शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बिले द्या, अन्यथा मनपा प्रांगणातच विष घेऊ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:27 IST

वर्षभरापासून कामांची बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. संतप्त कंत्राटदारांनी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या देऊन विष प्राशन करून मनपा प्रांगणातच आत्महत्या करण्याचा इशारा दिला. तीन दिवसांमध्ये बिलांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही कंत्राटदारांनी केली आहे.

ठळक मुद्देकंत्राटदार मेटाकुटीला : डोक्यावर कर्जाचा डोंगर, कुटुंबाचा उदरनिर्वाह अशक्य

औरंगाबाद : वर्षभरापासून कामांची बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. संतप्त कंत्राटदारांनी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या देऊन विष प्राशन करून मनपा प्रांगणातच आत्महत्या करण्याचा इशारा दिला. तीन दिवसांमध्ये बिलांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही कंत्राटदारांनी केली आहे.काही कंत्राटदारांची बिले एक ते दीड वर्षांपासून अडकलेली आहेत. १५० पेक्षा अधिक छोट्या कंत्राटदारांनी ११५ वॉर्डातील विकासकामे पूर्णपणे बंद केली आहेत. काहींनी कर्ज घेऊन, काही कंत्राटदारांनी उधारीवर कामाचे साहित्य आणले. कर्जबाजारी कंत्राटदारांना सध्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अवघड झाले आहे. बुधवारी सकाळी सर्व कंत्राटदार एकत्र आले. त्यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि महापौरांची भेट घेऊन आपले गाºहाणे मांडले. तीन दिवसांमध्ये प्रशासनाने थोडीफार रक्कम प्रत्येक कंत्राटदाराला न दिल्यास प्रांगणातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा दिला.महापालिका प्रशासन, पदाधिकाºयांनी क्षमतेपेक्षा तीनपट मोठा अर्थसंकल्प तयार करून ठेवला. १८०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा समावेश केला. अर्थसंकल्पानुसार अनेक नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांची कामेही करून टाकली. त्यामुळे मागील आठ महिन्यांमध्ये लेखा विभागात मंजूर बिलांचा आकडा २०० कोटींवर गेला. यापूर्वी एप्रिल २०१८ मध्ये कंत्राटदारांना बिले देण्यात आली होती. त्यानंतर ४० कोटी, १८ कोटींची बिले वाटप झाली. मागील सहा महिन्यांपासून तर बिलांना पूर्णपणे ब्रेकच लावण्यात आला. ज्येष्ठता यादीनुसार बिले वाटप करण्यात येणार असे वारंवार सांगण्यात आले. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.दोन कोटींची बिले अदापाणीपुरवठा विभागातील कंत्राटदारांनी २१ जानेवारीपासून कामबंद केले होते. शहरातील जलवाहिनी दुरुस्ती करण्यास कंत्राटदारांनी दोनदा नकार दर्शविला. अधिकाºयांनी कंत्राटदारांची समजूत घालून बिले लवकर दिली जातील, असे आश्वासन देऊन काम करून घेतले. बुधवारी पाणीपुरवठा विभागातील अकरापेक्षा अधिक कंत्राटदारांना २ कोटींची बिले अदा करण्यात आली.ड्रेनेज दुरुस्तीचे कंत्राटदारशहरात चोकअप झालेली ड्रेनेज लाईन दुरुस्ती कंत्राटदारांकडूनच करण्यात येते. दुरुस्तीची बिलेही छोटी असतात. त्यांना प्राधान्याने बिले देण्याचे नियोजन लेखा विभाग, अतिरिक्त आयुक्त करीत आहेत. यानंतर इतर सर्व छोट्या कंत्राटदारांना अंशत: रक्कम देण्यात येणार आहे.--------------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा