शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

पाणी मिळेना, दिवे लागेना, रस्ते होईना !

By admin | Updated: December 8, 2014 00:23 IST

विकास राऊत, औरंगाबाद महापालिकेसमोर समस्यांचा मोठा डोंगर उभा असून, शहर पूर्णत: बकाल होत चालले आहे.

विकास राऊत, औरंगाबादमहापालिकेसमोर समस्यांचा मोठा डोंगर उभा असून, शहर पूर्णत: बकाल होत चालले आहे. ३२ वर्षांपासून नागरिक ज्या समस्यांची ओरड करीत आहेत, त्याच समस्या आजही कायम आहेत. पाणीपुरवठा, साफसफाई, ड्रेनेज, पथदिवे आणि खड्डेमुक्त रस्ते या नागरिकांच्या मागण्या पालिका पूर्ण करू शकत नाहीय. ३२ वर्षांच्या प्रवासात अजूनही पालिकेला भविष्याचे नियोजन करण्याची सद्बुद्धी आलेली नाही. प्रशासन व सत्ताधारी यांच्यातील अंतर्गत राजकारण व उधळपट्टीमुळे मनपा कंगाल झालेली असतानाच आगामी चार महिन्यांत मनपाच्या निवडणुका आहेत. विकासाअभावी औरंगाबाद ‘ग्लोबल सिटी’ म्हणून पुढे येण्यास आणखी किती काळ नागरिकांना वाढ पाहावी लागणार, हे सांगता येत नाही़ ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या महापालिकेचा उद्या ८ डिसेंबर २०१४ रोजी ३३ वा वर्धापन दिन आहे़ ९९ वॉर्ड आणि १५ लाख लोकसंख्येच्या पालकत्वाची जबाबदारी असलेल्या मनपा नावाच्या संस्थेकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत़ तेवढ्याच अपेक्षा पालिकेलादेखील नागरिकांकडून आहेत़ यंदाचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, उद्या महापुरुषांना अभिवादन करण्यात येणार आहे. ८ डिसेंबर १९८२ रोजी नगरपालिकेतून महापालिका झाल्यानंतर सुरू झालेल्या प्रवासात पालिकेने अनेक चढ-उतार पाहिले़ सुरुवातीची सहा वर्षे तर प्रशासकीय राजवट होती़ १९८८ पासून युतीच्या ताब्यात महापालिका आहे़ विद्यमान पदाधिकारी नेहमीप्रमाणे गेल्या पाच वर्षांतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचे खापर फोडून मोकळे होतात़ बांधकामे वाढत आहेत़ उद्योग वाढताहेत़ वाहनांची संख्या वाढते आहे. पालिका १९ व्या शतकात केलेल्या कामांचे गोडवे अजूनही गात आहे़ युतीने २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दिलेल्या वचनांतील एकही उपक्रम साडेचार वर्षांत पूर्ण केलेला नाही. विरोधी पक्षनेते म्हणाले.. विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड म्हणाले, वर्धापन दिन असला तरी त्याची उत्सुकता मनपात दिसून येत नाही. या सगळ्याला पदाधिकारी आणि अधिकारी जबाबदार आहेत. नियोजन करण्यात सर्वांना अपयश आल्यामुळे शहर बकाल होत चालले आहे. सभागृह नेते म्हणाले.. साधेपणाने वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे वर्धापन दिन साधेपणाने होईल, असे सभागृह नेते किशोर नागरे म्हणाले. काय पूर्ण केलेमुक्तिसंग्राम संग्रहालयाचे काम सुरू आहे. भुयारी गटार योजनेचे काम सुरू झाले आहे. मनपाकडून दीड हजार कोटींची कामे प्रगतिपथावर आहेत; परंतु ती पूर्ण होण्यास तीन वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. रस्त्यांची बरीचशी कामे सुरू आहेत, तर अनेक कामे रखडली आहेत. गुंठेवारी वसाहती अधिकृत करण्याचा मुद्दा मागे पडला आहे. वसाहतींमध्ये सुविधा देण्यात पालिका कमी पडली आहे. समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाले; परंतु जलवाहिनी होण्यास विलंब लागणार आहे.