शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये ‘गॅस कीट’ची वाहने रडारवर; आरटीओ करणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:03 IST

नेवासा (जि. अहमदनगर) तालुक्यातील प्रवरा संगमजवळ सोमवारी मध्यरात्री आॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ‘गॅस कीट’असणारी रिक्षा, चारचाकी वाहने आरटीओ कार्यालयाच्या रडारवर आली आहेत.

औरंगाबाद : नेवासा (जि. अहमदनगर) तालुक्यातील प्रवरा संगमजवळ सोमवारी मध्यरात्री आॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ‘गॅस कीट’असणारी रिक्षा, चारचाकी वाहने आरटीओ कार्यालयाच्या रडारवर आली आहेत. तपासणी मोहिमेतून ‘गॅस कीट’च्या वाहनांची तपासणी करून त्रुटी आढळून येणार्‍यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

प्रवरा संगमजवळ अज्ञात वाहनाने हूल दिल्याने रिक्षा उलटली. त्यामुळे रिक्षातील एलपीजीचा स्फोट झाल्याचे समजते. अवघ्या काही मिनिटांत रिक्षा जळून खाक झाली. या घटनेमुळे गॅस कीटच्या वाहनांची परिस्थिती समोर आली आहे. पेट्रोल, डिझेलचे वाढते दर आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, इंधन खर्च कमी व्हावा, यासाठी शासनाने रिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस) वापरास मान्यता दिली. त्यामुळे असंख्य वाहनचालकांनी याचा वापर सुरू केला. या वाहनांसाठी दर पाच वर्षांनी टाकीच्या क्षमतेची तपासणी करणे बंधनकारक आहे. परंतु औरंगाबादला ही सुविधा नसल्याने बहुतांशी वाहने तशीच धावत आहेत. त्यामुळे या वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर बनत आहे.

एलपीजीमुळे काही कालावधीनंतर टाकीची जाडी कमी होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे दर पाच वर्षांनी नागपूर येथील मुख्य स्फोटक नियंत्रक (सीसीई) यांच्याकडून टाकीच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात येते. वाहनचालक हे चाचणी करण्याबाबत उदासीन आहेत. शहरातील सुमारे अडीच हजार रिक्षा आणि जवळपास १८४० चारचाकी वाहने गॅस कीटवर असल्याचे आरटीओ कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. यातील बहुतांश वाहने कोणत्याही तपासणीशिवाय रस्त्यांवर धावत आहेत. आरटीओ कार्यालयातर्फे गॅस कीटच्या वाहनांची तपासणी केली जाईल. प्रमाणपत्र असेल तरच वाहनांचे नूतनीकरण केले जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी सांगितले.

...असा होतो धोकाज्या वाहनात गॅस कीटची टाकी बसविली आहे, त्याठिकाणी ब्रेक वायरसारख्या इतर पार्टस्चे अनेकदा घर्षण होते. शिवाय गॅसमुळेही टाकीची जाडी कमी होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून सिलिंडरची दाब क्षमता कमी होते. अशा वेळी गॅस गळती, स्फोट झाल्यास मोठी जीवित हानी होण्याचा धोका निर्माण होतो. अशा घटना टाळण्यासाठी आरटीओ कार्यालयाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद