शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

वेळेत उपचार घ्या; घाटी रुग्णालयात कोरोनाचे ८० टक्के रुग्ण गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 12:46 IST

वेळेत उपचार घेण्याकडे रुग्णांनी केलेल्या दुर्लक्षाचे गंभीर परिणाम 

ठळक मुद्दे80% घाटीत कोरोनाचे रुग्ण हे स्टेज-४ आणि स्टेज-५ मधील आहेत.२०% रुग्णांत आॅक्सिजन ९०% वर 

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : कोरोनाचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकृती गंभीर आणि अतिगंभीर होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. एकट्या घाटीत कोरोनाचे ८० टक्के रुग्ण हे स्टेज-४ आणि स्टेज-५ मधील आहेत. यात स्टेज-५ मधील रुग्णांना वाचविण्याचे आव्हान डॉक्टरांपुढे उभे आहे.

सामान्य व्यक्तीच्या शरीरात ९५ ते ९९ टक्के ऑक्सिजन असतो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कमी झाले, तर व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास सुरू होतो. कोरोना प्रादुर्भावाच्या गेल्या ६ महिन्यांत कोरोनाची लागण झालेले, मात्र कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण सुमारे ८० टक्के होते; परंतु आता परिस्थिती उलट झाली आहे. गंभीर  स्वरूपातील रुग्णांचे प्रमाण सध्या अधिक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला उपचारासाठी कसरत करावी लागत आहे. घाटी रुग्णालयात कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.  यात अनेक गंभीर रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यात डॉक्टर यशस्वीही होत आहेत. मात्र, कोरोनाच्या अतिगंभीर रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाविषयी चिंता व्यक्त होत आहे. 

अडीच हजारांवर रुग्णांवर उपचारघाटीत गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मंगळवारी दुपारपर्यंत तब्बल ३५१ रुग्ण दाखल होते, तर १४ सप्टेंबरपर्यंत एकूण २ हजार ५६४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, तर १ हजार ४१८ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

ऑक्सिजन ४० टक्के, तरीही यशघाटीत दाखल झालेल्या एका रुग्णाची आॅक्सिजन पातळी ४० टक्क्यांपर्यंत खाली आली होती. हा रुग्ण १५ दिवस व्हेंटिलेटरवर होता. उपचारामुळे त्याचे व्हेंटिलेटर काढण्यात यश आल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. 

कोरोनाचे डॉक्टरांनी सांगितलेले ५ टप्पे स्टेज-१ मधील रुग्ण म्हणजे ज्यांना लागण झाली तरी कोणतीही लक्षणे नाहीत. स्टेज-२ मधील रुग्णांत थोडासा ताप; पण आॅक्सिजनची पातळी सामान्य अशी अवस्था असते.स्टेज-३ मध्ये रुग्णांची प्रकृती मध्यम स्वरूपाची असते. या स्टेजमध्ये २-अ प्रकारात रुग्णांची आॅक्सिजन पातळी ही ९४ ते ९७ टक्क्यांदरम्यान असते, तर २-ब प्रकारात आॅक्सिजनची पातळी ही ९० ते ९४ टक्के असते. स्टेज-४ मध्ये आॅक्सिजन पातळी ९० ते ८८ टक्क्यांदरम्यान असते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होते. स्टेज-५ मध्ये आॅक्सिजनची पातळी ८८ टक्क्यांपेक्षा अधिक खाली जाते. त्यामुळे रुग्ण अतिगंभीर अवस्थेत जातो.

आजार लपवू नकाकोरोना विषाणू आणि या आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; परंतु अनेक जण आजार अंगावर काढून उपचारासाठी उशिराने दाखल होतात; परंतु कोणत्याही परिस्थिती आजार लपविता कामा नये.  वेळीच उपचार घेतले पाहिजेत.-डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

२०% रुग्णांत आॅक्सिजन ९०% वर ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यांतून केवळ आॅक्सिजनची गरज असलेले रुग्णही घाटीत येत आहेत. केवळ १५ ते २० टक्के रुग्ण ९० टक्क्यांवर आॅक्सिजन पातळी असलेले रुग्ण दिसून आले. उर्वरित रुग्ण हे स्टेज-४, स्टे-५ मधील आहेत. गंभीर रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण लवकर रुग्णालयात आल्यास गंभीर रुग्णास आॅक्सिजन लवकर देता येतो. गंभीर रुग्णासाठी आॅक्सिजन अधिक फायदेशीर आहे. - डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी