शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

नगर-नाशिककडून पाणी मिळविणे म्हणजे जलविकास नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:18 IST

मराठवाड्यात उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आणि जलव्यवस्थापनावर भर देणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पाणी प्रश्नाचे अभ्यासक प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील जलविकासाची चर्चा करताना येथील पाणी परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ नगर-नाशिककडून भांडून पाणी घेणे हा पर्याय नाही. मुळात मराठवाड्यात उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आणि जलव्यवस्थापनावर भर देणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पाणी प्रश्नाचे अभ्यासक प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा इन्स्टिट्यूट आॅफ सोशियो-इकॉनॉमिक रिसर्च अँड नॅशनल इंटिग्रेशनतर्फे शनिवारी (दि.१२) संस्थेच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. बी. वराडे होते.‘गोदावरी खोरे जल आराखडा आणि मराठवाडा’ या विषयावर मांडणी करताना त्यांनी आराखड्यातील प्राथमिक बाबी, पार्श्वभूमी, आकडेवारी, शिफारशी, समितीची रचना, कार्यक्षमता आणि मर्यादा आदी बाबींविषयी मार्गदर्शन केले. आराखड्याचे मध्यवर्ती सूत्र सांगताना ते म्हणाले, जलविकास म्हणजे केवळ नवीन धरणे बांधणे नाही. पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे जलव्यवस्थापन, जलकारभार आणि जलनियमनही तेवढेच महत्त्वाचे आहे.आराखड्याची रचना सांगताना त्यांनी जमिनी वास्तव, पुरवठा व्यवस्थापन, मागणी व्यवस्थापन, सामाजिक-आर्थिक बाबी आणि कायदेशीर बाबी अशी मांडणी केली. ते म्हणाले, पाटबंधारे विकास मंडळ जलविकासातील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जलविकास कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वायत्त जलसंपत्ती नियामक मंडळांची निर्मिती करण्याची खरी गरज आहे.शास्त्रीय आकडेवारीची समस्याजलविकास आराखडा तयार करताना लागणारी शास्त्रीय माहिती व आकडेवारी उपलब्ध नसणे ही फार मोठी समस्या आहे. उपखोरे आणि खोरेनिहाय आकडेवारी जुळत नाही. विविध आकडेवारीचा कालखंड समान आढळत नाही. तपशीलवार जलवैज्ञानिक आकडेवारी जुळत नसल्याने समितीला वारंवार अधिकचा वेळ मागवून घ्यावा लागतो. शिवाय अधिकाºयांची उदासीनता आणि प्रशासकीय उत्तरे देऊन असहकार्याची वृत्ती घातक ठरत असल्याचे पुरंदरे म्हणाले. डॉ. शरद अदवंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या (डेमोक्रॅटिक) कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात आराखड्यामुळे मराठवाड्यावर अन्याय झाल्याचे सांगत घोषणा दिल्या.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावासर्व क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असताना सिंचन क्षेत्रात मात्र आधुनिकीकरणाचा अभाव दिसून येतो. आपल्याकडील प्रकल्पांची प्रभावी कार्यक्षमता फक्त २० ते ३० टक्के आहे. जलव्यवस्थापनात अभियांत्रिकी यंत्रणा चांगली असेल, तर लोकसहभागदेखील वाढतो. ‘मेक इन इंडिया’द्वारे देशातच प्रकल्पांची दारे व प्रवाहमापकांची निर्मिती करून उद्योजकतेला चालना दिली जाऊ शकते, असे पुरंदरे यांनी म्हटले.