शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बच्चू भाऊंचे हळवे रूप ! शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये रमले; बरोबर उत्तर देणाऱ्यास बक्षीसही दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 19:18 IST

विद्यार्थी कमी का बोलतात, याचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांना दिल्या.

ठळक मुद्देराज्यमंत्र्यांनी साधला नंद्राबादशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद

औरंगाबाद ः जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नंद्राबाद (ता.खुलताबाद) येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेला शुक्रवारी दुपारी अडीच वाजता अचानक भेट दिली. यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे बरोबर उत्तर दिलेल्या विद्यार्थ्यास त्यांनी खुश होत रोख बक्षीसही दिले. यावेळी पाचवी ते सातवी ३३ पैकी २२ विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मात्र, विद्यार्थी कमी का बोलतात, याचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांना दिल्या.

ग्रामीण भागात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले. विद्यार्थी उपस्थितीची आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती कडू यांना जाणून घ्यायची होती. यावेळी त्यांनी सरपंच इलियास शेख, शालेय समितीच्या अध्यक्ष आरती भोले यांच्यासह शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला. १ आॅगस्टपासून गावात समुह पद्धतीने शिक्षण सुरु असल्याचे गावकरी व शिक्षकांनी त्यांना सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी जयस्वाल, गटशिक्षणाधिकारी सचिन सोळंकी, विस्तार अधिकारी विलास केवट आदीची उपस्थिती होती.

उत्तरावर खुश झाल्याने दिले विद्यार्थ्याला बक्षीससातवीचा विद्यार्थी सुमित बोडखे या विद्यार्थ्याला कडू यांनी गुरुवारी काय शिकले हे विचारले असता त्याने असे जगावे ही कविता शिकल्याचे सांगितले. त्यावर कडू यांनी त्यातून काय शिकले असे विचारल्यावर आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली. कितीही संकटे आली तर न घाबरता त्या परिस्थितीला तोंड दिले पाहीजे असे शिकल्याचे सांगितले. त्यावर खुश होऊन कडू यांनी विद्यार्थ्याला रोख बक्षीस दिले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद