शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

४00 शाळांची बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:17 IST

एकीकडे राज्याच्या शिक्षण विभागाकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, डिजिटल शाळांच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे, मात्र वीज बिलांचा भरणा करण्यासाठी जि. प. शाळांकडे निधीची तरतूदच नाही.

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एकीकडे राज्याच्या शिक्षण विभागाकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, डिजिटल शाळांच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे, मात्र वीज बिलांचा भरणा करण्यासाठी जि. प. शाळांकडे निधीची तरतूदच नाही. परिणामी, जिल्ह्यातील जवळपास ४०० शाळांकडे तब्बल १२ लाख रुपयांची वीज बिलांची थकबाकी असून, अशा शाळांची कायमची वीज जोडणी (परमनंट डिसकनेक्ट) खंडित करण्यात आली आहे, तर काही शाळांना यासंबंधीच्या नोटिसा बजावल्या आहेत.गेल्या आठवड्यात ग्रामपंचायतींच्या १३८७ पाणीपुरवठा योजनांकडे २४ लाखांची थकबाकी असल्यामुळे महापारेषणने या योजनांचा वीजपुरवठा खंडित केला. त्या पार्श्वभूमीवर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी महावितरणच्या प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेतली. तेव्हा पाणीपुरवठा योजनांचे चालू बिल व थकीत बिलांचा हप्ता भरल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्याची ग्वाही बकोरिया यांनी दिली. त्यानंतर शाळांचाही खंडित वीजपुरवठ्याचा विषय काढण्यात आला. जवळपास ४०० शाळांकडे १२ लाख रुपये वीज बिलाची थकबाकी असून, थकबाकी भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही, असे बजावण्यात आले.तथापि, शाळांना वाणिज्य (कमर्शिअल) दराने वीज बिल आकारले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विद्यादानाचे कार्य करणाºया शाळा अडचणीत आल्या आहेत. या शाळांना घरगुती वापराच्या दराने वीज बिल आकारण्याची मागणी शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी महावितरणच्या प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडे केली. तेव्हा बकोरिया यांनी सांगितले की, शाळांना घरगुती वीज वापराचा दर आकारण्यासंबंधी शासनाचा विचार सुरू आहे. तत्पूर्वी, आपल्या शाळांकडे असलेली थकबाकी भरावी लागणार आहे.सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळांना देखभाल दुरुस्तीसाठी ११ हजार रुपये एवढा निधी उपलब्ध होत असतो. त्यातील पाच हजार रुपये इमारत देखभालीवर व एक हजार रुपये शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी तर पाच हजार रुपये १३५ शालेय उपयोगी साहित्याकरिता खर्च करण्याची तरतूद आहे. या निधीमधून वीज बिल भरण्याची कोणतीही तरतूद नाही. शाळांना दरमहा किमान ७०० ते ८०० रुपये वीज बिल येते. अर्थात, वर्षभराच्या वीज बिलांची रक्कम जवळपास १० हजार रुपये एवढी येते. एवढी रक्कम भरायची कुठून, हा प्रश्न मुख्याध्यापकांना सतावत आहे. अनेक शाळा लोकवर्गणीच्या माध्यमातून वीज बिलाचा भरणा करीत असतात; परंतु सर्वच गावात लोकवर्गणी जमा होत नाही. त्यामुळे वीज बिलाचा नियमित भरणा करणे शाळांना शक्य होत नाही. एकीकडे शंभर टक्के शाळा डिजिटल करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने केला आहे. मात्र, अनेक शाळांमधून ‘लाइट गुल’ झाल्यामुळे डिजिटल शाळांचा केवळ फार्सच असेल, असे सध्याचे चित्र पाहायला मिळते.