शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ई-कॉमर्स, एमएसएमईत औरंगाबादला आगामी काळात भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 17:50 IST

एमएसएमईला विस्तारण्याच्या संधी

ठळक मुद्देचीनमधील मराठी उद्योजकांशी संवाद चीनने केलेल्या उपाययोजनांबाबत उद्योजकांना माहिती

औरंगाबाद : एमएसएमई (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक), ई-कॉमर्स सेवेमध्ये औरंगाबादला आगामी काळात भविष्य आहे. सेवा, सुरक्षा, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगसह आॅटोमेशनवर भर देऊन उद्योजकांना पुढे जाता येईल. आयात आणि निर्यातीला चार-सहा महिन्यांनंतर चांगली सुरुवात होईल, अशी अपेक्षा चीनमधील मराठी उद्योजकांनी औरंगाबादमधील उद्योजकांशी शुक्रवारी वेबिनारद्वारे संवाद साधताना व्यक्त केली. 

कोरोनामुळे पूर्ण जग बदलले असून, प्रत्येकाला कोरोनानंतर जग कसे असेल आणि उद्योग, व्यापार, दळणवळण याची चिंता लागून राहिलेली आहे. या सगळ्या संसर्गमय  वातावरणातून बाहेर पडण्यासाठी चीनने काय उपाययोजना केल्या. याबाबत चीनमध्ये स्थित असलेले औरंगाबादचे उद्योजक समीर डोरले आणि नागपूरमधील अमित वायकर यांनी औरंगाबादमधील ७० हून अधिक उद्योजकांशी वेबिनारद्वारे संवाद साधला. 

सीआयआयच्या मराठवाडा झोनचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, रमण अजगावकर, रवींद्र कोंडेकर, रोहित दाशरथे यांच्या वतीने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. ‘लॉकडाऊन आणि चीनचे अनुभव’ या विषयावर या वेबिनारमध्ये येथील उद्योजकांना डोरले आणि वायकर यांनी मार्गदर्शन केले. कोरोनामुळे नवीन गुंतवणूक, ग्राहकांची खरेदी-विक्री, आयात-निर्यात ठप्प आहे त्यामुळे आगामी सहा ते आठ महिने उद्योगांसाठी कसे असतील याबाबत चीनने केलेल्या उपाययोजनांवर दोघांनाही माहिती दिली. उत्पादनाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंंग पाळावे लागेल. उद्योगांचे ले-आऊट यापुढे बदलावे लागेल, चीनऐवजी इतर देशांतून आयात करण्याच्या संधी कशा निर्माण होतील, यासाठी येथील एमएसएमईने पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

चीन सरकार सकारात्मक असून, उद्योगांना वीज आणि करसवलती जाहीर केल्या आहेत. आॅटोमेशनवर कंपन्यांनी उत्पादन वाढविले आहे. मार्केटिंग, वितरण, ग्राहकसेवा, पुरवठा या धोरणांवर चीनने लक्ष केंद्रित केल्याचे डोरले यांनी सांगितले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, गुजरात या राज्यांतील ग्राहक बाजारपेठ मोठी आहे. ही बाजारपेठ नजरेसमोर ठेवून सरकार आणि उद्योजकांना धोरणात्मक काम करावे लागेल, अशी अपेक्षा या वेबिनारमधून व्यक्त झाली. 

सर्व काही हळूहळू पूर्वपदावर येईल वाहतूक, पर्यटन, सार्वजनिक वाहतूक या सेवा हळूहळू पूर्वपदावर येतील. आयात- निर्यात पूर्वपदावर येण्यास थोडा उशीर लागणार आहे. इनोव्हेशनवर भर देण्याचा यापुढे सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. चीनमधील बीअर कंपन्यांनी इम्युनिटी वाढविणारी नॉनअल्कोहोलिक चार उत्पादने लॉकडाऊनमध्ये आणली, तसेच हळद आणि मसाल्यांची आयात वाढविली. ग्राहक वाढण्यासाठी कूपन सेवा, कोरोनावर विजय मिळविला म्हणून रिव्हेंज टुरिझमला चालना दिल्याची उदाहरणे डोरले आणि वायकर यांनी सांगितली. 

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद