शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विद्यार्थिनींनो, सातच्या आत विद्यापीठ वसतिगृहात पोहोचा! प्रशासनाच्या निर्णयाने नवा वाद

By राम शिनगारे | Updated: May 11, 2024 12:16 IST

पोलिसांच्या सूचनेनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना सायंकाळी सात वाजेच्या आत वसतिगृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठात घडलेल्या काही घटनांमुळे शहर पोलिसांनी मुलींना सात वाजेच्या नंतर वसतिगृहाच्या बाहेर फिरण्यास बंदी घालण्याची सूचना केली होती. त्या सूचनेनुसार विद्यापीठ प्रशासनाने सात वाजेनंतर मुलींना वसतिगृहाच्या बाहेर जाण्यास मनाई केली आहे. या निर्णयाला अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

विद्यापीठात दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हापासून प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार पोलिस प्रशासनालाही एक पत्र लिहीत विद्यापीठ परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी १७ फेब्रुवारीस केली होती. त्यानुसार पोलिस प्रशासनाने २९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून काही सूचना केल्या होत्या. त्यात विद्यापीठ परिसरातील विद्यार्थिनींना ठरवून दिलेल्या सात वाजेनंतर वसतिगृहाच्या बाहेर जाऊ देऊ नये, असे सांगितले हाेते.

पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यापीठातील सामान्य प्रशासन विभागाने विद्यार्थी कल्याण संचालकांना ४ मे रोजी पत्र पाठवून पोलिसांच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यास सांगितले. त्यानुसार संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी मुलींच्या वसतिगृहांच्या वाॅर्डनला पत्र पाठवून सात वाजेच्या नंतर कोणालाही बाहेर सोडण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले. तसेच काही अनुचित प्रकार घडत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या अंमलबजावणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. त्यास विविध विद्यार्थी संघटनांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

इतर उपाय शोधासध्या विद्यापीठात वेगवेगळे वादग्रस्त निर्णय घेतले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच आता नवीन निर्णयानुसार विद्यार्थिनींना सातच्या आत वसतिगृहात परतण्याचा आदेश निघाला. हा चुकीचा निर्णय आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनी काही सहावी-सातवीला नाहीत. मुलींना वसतिगृहात कोंडून ठेवण्यापेक्षा सुरक्षेसाठी इतर उपाय योजले पाहिजेत.- पल्लवी बोरडकर, एसएफआय संघटना

पोलिसांच्या सूचनेनुसार निर्णयविद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी काही सूचना केल्या होत्या. त्यात सात वाजेनंतर मुलींना वसतिगृहाच्या बाहेर सोडण्यात येऊ नये, असे म्हटले आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार मुलींच्या सुरक्षेसाठी सात वाजेनंतर वसतिगृहाच्या बाहेर न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.- डॉ. कैलास अंभुरे, संचालक, विद्यार्थी विकास विभाग

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र