शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
2
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
3
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
4
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
5
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
9
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
10
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
11
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
12
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
13
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
14
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
15
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
16
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
17
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
18
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
19
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
20
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली

औरंगाबादमध्ये ‘गॅस कीट’ची वाहने रडारवर; आरटीओ करणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:03 IST

नेवासा (जि. अहमदनगर) तालुक्यातील प्रवरा संगमजवळ सोमवारी मध्यरात्री आॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ‘गॅस कीट’असणारी रिक्षा, चारचाकी वाहने आरटीओ कार्यालयाच्या रडारवर आली आहेत.

औरंगाबाद : नेवासा (जि. अहमदनगर) तालुक्यातील प्रवरा संगमजवळ सोमवारी मध्यरात्री आॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ‘गॅस कीट’असणारी रिक्षा, चारचाकी वाहने आरटीओ कार्यालयाच्या रडारवर आली आहेत. तपासणी मोहिमेतून ‘गॅस कीट’च्या वाहनांची तपासणी करून त्रुटी आढळून येणार्‍यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

प्रवरा संगमजवळ अज्ञात वाहनाने हूल दिल्याने रिक्षा उलटली. त्यामुळे रिक्षातील एलपीजीचा स्फोट झाल्याचे समजते. अवघ्या काही मिनिटांत रिक्षा जळून खाक झाली. या घटनेमुळे गॅस कीटच्या वाहनांची परिस्थिती समोर आली आहे. पेट्रोल, डिझेलचे वाढते दर आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, इंधन खर्च कमी व्हावा, यासाठी शासनाने रिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस) वापरास मान्यता दिली. त्यामुळे असंख्य वाहनचालकांनी याचा वापर सुरू केला. या वाहनांसाठी दर पाच वर्षांनी टाकीच्या क्षमतेची तपासणी करणे बंधनकारक आहे. परंतु औरंगाबादला ही सुविधा नसल्याने बहुतांशी वाहने तशीच धावत आहेत. त्यामुळे या वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर बनत आहे.

एलपीजीमुळे काही कालावधीनंतर टाकीची जाडी कमी होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे दर पाच वर्षांनी नागपूर येथील मुख्य स्फोटक नियंत्रक (सीसीई) यांच्याकडून टाकीच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात येते. वाहनचालक हे चाचणी करण्याबाबत उदासीन आहेत. शहरातील सुमारे अडीच हजार रिक्षा आणि जवळपास १८४० चारचाकी वाहने गॅस कीटवर असल्याचे आरटीओ कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. यातील बहुतांश वाहने कोणत्याही तपासणीशिवाय रस्त्यांवर धावत आहेत. आरटीओ कार्यालयातर्फे गॅस कीटच्या वाहनांची तपासणी केली जाईल. प्रमाणपत्र असेल तरच वाहनांचे नूतनीकरण केले जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी सांगितले.

...असा होतो धोकाज्या वाहनात गॅस कीटची टाकी बसविली आहे, त्याठिकाणी ब्रेक वायरसारख्या इतर पार्टस्चे अनेकदा घर्षण होते. शिवाय गॅसमुळेही टाकीची जाडी कमी होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून सिलिंडरची दाब क्षमता कमी होते. अशा वेळी गॅस गळती, स्फोट झाल्यास मोठी जीवित हानी होण्याचा धोका निर्माण होतो. अशा घटना टाळण्यासाठी आरटीओ कार्यालयाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद