शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वेळेत उपचार घ्या; घाटी रुग्णालयात कोरोनाचे ८० टक्के रुग्ण गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 12:46 IST

वेळेत उपचार घेण्याकडे रुग्णांनी केलेल्या दुर्लक्षाचे गंभीर परिणाम 

ठळक मुद्दे80% घाटीत कोरोनाचे रुग्ण हे स्टेज-४ आणि स्टेज-५ मधील आहेत.२०% रुग्णांत आॅक्सिजन ९०% वर 

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : कोरोनाचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकृती गंभीर आणि अतिगंभीर होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. एकट्या घाटीत कोरोनाचे ८० टक्के रुग्ण हे स्टेज-४ आणि स्टेज-५ मधील आहेत. यात स्टेज-५ मधील रुग्णांना वाचविण्याचे आव्हान डॉक्टरांपुढे उभे आहे.

सामान्य व्यक्तीच्या शरीरात ९५ ते ९९ टक्के ऑक्सिजन असतो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कमी झाले, तर व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास सुरू होतो. कोरोना प्रादुर्भावाच्या गेल्या ६ महिन्यांत कोरोनाची लागण झालेले, मात्र कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण सुमारे ८० टक्के होते; परंतु आता परिस्थिती उलट झाली आहे. गंभीर  स्वरूपातील रुग्णांचे प्रमाण सध्या अधिक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला उपचारासाठी कसरत करावी लागत आहे. घाटी रुग्णालयात कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.  यात अनेक गंभीर रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यात डॉक्टर यशस्वीही होत आहेत. मात्र, कोरोनाच्या अतिगंभीर रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाविषयी चिंता व्यक्त होत आहे. 

अडीच हजारांवर रुग्णांवर उपचारघाटीत गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मंगळवारी दुपारपर्यंत तब्बल ३५१ रुग्ण दाखल होते, तर १४ सप्टेंबरपर्यंत एकूण २ हजार ५६४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, तर १ हजार ४१८ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

ऑक्सिजन ४० टक्के, तरीही यशघाटीत दाखल झालेल्या एका रुग्णाची आॅक्सिजन पातळी ४० टक्क्यांपर्यंत खाली आली होती. हा रुग्ण १५ दिवस व्हेंटिलेटरवर होता. उपचारामुळे त्याचे व्हेंटिलेटर काढण्यात यश आल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. 

कोरोनाचे डॉक्टरांनी सांगितलेले ५ टप्पे स्टेज-१ मधील रुग्ण म्हणजे ज्यांना लागण झाली तरी कोणतीही लक्षणे नाहीत. स्टेज-२ मधील रुग्णांत थोडासा ताप; पण आॅक्सिजनची पातळी सामान्य अशी अवस्था असते.स्टेज-३ मध्ये रुग्णांची प्रकृती मध्यम स्वरूपाची असते. या स्टेजमध्ये २-अ प्रकारात रुग्णांची आॅक्सिजन पातळी ही ९४ ते ९७ टक्क्यांदरम्यान असते, तर २-ब प्रकारात आॅक्सिजनची पातळी ही ९० ते ९४ टक्के असते. स्टेज-४ मध्ये आॅक्सिजन पातळी ९० ते ८८ टक्क्यांदरम्यान असते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होते. स्टेज-५ मध्ये आॅक्सिजनची पातळी ८८ टक्क्यांपेक्षा अधिक खाली जाते. त्यामुळे रुग्ण अतिगंभीर अवस्थेत जातो.

आजार लपवू नकाकोरोना विषाणू आणि या आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; परंतु अनेक जण आजार अंगावर काढून उपचारासाठी उशिराने दाखल होतात; परंतु कोणत्याही परिस्थिती आजार लपविता कामा नये.  वेळीच उपचार घेतले पाहिजेत.-डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

२०% रुग्णांत आॅक्सिजन ९०% वर ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यांतून केवळ आॅक्सिजनची गरज असलेले रुग्णही घाटीत येत आहेत. केवळ १५ ते २० टक्के रुग्ण ९० टक्क्यांवर आॅक्सिजन पातळी असलेले रुग्ण दिसून आले. उर्वरित रुग्ण हे स्टेज-४, स्टे-५ मधील आहेत. गंभीर रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण लवकर रुग्णालयात आल्यास गंभीर रुग्णास आॅक्सिजन लवकर देता येतो. गंभीर रुग्णासाठी आॅक्सिजन अधिक फायदेशीर आहे. - डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी