शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कचराप्रश्नी शिवसेनेचा मनपा आयुक्तांवर ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:57 IST

शहरातील कचराकोंडीच्या वर्षभरानंतर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायम आहे. शहरातील कचराप्रश्नी शिवसेनेने मनपा आयुक्तांवर ठपका ठेवला आहे.

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीच्या वर्षभरानंतर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायम आहे. शहरातील कचराप्रश्नी शिवसेनेने मनपा आयुक्तांवर ठपका ठेवला आहे. वेळकाढू कार्यशैली आणि घनकचरा व्यवस्थापनाचा तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल चुकल्याने हा प्रश्न सुटण्याची शक्यता नसल्याची टीका शिवसेनेने मनपा आयुक्तांवर केली आहे.

स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी शुक्रवारी मनपा आयुक्तांना कामात सुधारणा करण्यासंदर्भात एक पत्र दिले आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापनाचा जो जटिल प्रश्न निर्माण झाला होता, त्याची प्रशासकीय कसब वापरून सोडवणूक कराल, अशी आशा होती. मुख्यमंत्र्यांनीदेखील तज्ज्ञ असल्याचे सांगून मनपा आयुक्तपदी नियुक्ती केली. परंतु एक वर्षाचा कालावधी लोटूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या घनकचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावणे अपेक्षित असताना वेळकाढू कार्यशैलीमुळे औरंगाबाद शहराच्या चारही बाजूस नारेगावसारखी परिस्थिती झालेली आहे, असे या पत्रात नमूद केले आहे.

याबरोबर घनकचरा व्यवस्थापनांतर्गत आयुक्तांनी तयार केलेला डीपीआर चुकला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटण्याची शक्यता आणखी दुरावली आहे. सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) शासन स्वीकारील किंवा नाही, याची शाश्वती नाही. परिणामी शहरातील कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटण्याची शक्यता धूसर झाली आहे, असे राजू वैद्य यांनी पत्रात नमूद केले आहे.याबरोबर उत्पन्न वाढीसाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. वैधानिक तरतुदीचे हेतूपुरस्सर उल्लंघन क रणे, जी पदे मंजूर नाहीत, अशा पदांवर नियुक्त्या, जबाबदारीपासून अलिप्त राहण्याचे धोरण, जनतेसाठी कार्यालयात उपलब्ध नसणे आदींचाही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. आगामी वर्ष हे निवडणुकीचे आहे. आम्हा लोकप्रतिनिधींना जनतेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामात योग्य सुधारणा करण्याची अपेक्षा या पत्रात राजू वैद्य यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकला होता कचराशहरातील कचराकोंडी फोडण्यात सत्तारूढ पक्ष अयशस्वी ठरलेले असताना १९ जुलै २०१८ रोजी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेशद्वारासमोर कचरा फेकला होता. शहर स्वच्छ राखण्याची जबाबदारी असणारे नगरसेवकही कचरा टाकण्याच्या आंदोलनात सहभागी झाले होते. आता कचºयावरून मनपा आयुक्तांना शिवसेनेने लक्ष्य केले आहे.एकच उपाय, पदाधिकाºयांनो राजीनामे द्या...कचराकोंडीने त्रस्त झालेल्या औरंगाबादकरांच्या मनात काय आहे, यासंदर्भात ‘लोकमत’ने शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून मते जाणून घेतली होती. यामध्ये ‘एकच उपाय, पदाधिकाºयांनो राजीनामे द्या’ अशी मागणी जनतेतून समोर आली होती. महापालिकेतील राजकारणामुळे प्रश्न सुटत नसल्याबरोबर ढिसाळ प्रशासनही कारणीभूत असल्याचे नागरिकांनी म्हटले होते. ३१ जानेवारी रोजी हे सर्वेक्षण सविस्तर प्रकाशित करण्यात आले होते. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद