शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Ganesh Chaturthi 2018 :पैठणमध्ये आहे देशातील एकमेव शनिगणपती मंदिर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 15:20 IST

परीक्षा घेणारा शनिदेव व सर्व दु:ख दूर करणारा विघ्नहर्ता या दोन्ही देवता एकाच ठिकाणी विराजमान आहेत.

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : साडेसातीच्या काळात जीवनाची कठीण परीक्षा घेणारा शनिदेव व सर्व दु:ख दूर करणारा विघ्नहर्ता या दोन्ही देवता एकाच ठिकाणी विराजमान आहेत. तेही दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणमध्ये. शनिगणपतीचे हे भारतातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, गोकुळाष्टमीच्या वेळी संत एकनाथ महाराज कुलाचार याच मंदिरात करीत असत व बाजीराव पेशवे यांनीही येथे दर्शन घेऊन नंतर पालखेडची लढाई जिंकली होती. 

आतील नाथ मंदिराच्या गल्लीतून जाताना रस्त्याच्या कडेला एका बाजूला छोटेशा शनिगणपती मंदिराचे दर्शन घडते. या मंदिराला उत्तर बाजूने एक खिडकी आहे. या खिडकीतून आत पाहिले की, सर्वप्रथम शनिदेवाच्या मूर्तीचे दर्शन घडते. त्यानंतर पश्चिमेच्या मुख्य दरवाजातून गणरायाचेही दर्शन घडते. काळ्या पाषाणातील दीड फुटाची शनिदेवाची मूर्ती व पाठीमागेही काळ्या पाषाणाची साडेतीन फूट बाय तीन फुटाची चतुर्भुज श्रीगणेशाची मूर्ती आहे; मात्र शेंदूर लावल्याने ती शेंदूरवर्णीय झाली आहे. 

गणेश भगवंताला साडेसातीची बाधा होती

येथील पुजारी चंद्रकांत महेशपाठक गुरुजी यांनी सांगितले की, प्रत्यक्षात गणेश भगवंताला साडेसातीची बाधा सुरू होती. मंगलकार्यात आद्यपूजेचा मान गणपतीचा असतो; मात्र श्रीगणेशाला साडेसातीची बाधा सुरू झाली. त्यावेळी शनिदेवाने साडेसातीत आद्यपूजेचा मान मला मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. हा पुराणकथेतील संदर्भ आहे. त्यानुसारच पैठणमध्ये शनिगणपतीचे मंदिर उभे राहिले. येथे पहिले शनिदेवाची पूजा मग गणपतीची पूजा केली जाते. हे मंदिर यादवकालीन आहे. संत एकनाथ महाराज गोकुळाष्टमीच्या वेळी कुलाचार करीत असत, तेव्हा महाराज स्वत: या शनिमंदिरात येऊन कुलाचार करीत. कुलाचाराची महाराजांची परंपरा त्यांचे वंशज गोसावी परिवार पुढे चालवत आहे. देशातील हे एकमेव मंदिर असल्याचा दावाही त्यांनी केला. 

साडेसातीच्या काळात बाजीराव पेशव्यांनी घेतले दर्शन चंद्रकांत महेशपाठक गुरुजी म्हणाले की, आयुष्यात एकाही लढाईत न हरलेले बाजीराव पेशवे यांच्या साडेसातीचा काळ सुरू होता, तेव्हा त्यांना लढाईला सामोरे जावे लागले. लढाईला जाण्याआधी पैठण येथील शनिगणपतीचे दर्शन घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला होता. त्यानुसार पेशव्यांनी पैठणला येऊन शनिगणपतीचे दर्शन घेतले व नंतर त्यांनी पालखेडची लढाई जिंकली.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सवAurangabadऔरंगाबाद