शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

उपद्रवी वानरांची टोळी पिंजऱ्यात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 17:52 IST

संपूर्ण गावाला सळो की पळो करून सोडणा-या तांदूळवाडी येथील वानराच्या टोळीस पकडण्यास आज मोठ्या प्रयत्नाने यश आले़.

ऑनलाईन लोकमत 

परभणी/सेलू : संपूर्ण गावाला सळो की पळो करून सोडणा-या तांदूळवाडी येथील वानराच्या टोळीस पकडण्यास आज मोठ्या प्रयत्नाने  यश आले़. सिल्लोड येथील समाधान गिरी आणि त्यांच्या सहका-यांनी तब्बल ५४ वानरे पिंज-यात बंद केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़. 
 
सेलू तालुक्यातील तांदूळवाडी येथे अनेक महिन्यांपासून वानरांची टोळी वास्तव्यास होती़. हळूहळू वानरांची संख्या वाढत गेली यामुळे त्यांचा उपद्रवही वाढत गेला़. पत्रावर उड्या मारल्याने अनेकांच्या घराची पत्रे वाकली़, घरातील सामानाची नासधूस तर नित्य होते. या टोळीला हाकलण्यास जावे तर ते अंगावर धावून येत त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले. यातच काही महिलांना त्यांनी चावा घेतला तर  रोहन हरकळ या मुलाच्या डोक्यात वानराने दगड मारल्याने हा मुलगा जखमी झाला़. 
 
या उपद्रवाने भयभीत झालेल्या ग्रामस्थानी शेवटी लोकवर्गणी करून सिल्लोड (जि़ औरंगाबाद) येथील वानर पकडणारे समाधान गिरी यांना पाचारण केले. यानुसार समाधान गिरी व त्यांचे तीन सहकारी आज सकाळी तांदूळवाडी येथे दाखल झाले़. गिरी व त्यांच्या टोळीने गावात ठिकठिकाणी पिंजरे लावली व नियोजन करून या वानराच्या टोळीस जेरबंद केले.
 
वानरांना बोधा अभयारण्यात सोडणार 
आम्ही पकडलेले हे वानराचे टोळके तब्बल ५४ वानरांचे आहे. आता यांना आम्ही बोधा येथील अभयारण्यामध्ये सोडणार आहोत - समाधान गिरी