शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

विद्यार्थिनींनो, सातच्या आत विद्यापीठ वसतिगृहात पोहोचा! प्रशासनाच्या निर्णयाने नवा वाद

By राम शिनगारे | Updated: May 11, 2024 12:16 IST

पोलिसांच्या सूचनेनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना सायंकाळी सात वाजेच्या आत वसतिगृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठात घडलेल्या काही घटनांमुळे शहर पोलिसांनी मुलींना सात वाजेच्या नंतर वसतिगृहाच्या बाहेर फिरण्यास बंदी घालण्याची सूचना केली होती. त्या सूचनेनुसार विद्यापीठ प्रशासनाने सात वाजेनंतर मुलींना वसतिगृहाच्या बाहेर जाण्यास मनाई केली आहे. या निर्णयाला अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

विद्यापीठात दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हापासून प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार पोलिस प्रशासनालाही एक पत्र लिहीत विद्यापीठ परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी १७ फेब्रुवारीस केली होती. त्यानुसार पोलिस प्रशासनाने २९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून काही सूचना केल्या होत्या. त्यात विद्यापीठ परिसरातील विद्यार्थिनींना ठरवून दिलेल्या सात वाजेनंतर वसतिगृहाच्या बाहेर जाऊ देऊ नये, असे सांगितले हाेते.

पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यापीठातील सामान्य प्रशासन विभागाने विद्यार्थी कल्याण संचालकांना ४ मे रोजी पत्र पाठवून पोलिसांच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यास सांगितले. त्यानुसार संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी मुलींच्या वसतिगृहांच्या वाॅर्डनला पत्र पाठवून सात वाजेच्या नंतर कोणालाही बाहेर सोडण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले. तसेच काही अनुचित प्रकार घडत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या अंमलबजावणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. त्यास विविध विद्यार्थी संघटनांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

इतर उपाय शोधासध्या विद्यापीठात वेगवेगळे वादग्रस्त निर्णय घेतले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच आता नवीन निर्णयानुसार विद्यार्थिनींना सातच्या आत वसतिगृहात परतण्याचा आदेश निघाला. हा चुकीचा निर्णय आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनी काही सहावी-सातवीला नाहीत. मुलींना वसतिगृहात कोंडून ठेवण्यापेक्षा सुरक्षेसाठी इतर उपाय योजले पाहिजेत.- पल्लवी बोरडकर, एसएफआय संघटना

पोलिसांच्या सूचनेनुसार निर्णयविद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी काही सूचना केल्या होत्या. त्यात सात वाजेनंतर मुलींना वसतिगृहाच्या बाहेर सोडण्यात येऊ नये, असे म्हटले आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार मुलींच्या सुरक्षेसाठी सात वाजेनंतर वसतिगृहाच्या बाहेर न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.- डॉ. कैलास अंभुरे, संचालक, विद्यार्थी विकास विभाग

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र