शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

घोंगडीला हवीय सरकारी मदतीची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:31 IST

थंडीच्या दिवसांत ब्लँकेट, रग, चादरी यांना मागणी वाढते. मात्र, खात्रीने ऊब देणारी घोंगडी आता दुर्मिळ होत चालली आहे. घोंगडी बनविण्याचा व्यवसाय आर्थिक कारणास्तव अडचणीत आल्याचे या क्षेत्रातील मेंढपाळ सांगत आहेत. सरकारने मदतीची आर्थिक ऊब दिली, तर हा व्यवसाय अनेकांना आधार ठरू शकतो.

प्रकाश काटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव नाथाचे (ता. फुलंब्री) : थंडीच्या दिवसांत ब्लँकेट, रग, चादरी यांना मागणी वाढते. मात्र, खात्रीने ऊब देणारी घोंगडी आता दुर्मिळ होत चालली आहे. घोंगडी बनविण्याचा व्यवसाय आर्थिक कारणास्तव अडचणीत आल्याचे या क्षेत्रातील मेंढपाळ सांगत आहेत. सरकारने मदतीची आर्थिक ऊब दिली, तर हा व्यवसाय अनेकांना आधार ठरू शकतो.हा व्यवसाय विशेषत: धनगर समाजातील मेंढपाळ लोक करतात. हातमाग (वीणकाम) करून घोंगडी बनवण्याचा व्यवसाय दुर्मिळ झाला असून, घोंगडीची बाजारपेठेत मागणी कमी झाली आहे. ज्यांच्याकडे मेंढ्या आहेत त्यांना लोकर ( मेंढ्यांचे केस) विकत घेण्याची गरज पडत नाही. एक घोंगडी बनवण्यासाठी चार ते पाच किलो लोकर लागते. लोकर कातून विणकाम केले जाते. त्यानंतर चिंचोक्याची खळ लावून घोंगडी बनविली जाते. बाजारपेठेत एका घोंगडीला सरासरी सातशे ते एक हजार रुपयापर्यंत किंमत मिळते.एक घोंगडी बनविण्यासाठी किमान एक दिवसाचा अवधी लागतो. या एका घोंगडीमागे साधारणत: दोनशे ते तीनशे रुपयांचे उत्पन्न या व्यावसायिकांना मिळते, असे यातील जाणकारांनी सांगितले.मेंढपाळ व्यावसायिक कमी झाल्याने घोंगडी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल लोकर मिळत नसल्याने हातमाग कामाद्वारे घोंगडी बनवण्याचा व्यवसाय कमी झाला आहे. आजही घोंगडीला विशेष महत्त्व आहे. घोंगडीचा वापर खंडोबाची तळी उचलण्यासाठी व धार्मिक कामासाठी केला जातो.आता ग्रामीण भागातही घोंगडीचा वापर कमी झाल्याचे दिसत आहे. घोंगडीचा वापर केल्यास कंबरदुखी, पाठदुखी कमी होते, असा दावाही केला जातो. शासनाकडून या व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळाल्यास हा व्यवसाय स्पर्धेच्या युगात टिकू शकेल.नवीन पिढीने पाठ फिरविलीखामगाव येथील रामचंद्र काटकर (५५) शेती करून घोंगडे बनवण्याचा व्यवसाय करतात. उत्पन्न कमी असल्याने नवीन पिढी या व्यवसायाकडे वळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.लिंबाजी चिंचोली येथील सोसायटीचे चेअरमन गुनाजी ढेपले (६०) आजही घोंगडी बनवून विक्री करण्याचा व्यवसाय करतात. या हातमाग कामाला शासनाने कर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याची गरज आहे, तरच हा व्यवसाय टिकेल, असे ते म्हणाले.