शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

उद्याने बनली टवाळखोरांचे अड्डे...!

By admin | Updated: May 14, 2014 01:06 IST

उदगीर : उदगीर शहरात व बनशेळकी तलावाच्या खाली असलेल्या पालिकेच्या मालकीची असलेल्या सर्व उद्यानाची दुरावस्था झाली.

उदगीर : उदगीर शहरात व बनशेळकी तलावाच्या खाली असलेल्या पालिकेच्या मालकीची असलेल्या सर्व उद्यानाची दुरावस्था झाली असून ही उद्याने आज घडीला टवाळखोरांची अड्डे बनली आहेत. पालिकेने या सर्व उद्यानाच्या ठिकाणी सुरक्षा गार्डची नेमणूक करून ही उद्याने सुरक्षित वातावरणात सुरू करून बाल-गोपाळांसह सर्वांना लाभ मिळवून देण्याची मागणी उदगीर शहरवासियांनी केली आहे. उदगीर शहरात नगरपरिषदेच्या मालकीची महात्मा गांधी, हुतात्मा स्मारक, अहिल्यादेवी होळकर उद्याने आहेत. याशिवाय बनशंकरी तलावाखाली पालिकेने लाखो रुपये खर्चून उद्यान व सहल केंद्र तयार केले आहे. यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून मिळालेला निधीही खर्च करण्यात आला. याठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी मोठी बैठक व्यवस्था करण्यात आली. शिवाय लहान बाल-गोपाळांना खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात खेळणीचे साहित्य लावण्यात आले आहे. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या उद्यान व सहल केंद्राकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे या उद्यानात आता मोठ-मोठी काटेरी कुंपणाची झाडे-झुडूपे व गवत वाढलेले आहे. शेळ्या-मेंढ्या व जनावरे चारण्यासाठी या उद्यानाचा उपयोग होत आहे. पालिकेच सुरक्षा गार्ड या ठिकाणी नसल्यामुळे टवाळखोरांचा अड्डा या ठिकाणी बनला आहे. उदगीर शहराच्या मध्यवस्तीत म. गांधी व हुतात्मा स्मारकाचे उद्यान आहे. या उद्यानासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे आजूबाजूने लावण्यात आलेले झाड वाळून जात आहे. म. गांधी उद्यानाभोवती बार-रेस्टॉरंटची हॉटेल्स व अन्य व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या ठिकाणी डासांचा मोठा प्रादुर्भाव असून दुर्गंधही असल्यामुळे माहितगार नागरिक व बोलगोपाळ या ठिकाणी कमीच जातात. हुतात्मा स्मारक व बाजूची जिल्हा परिषद शाळा व क्रीडांगण हे टवाळखोरांचा ‘लव्ह-पाईन्ट’ बनला आहे. त्याचा त्रास उद्यानात येणार्‍यांना होत आहे. सायंकाळच्या वेळी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व बालगोपाळ मोठ्या प्रमाणात आपला वेळ व्यतीत करण्यासाठी येतात. सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू आहे. यामुळे बालगोपाळांचा खेळण्याचा आनंद हिरावला जात आहे. उदगीर शहराच्या बीदर रस्त्यावर असलेल्या अहिल्यादेवी होळकर उद्यानात पालिकेकडून साफसफाई होत नसल्यामुळे या उद्यानात असलेल्या कचराकुंडीची दुर्गंधी पसरली आहे. डासांचे प्रमाणही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. बालगोपाळांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचा ठेवा असलेल्या या उद्यानात पालिकेने सुरक्षा गार्डच्या नेमणूका करून या उद्यानाची झालेली दूरावस्था दूर करावी अशी मागणी उदगीरवासियांची आहे. (वार्ताहर) उद्यानाची साफसफाई करण्यात यावी उदगीर शहरात असलेल्या सर्व उद्यानात पालिकेचे कर्मचारी कार्यरत आहेत. बनशेळगी तलावाशेजारी असलेल्या उद्यानात पालिकेचे कर्मचारी पाठवून साफ-सफाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया उदगीर पालिकेचे अभियंता रमेश मोरे यांनी दिली. उदगीर शहरात असलेली व बनशेळकी तलावाशेजारील असलेल्या पालिकेच्या मालकीच्या उद्यानात घरच्या मंडळीसह बाल-गोपाळांना घेऊन जावे वाटते, मात्र या ठिकाणी पालिकेची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे या उद्यानात बाल-गोपाळांना व घरच्या मंडळींना जाण्याची इच्छा होत नाही. परिणामी नागरिकांना कुठल्यातरी कट्ट्याचा आधार घ्यावा लागतो, असे मत अनंत आपसिंगेकर यांनी व्यक्त केले. उदगीरात असलेल्या उद्यानात लहान लेकरांना व शाळकरी मुलींना घेऊन जाणे म्हणजे स्वत:वर आपत्ती ओढवून घेण्यासारखे आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षक बापूराव बोधले यांनी व्यक्त केले.