शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

घाणेवाडी ‘ओव्हरफ्लो’

By admin | Updated: September 25, 2016 23:59 IST

जालना : शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी जलाशय दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे चार वर्षांनंतर रविवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले.

जालना : शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी जलाशय दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे चार वर्षांनंतर रविवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले. जलाशयात १० दलघमी पाणी असून, पाणी पातळी १८.३ फूट आहे. हे पाणी पंधरा महिने पुरेल, असे पालिका अभियंत्यांचे म्हणणे आहे. जालना शहराला जायकवाडी जलवाहिनी होण्यापूर्वी याच निजामकालीन जलाशयातून पाणीपुरवठा होत असे. सद्यस्थितीत येथून नवीन जालना भागास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सतत चार वर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाण्यासाठी असुसलेल्या जलाशयात यंदा सुरूवातीपासून समाधानकारक जलसाठा होत गेला. जलाशयाच्या वरील परिसरात दमदार पावसामुळे जलाशयात पाण्याचा ओघ वाढत असून, रविवारी सकाळी घाणेवाडी ओव्हरफ्लो झाले. तब्बल चार वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने जालनेकरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तलावाची पाणी पातळी क्षमता २३ फुट असली तरी १८ फुटनंतर तलाव ओव्हरफ्लो होतो. आज रोजी तलावात १८.३ फूट जलसाठा झाला आहे. हे १० दलघमी एवढे असून, हे पाणी सुमारे पंधरा महिने पुरणार आहे. (प्रतिनिधी) जालना शहराला पाणी पुरवठा करणारे घाणेवाडी जलाशय, जलशुद्धीकरण केंद्र आणि शहरातील अंतर्गत पाणी पुरवठा वितरण करणारी यंत्रणा अत्याधुनिक करणार असल्याची माहिती माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवारी येथे दिली. घाणेवाडी जलाशय यंदा तुडुंब भरला असून, याचे जलपूजन गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, राम सावंत, पं. स. सदस्य दीपक कावले, विनोद रत्नपारखे, अ‍ॅड. राहुल हिवराळे, विनोद यादव, विष्णू वाघमारे, रोहीत बनवस्कर, भगवान मदन, जीवन सले, इसा पठाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यंदा घाणेवाडी जलाशय तुडुंब भरल्याने जालनेकरांचा उन्हाळा पाणीटंचाईमुक्त जाणार आहे. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी घाणेवाडीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याचे पाणीपुरवठा अभियंता दासवाड यांनी सांगितले.