शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

भडकलेल्या महागाईत सर्वसामान्यांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 19:43 IST

घरगुती बजेट कोलमडले 

ठळक मुद्देराजकारण्यांचे सत्तेकडेच लक्ष, भाववाढीकडे दुर्लक्ष मागील वर्षभरापासून महागाई बाजारपेठेत मुक्कामी 

औरंगाबाद : जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झाली की, त्याचा थेट परिणाम, सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होत असतो. सध्या हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. महागाई एवढी भडकली आहे की, सर्वसामान्य होरपळून गेला आहे. एकीकडे उत्पन्न वाढत नाही; पण दुसरीकडे खर्च वाढला आहे. भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या राजकारण्यांचे सत्ता टिकविण्यातच लक्ष असल्याने भाववाढीच्या विषयाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. 

करडी तेल २०० रुपये, सोयाबीन तेल १०० रुपये, सूर्यफुल तेल १०२ रुपये प्रतिलिटर, उडीदडाळ १०५ रुपये, मूगडाळ १०२ रुपये, गहू २७ रुपये, ज्वारी ४५ रुपये प्रतिकिलो हे भाव ऐकून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होत आहेत. शहरात भात खाऊन दिवस काढणाºयांची संख्याही कमी नाही. मात्र, तांदूळही कमीत कमी २८ रुपये किलोने मिळत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच करडी तेलाने २०० रुपयांचा उंबरठा गाठला आहे. गहू, ज्वारी व बाजरीच्या भावानेही यापूर्वीचे भाववाढीचे विक्रम मोडीत काढत नवीन उच्चांक गाठले आहे. 

मागील वर्षभरापासून महागाई बाजारपेठेत मुक्कामी आहे. त्यात मागील दोन महिन्यांतील भाववाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. सध्या बाजारात कांदा ४० ते ५० रुपये, तर बटाटा ३५ ते ४० रुपये किलो विकतो आहे. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट झालेच पाहिजे यात कोणतेही दुमत नाही. मात्र, याचा फायदा शेतकºयांऐवजी मधील दलालांच्या साखळीला होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाल होताना दिसत नाही. यामुळे भाववाढ थांबण्याचे नाव घेत नाही. देशातील तेलउद्योगांना उभारी देण्यासाठी व तेलबियांचे क्षेत्र वाढण्यासाठी केंद्र सरकारने क्रूड पामतेलाच्या आयातीवर निर्बंध आणले आहेत. परिणामी, पामतेलासह सर्व खाद्यतेलात तेजी आली आहे. मात्र, २०० रुपये प्रतिलिटरपर्यंत करडी तेल विक्री होणे किंवा सोयाबीन तेलाचे भाव १०० रुपयांपर्यंत जाणे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणारे नाही. याचाही विचार सरकारने करावा, अशी प्रतिक्रिया जुन्या मोंढ्यात किराणा सामान खरेदीसाठी आलेल्या महिलांनी व्यक्त केली. 

खर्चाचा ताळमेळ लागेना रोजच्या जेवणात काय करावे, हा रोजचाच प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. त्यात सध्याच्या परिस्थितीत धान्य व तेलाच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य स्त्रीला तर ठरविलेल्या बजेटमध्ये घर चालविणे खूपच अवघड होऊन बसले आहे. कुठे काटकसर करावी व कु ठे खर्च यांचा ताळमेळ लागत नाही. तुटपुंज्या कमाईत सर्व खर्च भागविणे कठीण होते. बदलत्या काळात सोन्या-चांदीच्या भावाप्रमाणे धान्य आणि तेलाच्या किमतीकडेही लोकांचे लक्ष वेधले जात आहे. - प्राची कापसे

महागाईमुळे तारेवरची कसरतसध्या बाजारपेठेत झालेल्या महागाईने गृहिणी अगदीच हवालदिल झाल्या आहेत. धान्य, डाळी, तेल, दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढलेल्या दरामुळे गृहिणींना घरखर्चाचा मेळ बसविण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे. पैशांची बचत कशी करावी, असा प्रश्न आज गृहिणींसमोर आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये तरी बेसुमार भाववाढ व्हायला नको.- यामिनी होले

महागाईचा तक्ता 

वस्तू    नोव्हेंबर २०१८  (किलो)    जानेवारी २०१९  (किलो)गहू    २४.५० रुपये ते  ३८ रुपये    २६.५० रुपये ते ३५ रुपयेज्वारी    ३५ रुपये ते ४० रुपये    ४५ ते ५५ रुपये बाजरी    २४ ते २६ रुपये    २६ ते ३० रुपयेतांदूळ    ३० ते ११० रुपये    २८ ते ११० रुपये हरभरा डाळ    ४५ ते ५६ रुपये    ५६ ते ५८ रुपयेतूर डाळ    ८४ ते ८६ रुपये    ७८ ते ८० रुपयेमूग डाळ    ७८ ते ८० रुपय    १०० ते १०२ रुपयेउडीद डाळ    ७८ ते ८० रुपये    ९८ ते १०५ रुपयेमसूर डाळ    ५० ते ६० रुपये    ६० ते ६८ रुपये  मठ     ६० ते ६२ रुपये     ७४ ते ७६ रुपयेरवा    २८ ते ३० रुपये    ३२ ते ३४ रुपयेमैदा    २६ ते २८ रुपये    ३० ते ३२ रुपयेआटा    २८ ते ३० रुपये    ३२ ते ३४ रुपये(पॅकिंगमधील खाद्यतेल, प्रतिलिटर)                    करडी तेल    १६० ते १७० रुपये    १९५ ते २०० रुपयेसोयाबीन तेल    ७८ ते ८० रुपये    ९८ ते १०० रुपयेसूर्यफूल तेल    ८० ते ८५ रुपये    ९८ ते १०२ रुपयेपामतेल    ६८ ते ७२ रुपये    ९४ ते ९६  रुपये

टॅग्स :InflationमहागाईAurangabadऔरंगाबादFamilyपरिवार