शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

गौतम बुद्धांचे विचारच देशाला योग्य दिशा देतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:47 IST

सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्धांचे विचार या देशाला योग्य दिशा देऊन समता आणि शांतता प्रस्थापित करू शकतात, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले.

ठळक मुद्देशिवानंद भानुसे : विद्यापीठातील गौतम बुद्ध अध्यासन केंद्रातर्फे चर्चासत्र

औरंगाबाद : सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्धांचे विचार या देशाला योग्य दिशा देऊन समता आणि शांतता प्रस्थापित करू शकतात, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गौतम बुद्ध अध्यासन केंद्रातर्फे ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखेलिखित ‘सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध : माझे आकलन’ या ग्रंथावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी व्याख्याते प्रा. प्रदीप सोळुंके, संचालक डॉ. संजय मून उपस्थित होते. डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले, तथागतांनी वैदिक व्यवस्थेमधील अन्याय, अत्याचार आणि विषमता यांचे निर्मूलन करण्याचा विधायक प्रयत्न करून समतेचा आणि शांततेचा संदेश दिला. त्यांचे सगळे विचार नैतिकतेच्या अधिष्ठानावर उभे असल्यामुळे त्या विचारांचे समोरासमोर खंडन करणे वैदिकांना शक्य नव्हते. त्यासाठी त्यांनी अप्रत्यक्ष असे नाना प्रयत्न केले. बहुजनांच्या अत्यंत लोकप्रिय शिवाला तथागताच्या विरोधात उभे केले. संभ्रम निर्माण केला; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण शिव आणि बुद्ध एकाच सांस्कृतिक प्रवाहाचे निर्माते होते, असेही डॉ. भानुसे यांनी स्पष्ट केले.प्रा. प्रदीप साळुंके म्हणाले, तथागत गौतम बुद्ध हे भारताने जगाला दिलेले रत्न आहेत. तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हजारो वर्षांपासून आपल्यापर्यंत पोहोचले आहे. यापुढेही ते हजारो वर्षे अस्तित्वात राहणार आहेत. त्याविषयी विविध मतमतांतरे, अनेक समज-गैरसमज समाजात जाणीवपूर्वक पसरवले होते. मात्र, आज जगाला याची जाणीव झाली आहे की, तथागत गौतम बुद्ध हे आमचेच मूळपुरु ष आहेत, असेही प्रा. साळुंके यांनी सांगितले. डॉ. आनंद वाघ यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, महानगराध्यक्ष बाबासाहेब दाभाडे, धनंजय पाटील, प्रा. भागवत काकडे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :universityविद्यापीठAurangabadऔरंगाबाद