शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

गायकवाड यांचा यू-टर्न

By admin | Updated: April 29, 2017 23:33 IST

लातूर : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत करण्यात आलेल्या विस्तारीकरणाला पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ खा़डॉ़ सुनिल गायकवाड व रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ लातूरमध्ये जनांदोलन सुरू आहे़

लातूर : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत करण्यात आलेल्या विस्तारीकरणाला पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ खा़डॉ़ सुनिल गायकवाड व रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ लातूरमध्ये जनांदोलन सुरू आहे़ या आंदोलना दरम्यान शनिवारी संतप्त कार्यकर्त्यांनी गांधी चौकात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले़ त्यानंतर खाग़ायकवाड यांनी नरमाईची भूमिका घेत यू-टर्न घेतला आहे़ बीदरपर्यंत गेलेली रेल्वे परत आणण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याने प्रयत्न करू, असे खा़सुनिल गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे़ लातूरची रेल्वे लातूरलाच राहण्यासाठी मी आपल्या पाठिंब्याच्या बळावर प्रयत्न करीत आहे़ ही रेल्वे बीदरला जाण्यासाठी मी कोणतेही पत्र दिले नाही़ काहीजण चुकीचा अपप्रचार करीत आहे, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी पत्रकात केले आहे़ मुंबई-लातूर रेल्वे ही लातूरकरांची ओळख आहे़ गेल्या दहा वर्षांपासून लातूर ते मुंबई या मार्गावर दीड पटीने प्रवासी घेवून धावणारी रेल्वे आता बीदरपर्यंत सोडण्यात आली आहे़ त्यामुळे लातूरच्या प्रवाशांवर अन्याय झाला आहे़ हा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे़ या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या भाजपचे खासदार डॉ़सुनिल गायकवाड यांच्यावरही यावेळी कार्यकर्त्यांनी टिका केली़ शिवाय, लातूरकरांची ओळख असलेली रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा निर्णय रद्द करावा, यासाठी रेल्वे बचाव कृती समितीच्या आंदोलन तीव्र केले जाणार आहे़ शिवाय, हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी कृती समितीकडून विशेष मोहिम राबविली जाणार आहे़ कृती समितीच्या वतीने वार्डा-वार्डात सह्यांची मोहिम राबविण्यात येणार आहे़ शिवाय, खासदारांच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला जाणार आहे़ यावेळी कृती समितीच्या वतीने मुंबई-लातूर रेल्वेचे बीदरपर्यंत करण्यात आलेले विस्तारीकरण रद्द करण्यात यावे, बीदर-कुर्ला, हैद्राबाद-पुणे व नांदेड-कुर्ला ही रेल्वे नियमित सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे़ यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, महापौर अ‍ॅड़ दिपक सूळ, उदय गवारे, शिवाजी नरहरे, पप्पू कुलकर्णी, अभिजित देशमुख, राजेंद्र बनारसे, एस़आऱ देशमुख, समद पटेल, विक्रांत गोजमगुंडे, अशोक गोविंदपूरकर, बसवंतअप्पा भरडे, रविंद्र जगताप, अ‍ॅड़ मनोहर गोमारे, सिकंदर पटेल, दिनेश गिल्डा, अल्ताफ शेख, अ‍ॅड़ देविदास बोरूळे, प्रदिप गंगणे, व्यंकटेश पूरी, मोहन माने, सुपर्ण जगताप, गोपाळ बुरबुरे, राज क्षिरसागर, प्राचार्य मधुकर मुंडे, शेखर हविले, संजय ओव्हळ, प्रा़ पानगावे, सय्यद रफिक, नगरसेविकास सपनाताई किसवे, अकबर शेख, कैलास कांबळे, सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, आसीफ बागवान, गौरव काथवटे, कांचन अजनीकर, दगडुअप्पा मिटकरी, दत्ता मस्के, प्रविण घोटाळे, रघुनाथ मदने, बालाजी सिंगापुरे, लक्ष्मीबाई बटनपूरकर, भगवान माकणे, युसूफ शेख, मोहम्मद खान, मुबश्शिर टाके आदींसह नागरिकांची उपस्थिती होती़