शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

उपद्रवी वानरांची टोळी पिंजऱ्यात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 17:52 IST

संपूर्ण गावाला सळो की पळो करून सोडणा-या तांदूळवाडी येथील वानराच्या टोळीस पकडण्यास आज मोठ्या प्रयत्नाने यश आले़.

ऑनलाईन लोकमत 

परभणी/सेलू : संपूर्ण गावाला सळो की पळो करून सोडणा-या तांदूळवाडी येथील वानराच्या टोळीस पकडण्यास आज मोठ्या प्रयत्नाने  यश आले़. सिल्लोड येथील समाधान गिरी आणि त्यांच्या सहका-यांनी तब्बल ५४ वानरे पिंज-यात बंद केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़. 
 
सेलू तालुक्यातील तांदूळवाडी येथे अनेक महिन्यांपासून वानरांची टोळी वास्तव्यास होती़. हळूहळू वानरांची संख्या वाढत गेली यामुळे त्यांचा उपद्रवही वाढत गेला़. पत्रावर उड्या मारल्याने अनेकांच्या घराची पत्रे वाकली़, घरातील सामानाची नासधूस तर नित्य होते. या टोळीला हाकलण्यास जावे तर ते अंगावर धावून येत त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले. यातच काही महिलांना त्यांनी चावा घेतला तर  रोहन हरकळ या मुलाच्या डोक्यात वानराने दगड मारल्याने हा मुलगा जखमी झाला़. 
 
या उपद्रवाने भयभीत झालेल्या ग्रामस्थानी शेवटी लोकवर्गणी करून सिल्लोड (जि़ औरंगाबाद) येथील वानर पकडणारे समाधान गिरी यांना पाचारण केले. यानुसार समाधान गिरी व त्यांचे तीन सहकारी आज सकाळी तांदूळवाडी येथे दाखल झाले़. गिरी व त्यांच्या टोळीने गावात ठिकठिकाणी पिंजरे लावली व नियोजन करून या वानराच्या टोळीस जेरबंद केले.
 
वानरांना बोधा अभयारण्यात सोडणार 
आम्ही पकडलेले हे वानराचे टोळके तब्बल ५४ वानरांचे आहे. आता यांना आम्ही बोधा येथील अभयारण्यामध्ये सोडणार आहोत - समाधान गिरी