शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

४00 शाळांची बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:17 IST

एकीकडे राज्याच्या शिक्षण विभागाकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, डिजिटल शाळांच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे, मात्र वीज बिलांचा भरणा करण्यासाठी जि. प. शाळांकडे निधीची तरतूदच नाही.

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एकीकडे राज्याच्या शिक्षण विभागाकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, डिजिटल शाळांच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे, मात्र वीज बिलांचा भरणा करण्यासाठी जि. प. शाळांकडे निधीची तरतूदच नाही. परिणामी, जिल्ह्यातील जवळपास ४०० शाळांकडे तब्बल १२ लाख रुपयांची वीज बिलांची थकबाकी असून, अशा शाळांची कायमची वीज जोडणी (परमनंट डिसकनेक्ट) खंडित करण्यात आली आहे, तर काही शाळांना यासंबंधीच्या नोटिसा बजावल्या आहेत.गेल्या आठवड्यात ग्रामपंचायतींच्या १३८७ पाणीपुरवठा योजनांकडे २४ लाखांची थकबाकी असल्यामुळे महापारेषणने या योजनांचा वीजपुरवठा खंडित केला. त्या पार्श्वभूमीवर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी महावितरणच्या प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेतली. तेव्हा पाणीपुरवठा योजनांचे चालू बिल व थकीत बिलांचा हप्ता भरल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्याची ग्वाही बकोरिया यांनी दिली. त्यानंतर शाळांचाही खंडित वीजपुरवठ्याचा विषय काढण्यात आला. जवळपास ४०० शाळांकडे १२ लाख रुपये वीज बिलाची थकबाकी असून, थकबाकी भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही, असे बजावण्यात आले.तथापि, शाळांना वाणिज्य (कमर्शिअल) दराने वीज बिल आकारले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विद्यादानाचे कार्य करणाºया शाळा अडचणीत आल्या आहेत. या शाळांना घरगुती वापराच्या दराने वीज बिल आकारण्याची मागणी शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी महावितरणच्या प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडे केली. तेव्हा बकोरिया यांनी सांगितले की, शाळांना घरगुती वीज वापराचा दर आकारण्यासंबंधी शासनाचा विचार सुरू आहे. तत्पूर्वी, आपल्या शाळांकडे असलेली थकबाकी भरावी लागणार आहे.सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळांना देखभाल दुरुस्तीसाठी ११ हजार रुपये एवढा निधी उपलब्ध होत असतो. त्यातील पाच हजार रुपये इमारत देखभालीवर व एक हजार रुपये शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी तर पाच हजार रुपये १३५ शालेय उपयोगी साहित्याकरिता खर्च करण्याची तरतूद आहे. या निधीमधून वीज बिल भरण्याची कोणतीही तरतूद नाही. शाळांना दरमहा किमान ७०० ते ८०० रुपये वीज बिल येते. अर्थात, वर्षभराच्या वीज बिलांची रक्कम जवळपास १० हजार रुपये एवढी येते. एवढी रक्कम भरायची कुठून, हा प्रश्न मुख्याध्यापकांना सतावत आहे. अनेक शाळा लोकवर्गणीच्या माध्यमातून वीज बिलाचा भरणा करीत असतात; परंतु सर्वच गावात लोकवर्गणी जमा होत नाही. त्यामुळे वीज बिलाचा नियमित भरणा करणे शाळांना शक्य होत नाही. एकीकडे शंभर टक्के शाळा डिजिटल करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने केला आहे. मात्र, अनेक शाळांमधून ‘लाइट गुल’ झाल्यामुळे डिजिटल शाळांचा केवळ फार्सच असेल, असे सध्याचे चित्र पाहायला मिळते.