शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मिळेना, दिवे लागेना, रस्ते होईना !

By admin | Updated: December 8, 2014 00:23 IST

विकास राऊत, औरंगाबाद महापालिकेसमोर समस्यांचा मोठा डोंगर उभा असून, शहर पूर्णत: बकाल होत चालले आहे.

विकास राऊत, औरंगाबादमहापालिकेसमोर समस्यांचा मोठा डोंगर उभा असून, शहर पूर्णत: बकाल होत चालले आहे. ३२ वर्षांपासून नागरिक ज्या समस्यांची ओरड करीत आहेत, त्याच समस्या आजही कायम आहेत. पाणीपुरवठा, साफसफाई, ड्रेनेज, पथदिवे आणि खड्डेमुक्त रस्ते या नागरिकांच्या मागण्या पालिका पूर्ण करू शकत नाहीय. ३२ वर्षांच्या प्रवासात अजूनही पालिकेला भविष्याचे नियोजन करण्याची सद्बुद्धी आलेली नाही. प्रशासन व सत्ताधारी यांच्यातील अंतर्गत राजकारण व उधळपट्टीमुळे मनपा कंगाल झालेली असतानाच आगामी चार महिन्यांत मनपाच्या निवडणुका आहेत. विकासाअभावी औरंगाबाद ‘ग्लोबल सिटी’ म्हणून पुढे येण्यास आणखी किती काळ नागरिकांना वाढ पाहावी लागणार, हे सांगता येत नाही़ ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या महापालिकेचा उद्या ८ डिसेंबर २०१४ रोजी ३३ वा वर्धापन दिन आहे़ ९९ वॉर्ड आणि १५ लाख लोकसंख्येच्या पालकत्वाची जबाबदारी असलेल्या मनपा नावाच्या संस्थेकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत़ तेवढ्याच अपेक्षा पालिकेलादेखील नागरिकांकडून आहेत़ यंदाचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, उद्या महापुरुषांना अभिवादन करण्यात येणार आहे. ८ डिसेंबर १९८२ रोजी नगरपालिकेतून महापालिका झाल्यानंतर सुरू झालेल्या प्रवासात पालिकेने अनेक चढ-उतार पाहिले़ सुरुवातीची सहा वर्षे तर प्रशासकीय राजवट होती़ १९८८ पासून युतीच्या ताब्यात महापालिका आहे़ विद्यमान पदाधिकारी नेहमीप्रमाणे गेल्या पाच वर्षांतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचे खापर फोडून मोकळे होतात़ बांधकामे वाढत आहेत़ उद्योग वाढताहेत़ वाहनांची संख्या वाढते आहे. पालिका १९ व्या शतकात केलेल्या कामांचे गोडवे अजूनही गात आहे़ युतीने २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दिलेल्या वचनांतील एकही उपक्रम साडेचार वर्षांत पूर्ण केलेला नाही. विरोधी पक्षनेते म्हणाले.. विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड म्हणाले, वर्धापन दिन असला तरी त्याची उत्सुकता मनपात दिसून येत नाही. या सगळ्याला पदाधिकारी आणि अधिकारी जबाबदार आहेत. नियोजन करण्यात सर्वांना अपयश आल्यामुळे शहर बकाल होत चालले आहे. सभागृह नेते म्हणाले.. साधेपणाने वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे वर्धापन दिन साधेपणाने होईल, असे सभागृह नेते किशोर नागरे म्हणाले. काय पूर्ण केलेमुक्तिसंग्राम संग्रहालयाचे काम सुरू आहे. भुयारी गटार योजनेचे काम सुरू झाले आहे. मनपाकडून दीड हजार कोटींची कामे प्रगतिपथावर आहेत; परंतु ती पूर्ण होण्यास तीन वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. रस्त्यांची बरीचशी कामे सुरू आहेत, तर अनेक कामे रखडली आहेत. गुंठेवारी वसाहती अधिकृत करण्याचा मुद्दा मागे पडला आहे. वसाहतींमध्ये सुविधा देण्यात पालिका कमी पडली आहे. समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाले; परंतु जलवाहिनी होण्यास विलंब लागणार आहे.