शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

विद्यार्थिनींनो, सातच्या आत विद्यापीठ वसतिगृहात पोहोचा! प्रशासनाच्या निर्णयाने नवा वाद

By राम शिनगारे | Updated: May 11, 2024 12:16 IST

पोलिसांच्या सूचनेनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना सायंकाळी सात वाजेच्या आत वसतिगृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठात घडलेल्या काही घटनांमुळे शहर पोलिसांनी मुलींना सात वाजेच्या नंतर वसतिगृहाच्या बाहेर फिरण्यास बंदी घालण्याची सूचना केली होती. त्या सूचनेनुसार विद्यापीठ प्रशासनाने सात वाजेनंतर मुलींना वसतिगृहाच्या बाहेर जाण्यास मनाई केली आहे. या निर्णयाला अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

विद्यापीठात दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हापासून प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार पोलिस प्रशासनालाही एक पत्र लिहीत विद्यापीठ परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी १७ फेब्रुवारीस केली होती. त्यानुसार पोलिस प्रशासनाने २९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून काही सूचना केल्या होत्या. त्यात विद्यापीठ परिसरातील विद्यार्थिनींना ठरवून दिलेल्या सात वाजेनंतर वसतिगृहाच्या बाहेर जाऊ देऊ नये, असे सांगितले हाेते.

पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यापीठातील सामान्य प्रशासन विभागाने विद्यार्थी कल्याण संचालकांना ४ मे रोजी पत्र पाठवून पोलिसांच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यास सांगितले. त्यानुसार संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी मुलींच्या वसतिगृहांच्या वाॅर्डनला पत्र पाठवून सात वाजेच्या नंतर कोणालाही बाहेर सोडण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले. तसेच काही अनुचित प्रकार घडत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या अंमलबजावणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. त्यास विविध विद्यार्थी संघटनांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

इतर उपाय शोधासध्या विद्यापीठात वेगवेगळे वादग्रस्त निर्णय घेतले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच आता नवीन निर्णयानुसार विद्यार्थिनींना सातच्या आत वसतिगृहात परतण्याचा आदेश निघाला. हा चुकीचा निर्णय आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनी काही सहावी-सातवीला नाहीत. मुलींना वसतिगृहात कोंडून ठेवण्यापेक्षा सुरक्षेसाठी इतर उपाय योजले पाहिजेत.- पल्लवी बोरडकर, एसएफआय संघटना

पोलिसांच्या सूचनेनुसार निर्णयविद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी काही सूचना केल्या होत्या. त्यात सात वाजेनंतर मुलींना वसतिगृहाच्या बाहेर सोडण्यात येऊ नये, असे म्हटले आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार मुलींच्या सुरक्षेसाठी सात वाजेनंतर वसतिगृहाच्या बाहेर न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.- डॉ. कैलास अंभुरे, संचालक, विद्यार्थी विकास विभाग

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र