शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

गंगापूर तालुका बनला लाचखोर अधिकाऱ्यांचा अड्डा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:04 IST

जयेश निरपळ गंगापूर : प्रत्येक शासकीय-निमशासकीय कार्यालयासमोर लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे, असे फलक प्रथमदर्शनी लावण्यात येतात. ...

जयेश निरपळ

गंगापूर : प्रत्येक शासकीय-निमशासकीय कार्यालयासमोर लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे, असे फलक प्रथमदर्शनी लावण्यात येतात. तरीसुद्धा पैशाची चटक लागलेले काही लाचखोर कर्मचारी सर्वसामान्यांकडून पैशाची मागणी करीत असतात. गंगापूर तालुक्यात आठवडाभरातच तीन बडे अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने तालुका लाचखोरांचा अड्डा झाल्याचे नागरिक बोलत आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत आठवडाभरात गंगापूर तालुक्यातील तीन बडे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना लगाम कोण लावणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घाणेगाव येथील जमिनीची दोन वेगवेगळी खरेदी खते करण्यासाठी ७० हजार व सदनिका खरेदीखत करण्यासाठी १३ हजार रुपये लाच मागणारा दस्त नोंदणी उपनिबंधक औदुंबर लाटे व खासगी एजंट संजय कांबळे विरोधात २ एप्रिल रोजी एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. जांभाळा येथे मंजूर विहिरीकरिता ठराव देण्यासाठी ग्रामसेवक बबन हलगडे व सरपंच पती गणेश शेलार यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांना ९ एप्रिल रोजी एसीबीने रंगेहात पकडले, तर याच दिवशी दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत आपेगाव येथील वडिलोपार्जित जमिनीवरील 'बेकायदेशीर व्यवहार' असा पडलेला शेरा काढण्यासाठी महसूल सहायकामार्फत सव्वा लाख रुपयाच्या लाचेची मागणी करणारे तहसीलदार अविनाश शिंगोटे व सहायक अशोक मरकड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खुद्द तालुका दंडाधिकारी लाचेची मागणी करताना अडकल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. छोट्या कामासाठीदेखील 'पंटर' मार्फत लाचेची मागणी करणारी अधिकाऱ्यांची एक 'टोळीच' तालुक्यात सक्रिय असून चिरीमिरीसाठी नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील धडा शिकवला गेला पाहिजे, अशा नागरिकांच्या भावना आहेत. आठवडाभरात झालेल्या कारवाईने इतर भ्रष्ट लाचखोर अधिकारी या कारवाईमुळे सावध झाले आहेत. चांगले काम करणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांना मात्र सहकाऱ्यांच्या 'भ्रष्ट' वर्तनामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चाैकट

यामुळे लाचखोरांचे फावते

जवळपास शासकीय कार्यालयांत काेणत्या ना कोणत्या कारणासाठी लाच मागणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केल्यास आपला वेळ जातो व आपले काम प्रलंबित राहू शकते, या भीतीने अनेक नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे फावत आहे. त्यामुळे नागरिकांनी लाच मागणाऱ्यांची तक्रार दाखल करावी, असे आवाहन लाचलुचपत विभागाच्या वतीने नेहमी करण्यात येते.