शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

महाव्यवस्थापकांनी घेतला स्थानकाचा आढावा

By admin | Updated: June 9, 2015 00:21 IST

जालना : रेल्वेस्थानकाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त आलेले दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पी.के.श्रीवास्तव,

जालना : रेल्वेस्थानकाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त आलेले दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पी.के.श्रीवास्तव, नांदेड विभागाचे व्यवस्थापक पी.सी.शर्मा यांनी संपूर्ण रेल्वेस्थानकाचा आढावा घेऊन स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विशेष म्हणजे श्रीवास्तव यांनी स्थानकांतील प्रवाशांसोबत हितगुज करुन समस्या जाणून घेतल्या. श्रीवास्तव सकाळी सव्वा अकरा वाजता स्थानकांत दाखल झाले. विविध संघटनांचे निवेदने स्वीकारल्यानंतर त्यांनी संपूर्ण स्थानकाची पाहणी केली. नवीन इमारत प्रतीक्षागृहे तेथील सुविधांची पाहणी केली. स्थानकातील स्वच्छतेच्या मुद्यावरही त्यांनी भर दिला. रेल्वेपटरी स्वच्छतेबाबत त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. स्थानिक अधिकाऱ्यांनाही स्वच्छ रेले स्वच्छ भारत अभियान योग्य पद्धतीने राबविण्याच्या सूचना दिल्या. रेल्वेची सिग्नल यंत्रणेचे त्या ठिकाणाहून नियंत्रण केले जाते त्या कक्षाची पाहणी केली. तेथील यंत्रणेची पाहणी केली. संबंधितांना सूचना दिल्या. तिकीट खिडकीस भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. स्थानकातील कँटीनची पाहणी केली. तेथील अन्न पदार्थांच्या दर्जाबाबतही संबंधितांशी चर्चा केली. काही सूचना दिल्या. नांदेड विभाग मध्य रेल्वेत समाविष्ट करण्याची मागणी रेल्वे नांदेड ते मनमाड हा मार्ग दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिन असून दक्षिण मध्ये रेल्वेने चालू हंगामात एकूण १८ नवीन रेल्वे गाड्या चालू केल्या; परंतु मराठवाड्यासाठी एकाही गाडीचे नियोजन करण्यात आले नाही. नांदेड विभाग दक्षिण मध्य रेल्वेत असल्यामुळे या विभागाकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जाते. जनशताब्दी एक्सप्रेस ही मध्य रेल्वेच्या अधिन असल्यामुळे जालना रेल्वे स्टेशनवर सर्व तयारी असून सुध्दा या गाडीला हिरवा कंदील मिळत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. जालना-खामगाव, सोलापूर-जालना-जळगाव, जनशताब्दी औरंगाबाद-मुंबई या गाड्या मध्य रेल्वेच्या अधिन असल्यामुळे या मार्गाकडे हेतुतूरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. त्यासाठी नांदेड-मनमाड हा मार्ग मध्ये रेल्वेला जोहण्यात यावा. जालना-खामगाव मार्गाला त्वरित मान्यता द्यावी. सोलापूर-जालना-जळगाव हा मार्ग मागास विभाग म्हणून केंद्राने त्वरित निधी उपलब्ध करुन द्यावा, परभणी-मनमाड या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी. विद्युत कॉलनी, रमाबाईनगर, आनंदनगर, सरस्वती कॉलनी, जमुनानगर या भागातील नागरिकांना रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करुन राज्य शासनाने त्वरित निधी उपलब्ध करुन द्यावा, अजमेर-बिकानेर व गोरखपूर-बनारस यासाठी मनमाडमार्गे नवीन रेल्वे चालू करण्यात याव्या आदी मागण्या नांदेड विभाग दक्षिण मध्ये रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या . त्यावर सतिष बाभळे, तय्यब देशमुख, राम गायकवाड, दिलीप व्यास, अशोक पडुळ, रमेश देहेडकर, दिनकर घेवंदे, देविदास जिगे, श्रीकांत शेलगावकर, नविन पिंपळगावकर, रामेश्वर साठे, रामेश्वर लोखंडे, राजू ढवळे आदींच्या सह्या आहेत.