शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

नगर-नाशिककडून पाणी मिळविणे म्हणजे जलविकास नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:18 IST

मराठवाड्यात उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आणि जलव्यवस्थापनावर भर देणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पाणी प्रश्नाचे अभ्यासक प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील जलविकासाची चर्चा करताना येथील पाणी परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ नगर-नाशिककडून भांडून पाणी घेणे हा पर्याय नाही. मुळात मराठवाड्यात उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आणि जलव्यवस्थापनावर भर देणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पाणी प्रश्नाचे अभ्यासक प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा इन्स्टिट्यूट आॅफ सोशियो-इकॉनॉमिक रिसर्च अँड नॅशनल इंटिग्रेशनतर्फे शनिवारी (दि.१२) संस्थेच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. बी. वराडे होते.‘गोदावरी खोरे जल आराखडा आणि मराठवाडा’ या विषयावर मांडणी करताना त्यांनी आराखड्यातील प्राथमिक बाबी, पार्श्वभूमी, आकडेवारी, शिफारशी, समितीची रचना, कार्यक्षमता आणि मर्यादा आदी बाबींविषयी मार्गदर्शन केले. आराखड्याचे मध्यवर्ती सूत्र सांगताना ते म्हणाले, जलविकास म्हणजे केवळ नवीन धरणे बांधणे नाही. पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे जलव्यवस्थापन, जलकारभार आणि जलनियमनही तेवढेच महत्त्वाचे आहे.आराखड्याची रचना सांगताना त्यांनी जमिनी वास्तव, पुरवठा व्यवस्थापन, मागणी व्यवस्थापन, सामाजिक-आर्थिक बाबी आणि कायदेशीर बाबी अशी मांडणी केली. ते म्हणाले, पाटबंधारे विकास मंडळ जलविकासातील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जलविकास कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वायत्त जलसंपत्ती नियामक मंडळांची निर्मिती करण्याची खरी गरज आहे.शास्त्रीय आकडेवारीची समस्याजलविकास आराखडा तयार करताना लागणारी शास्त्रीय माहिती व आकडेवारी उपलब्ध नसणे ही फार मोठी समस्या आहे. उपखोरे आणि खोरेनिहाय आकडेवारी जुळत नाही. विविध आकडेवारीचा कालखंड समान आढळत नाही. तपशीलवार जलवैज्ञानिक आकडेवारी जुळत नसल्याने समितीला वारंवार अधिकचा वेळ मागवून घ्यावा लागतो. शिवाय अधिकाºयांची उदासीनता आणि प्रशासकीय उत्तरे देऊन असहकार्याची वृत्ती घातक ठरत असल्याचे पुरंदरे म्हणाले. डॉ. शरद अदवंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या (डेमोक्रॅटिक) कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात आराखड्यामुळे मराठवाड्यावर अन्याय झाल्याचे सांगत घोषणा दिल्या.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावासर्व क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असताना सिंचन क्षेत्रात मात्र आधुनिकीकरणाचा अभाव दिसून येतो. आपल्याकडील प्रकल्पांची प्रभावी कार्यक्षमता फक्त २० ते ३० टक्के आहे. जलव्यवस्थापनात अभियांत्रिकी यंत्रणा चांगली असेल, तर लोकसहभागदेखील वाढतो. ‘मेक इन इंडिया’द्वारे देशातच प्रकल्पांची दारे व प्रवाहमापकांची निर्मिती करून उद्योजकतेला चालना दिली जाऊ शकते, असे पुरंदरे यांनी म्हटले.