शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

गौतम बुद्धांचे विचारच देशाला योग्य दिशा देतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:47 IST

सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्धांचे विचार या देशाला योग्य दिशा देऊन समता आणि शांतता प्रस्थापित करू शकतात, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले.

ठळक मुद्देशिवानंद भानुसे : विद्यापीठातील गौतम बुद्ध अध्यासन केंद्रातर्फे चर्चासत्र

औरंगाबाद : सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्धांचे विचार या देशाला योग्य दिशा देऊन समता आणि शांतता प्रस्थापित करू शकतात, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गौतम बुद्ध अध्यासन केंद्रातर्फे ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखेलिखित ‘सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध : माझे आकलन’ या ग्रंथावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी व्याख्याते प्रा. प्रदीप सोळुंके, संचालक डॉ. संजय मून उपस्थित होते. डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले, तथागतांनी वैदिक व्यवस्थेमधील अन्याय, अत्याचार आणि विषमता यांचे निर्मूलन करण्याचा विधायक प्रयत्न करून समतेचा आणि शांततेचा संदेश दिला. त्यांचे सगळे विचार नैतिकतेच्या अधिष्ठानावर उभे असल्यामुळे त्या विचारांचे समोरासमोर खंडन करणे वैदिकांना शक्य नव्हते. त्यासाठी त्यांनी अप्रत्यक्ष असे नाना प्रयत्न केले. बहुजनांच्या अत्यंत लोकप्रिय शिवाला तथागताच्या विरोधात उभे केले. संभ्रम निर्माण केला; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण शिव आणि बुद्ध एकाच सांस्कृतिक प्रवाहाचे निर्माते होते, असेही डॉ. भानुसे यांनी स्पष्ट केले.प्रा. प्रदीप साळुंके म्हणाले, तथागत गौतम बुद्ध हे भारताने जगाला दिलेले रत्न आहेत. तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हजारो वर्षांपासून आपल्यापर्यंत पोहोचले आहे. यापुढेही ते हजारो वर्षे अस्तित्वात राहणार आहेत. त्याविषयी विविध मतमतांतरे, अनेक समज-गैरसमज समाजात जाणीवपूर्वक पसरवले होते. मात्र, आज जगाला याची जाणीव झाली आहे की, तथागत गौतम बुद्ध हे आमचेच मूळपुरु ष आहेत, असेही प्रा. साळुंके यांनी सांगितले. डॉ. आनंद वाघ यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, महानगराध्यक्ष बाबासाहेब दाभाडे, धनंजय पाटील, प्रा. भागवत काकडे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :universityविद्यापीठAurangabadऔरंगाबाद