शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर तालुका बनला लाचखोर अधिकाऱ्यांचा अड्डा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:04 IST

जयेश निरपळ गंगापूर : प्रत्येक शासकीय-निमशासकीय कार्यालयासमोर लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे, असे फलक प्रथमदर्शनी लावण्यात येतात. ...

जयेश निरपळ

गंगापूर : प्रत्येक शासकीय-निमशासकीय कार्यालयासमोर लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे, असे फलक प्रथमदर्शनी लावण्यात येतात. तरीसुद्धा पैशाची चटक लागलेले काही लाचखोर कर्मचारी सर्वसामान्यांकडून पैशाची मागणी करीत असतात. गंगापूर तालुक्यात आठवडाभरातच तीन बडे अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने तालुका लाचखोरांचा अड्डा झाल्याचे नागरिक बोलत आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत आठवडाभरात गंगापूर तालुक्यातील तीन बडे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना लगाम कोण लावणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घाणेगाव येथील जमिनीची दोन वेगवेगळी खरेदी खते करण्यासाठी ७० हजार व सदनिका खरेदीखत करण्यासाठी १३ हजार रुपये लाच मागणारा दस्त नोंदणी उपनिबंधक औदुंबर लाटे व खासगी एजंट संजय कांबळे विरोधात २ एप्रिल रोजी एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. जांभाळा येथे मंजूर विहिरीकरिता ठराव देण्यासाठी ग्रामसेवक बबन हलगडे व सरपंच पती गणेश शेलार यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांना ९ एप्रिल रोजी एसीबीने रंगेहात पकडले, तर याच दिवशी दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत आपेगाव येथील वडिलोपार्जित जमिनीवरील 'बेकायदेशीर व्यवहार' असा पडलेला शेरा काढण्यासाठी महसूल सहायकामार्फत सव्वा लाख रुपयाच्या लाचेची मागणी करणारे तहसीलदार अविनाश शिंगोटे व सहायक अशोक मरकड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खुद्द तालुका दंडाधिकारी लाचेची मागणी करताना अडकल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. छोट्या कामासाठीदेखील 'पंटर' मार्फत लाचेची मागणी करणारी अधिकाऱ्यांची एक 'टोळीच' तालुक्यात सक्रिय असून चिरीमिरीसाठी नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील धडा शिकवला गेला पाहिजे, अशा नागरिकांच्या भावना आहेत. आठवडाभरात झालेल्या कारवाईने इतर भ्रष्ट लाचखोर अधिकारी या कारवाईमुळे सावध झाले आहेत. चांगले काम करणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांना मात्र सहकाऱ्यांच्या 'भ्रष्ट' वर्तनामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चाैकट

यामुळे लाचखोरांचे फावते

जवळपास शासकीय कार्यालयांत काेणत्या ना कोणत्या कारणासाठी लाच मागणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केल्यास आपला वेळ जातो व आपले काम प्रलंबित राहू शकते, या भीतीने अनेक नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे फावत आहे. त्यामुळे नागरिकांनी लाच मागणाऱ्यांची तक्रार दाखल करावी, असे आवाहन लाचलुचपत विभागाच्या वतीने नेहमी करण्यात येते.