढाळ, रामभाऊ पठाडे, जयप्रकाश चौहान, अनिल खरात आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध आघाड्यांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.प्रदेशाध्यक्ष फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत लक्ष न दिल्याने अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला. ठिबक सिंचन , जलसंवर्धन यासह शेतीला भरभराटी येईल, असे नियोजन न केल्याने कृषी विकासाला खीळ बसल्याचेही त्यांनी सांगितले.