शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

१०० कोटींत औरंगाबाद चकाचक ! गुळगुळीत रस्ते, रंगरंगोटी, रोषणाईने सौंदर्यीकरणात ‘चार चाँद’

By मुजीब देवणीकर | Updated: February 23, 2023 20:09 IST

दरवर्षी सौंदर्यीकरणावर ५० कोटींची तरतूद हवी

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहराचा चेहरामोहराच बदलून टाकण्यात आला. अवघ्या १०० कोटी रुपयांमध्ये ही किमया महापालिकेसह विविध शासकीय कार्यालयांनी केली. महापालिकेने दरवर्षी अर्थसंकल्पात शहर सौंदर्यीकरणासाठी किमान ५० कोटींची तरतूद करायला हवी, अशी मागणी होत आहे.

राज्याच्या पर्यटनाची राजधानी असा दर्जा औरंगाबादला देण्यात आला. दरवर्षी विविध पर्यटनस्थळे पाहण्यासाठी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. पर्यटन उद्योग शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा ठरू शकतो, या दृष्टीने कधीच भरीव काम करण्यात आले नाही. जी-२० परिषदेच्या निमित्ताने दोन ते अडीच महिन्यांमध्ये शहरातील मुख्य रस्त्यांचा चेहरामोहराच बदलण्यात आला. गुळगुळीत रस्ते, दुभाजक, त्यामध्ये आकर्षक झाडे, फुले, रंगरंगोटी पाहून औरंगाबादकरांना आश्चर्य वाटू लागले. रात्री जालना रोडवरील रोषणाई शहराच्या सौंदर्यीकरणात आणखी ‘चार चाँद’ लावत आहे.

राज्य शासनाने जी-२० साठी महापालिकेला फक्त ५० कोटी दिले. त्यामध्ये ८२ कामे करण्यात आली. विमानतळापासून ते मकबऱ्यापर्यंतच्या विकास कामांचा यात समावेश आहे. फूटपाथ, दुभाजक, रस्त्याच्या कडेला झाडे, जाळी लावणे, सलीम अली सरोवराचे सौंदर्यीकरण, वाहतूक बेट आदी. कामे करण्यात आली. रात्री फिरताना आपण विदेशातील एखाद्या शहरात आल्याचा ‘फिल’ येतोय.

सा. बां. विभागसा. बां. विभागाला २० कोटींचा निधी प्राप्त झाला. सा.बां.ने जालना रोड, जळगाव रोड, व्हीआयपी रोड गुळगुळीत करून दिले. याशिवाय अन्य बरीच छोटी-छोटी कामे या विभागाकडून करण्यात आली.

पर्यटन विभागाचा निधीराज्याच्या पर्यटन विभागाने विविध पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी तब्बल १६ कोटींचा निधी दिला. स्थानिक पर्यटन विभागाकडून ही कामे करण्यात आली.

रस्ते विकास महामंडळरस्ते विकास महामंडळाने त्यांच्याकडील किमान ५ कोटी रुपये शहर सौंदर्यीकरणासाठी खर्च केले. जी-२० मध्ये या विभागाचाही मोठा हातभार लागला.

महावितरणची भूमिकामहावितरणची भूमिका जी-२० मध्ये महत्त्वाची ठरली. कोट्यवधी रुपये खर्च करून रंगरंगोटी, रस्ते, फूटपाथ केल्यावर उघड्या डी.पी. आणि रस्त्यात अडसर ठरणारे विजेचे पोल त्रासदायक ठरत होते. पोलवर रंगरंगोटी, डी.पी.ला चारही बाजूने आवरण इ. कामांवर १ कोटी ७५ लाख रुपये खर्च झाले. हा निधी मनपा देणार आहे.

शहर सुंदर दिसू लागलेशहर सौंदर्यीकरणासाठी दोन ते तीन महिन्यांपासून नियोजन सुरू होते. विविध शासकीय कार्यालयांनी, राज्य शासनाने सढळ हाताने मदत केली. त्यामुळे शहर स्वच्छ, सुंदर दिसतेय.- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी.

मनपा अर्थसंकल्पात तरतूद करावीसामान्य माणूस म्हणताेय, शहर सुधारलं. एका महिलेने सोशल मीडियावर म्हटले, मला जी-२० माहीत नाही. मात्र, जी-२० दरदोन वर्षांनी शहरात व्हावे. उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. मनपाने दरवर्षी ५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करावी.- मुकुंद कुलकर्णी, उद्योजक.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका