शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या

By admin | Updated: August 20, 2014 01:00 IST

राजेश चोबे, सिल्लोडराज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला.

राजेश चोबे, सिल्लोडदेशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष न दिल्यामुळे देशातून काँग्रेसला जनतेने हद्दपार केले आहे. राज्यातील अनेक तालुके पावसाअभावी दुष्काळाच्या खाईत जात आहेत, ही भीषण परिस्थिती लक्षात घेता राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला.सिल्लोड -सोयगाव तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश बनकर, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मकरंद कोरडे, जिल्हा परिषदेचे गटनेते ज्ञानेश्वर मोटे, पंचायत समितीचे गटनेते इद्रिस मुलतानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीरंग पाटील साळवे, नगरपालिकेचे गटनेते सुनील मिरकर, माजी सभापती अशोक गरुड, किरणदेवी जैस्वाल, राजेंद्र जैस्वाल, कैलास जंजाळ, डॉ. मच्छिंद्र पाखरे, गंगा ताठे, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, तालुका अध्यक्ष दिलीप दाणेकर, सोयगावचे शिवाजी दुढाळ, रामभाऊ पठाडे, जयप्रकाश चौहान, अनिल खरात आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध आघाड्यांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.प्रदेशाध्यक्ष फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत लक्ष न दिल्याने अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला. ठिबक सिंचन , जलसंवर्धन यासह शेतीला भरभराटी येईल, असे नियोजन न केल्याने कृषी विकासाला खीळ बसल्याचेही त्यांनी सांगितले.