शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

सामान्य माणसांचा नेता काळाच्या पडद्याआड

By admin | Updated: February 17, 2015 00:38 IST

उस्मानाबाद : माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. हे वृत्त उस्मानाबाद जिल्ह्यात धडकताच राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली.

उस्मानाबाद : माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. हे वृत्त उस्मानाबाद जिल्ह्यात धडकताच राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. ग्रामीण मातीशी नाळ असलेल्या या जिंदादील नेत्यास मान्यवरांनी शोकसंदेशाद्वारे श्रध्दांजली अर्पण केली. माजी गृहमंत्री आऱआऱपाटील हे एक कुशल नेतृत्व होते़ सर्वांना सोबत घेवून काम करणारा एक नेता म्हणून त्यांना ओळखले जात होते़ ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सदैव आग्रेसर राहत़ कितीही मोठ्या पदावर असले तरी सर्वसामान्यांना आपले समजून वागविणारा, कार्यकर्त्यांना जपणाऱ्या अशा या प्रामाणिक नेत्याच्या अकाली निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले. - ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी आमदारखडतर वाटचालीतून उच्च पदापर्यंत वाटचाल़ ‘कमवा आणि शिका’ योजनेतून शिक्षण घेणारे आऱआऱ यांचा उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे़ ग्रामविकास मंत्री पदाला त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवले़ त्यांनी सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा इनोने गौरव केला होता़ त्यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे़ त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नव्हे तर राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. डॉ़ पद्मसिंह पाटील, माजी खासदार उमदे नेतृत्व हरपले४आबांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे़ सामान्यांना आपलसं वाटणारे हे उमदे नेतृत्व अनेक वर्षापासून राज्याच्या नव्हे तर देशाच्या जनतेला नैतिकतेने ही राजकारण करता येते, हे दाखवत होते़ पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख कायम ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता़ मी राज्यमंत्री म्हणून काम करत असताना ते उपमुख्यमंत्री होते़ त्यांच्या सहवासात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या़ त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात व समाजकारणात त्यांची उणीव जाणवेल. - आ. राणाजगजितसिंह पाटील ग्रामीण मातीशी नाते जोडणारे नेतृत्व गेले४आबा हे शालेय जीवनापासूनच वक्तृत्वशैलीत अग्रेसर होते. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे त्यांना राजकारणात संधी मिळाली. ते सर्वसामान्यांचे कैवारी होते. माणसातील माणूस शोधण्याचे कौशल्य त्यांना प्राप्त झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे ग्रामीण मातीशी नाते जोडणारे नेतृत्व, या भूमिकेतून पाहत होते. त्यांना मंत्रीपदाचा गर्व कधीही नव्हता. दरम्यानच्या कालावधीत त्यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण दिले. अशा या कतृत्त्ववान नेत्याला भावपूर्ण श्रध्दांजली. - ज्ञानराज चौगुले, आमदार