शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर तालुका बनला लाचखोर अधिकाऱ्यांचा अड्डा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:04 IST

जयेश निरपळ गंगापूर : प्रत्येक शासकीय-निमशासकीय कार्यालयासमोर लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे, असे फलक प्रथमदर्शनी लावण्यात येतात. ...

जयेश निरपळ

गंगापूर : प्रत्येक शासकीय-निमशासकीय कार्यालयासमोर लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे, असे फलक प्रथमदर्शनी लावण्यात येतात. तरीसुद्धा पैशाची चटक लागलेले काही लाचखोर कर्मचारी सर्वसामान्यांकडून पैशाची मागणी करीत असतात. गंगापूर तालुक्यात आठवडाभरातच तीन बडे अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने तालुका लाचखोरांचा अड्डा झाल्याचे नागरिक बोलत आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत आठवडाभरात गंगापूर तालुक्यातील तीन बडे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना लगाम कोण लावणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घाणेगाव येथील जमिनीची दोन वेगवेगळी खरेदी खते करण्यासाठी ७० हजार व सदनिका खरेदीखत करण्यासाठी १३ हजार रुपये लाच मागणारा दस्त नोंदणी उपनिबंधक औदुंबर लाटे व खासगी एजंट संजय कांबळे विरोधात २ एप्रिल रोजी एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. जांभाळा येथे मंजूर विहिरीकरिता ठराव देण्यासाठी ग्रामसेवक बबन हलगडे व सरपंच पती गणेश शेलार यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांना ९ एप्रिल रोजी एसीबीने रंगेहात पकडले, तर याच दिवशी दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत आपेगाव येथील वडिलोपार्जित जमिनीवरील 'बेकायदेशीर व्यवहार' असा पडलेला शेरा काढण्यासाठी महसूल सहायकामार्फत सव्वा लाख रुपयाच्या लाचेची मागणी करणारे तहसीलदार अविनाश शिंगोटे व सहायक अशोक मरकड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खुद्द तालुका दंडाधिकारी लाचेची मागणी करताना अडकल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. छोट्या कामासाठीदेखील 'पंटर' मार्फत लाचेची मागणी करणारी अधिकाऱ्यांची एक 'टोळीच' तालुक्यात सक्रिय असून चिरीमिरीसाठी नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील धडा शिकवला गेला पाहिजे, अशा नागरिकांच्या भावना आहेत. आठवडाभरात झालेल्या कारवाईने इतर भ्रष्ट लाचखोर अधिकारी या कारवाईमुळे सावध झाले आहेत. चांगले काम करणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांना मात्र सहकाऱ्यांच्या 'भ्रष्ट' वर्तनामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चाैकट

यामुळे लाचखोरांचे फावते

जवळपास शासकीय कार्यालयांत काेणत्या ना कोणत्या कारणासाठी लाच मागणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केल्यास आपला वेळ जातो व आपले काम प्रलंबित राहू शकते, या भीतीने अनेक नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे फावत आहे. त्यामुळे नागरिकांनी लाच मागणाऱ्यांची तक्रार दाखल करावी, असे आवाहन लाचलुचपत विभागाच्या वतीने नेहमी करण्यात येते.