शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

ई-कॉमर्स, एमएसएमईत औरंगाबादला आगामी काळात भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 17:50 IST

एमएसएमईला विस्तारण्याच्या संधी

ठळक मुद्देचीनमधील मराठी उद्योजकांशी संवाद चीनने केलेल्या उपाययोजनांबाबत उद्योजकांना माहिती

औरंगाबाद : एमएसएमई (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक), ई-कॉमर्स सेवेमध्ये औरंगाबादला आगामी काळात भविष्य आहे. सेवा, सुरक्षा, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगसह आॅटोमेशनवर भर देऊन उद्योजकांना पुढे जाता येईल. आयात आणि निर्यातीला चार-सहा महिन्यांनंतर चांगली सुरुवात होईल, अशी अपेक्षा चीनमधील मराठी उद्योजकांनी औरंगाबादमधील उद्योजकांशी शुक्रवारी वेबिनारद्वारे संवाद साधताना व्यक्त केली. 

कोरोनामुळे पूर्ण जग बदलले असून, प्रत्येकाला कोरोनानंतर जग कसे असेल आणि उद्योग, व्यापार, दळणवळण याची चिंता लागून राहिलेली आहे. या सगळ्या संसर्गमय  वातावरणातून बाहेर पडण्यासाठी चीनने काय उपाययोजना केल्या. याबाबत चीनमध्ये स्थित असलेले औरंगाबादचे उद्योजक समीर डोरले आणि नागपूरमधील अमित वायकर यांनी औरंगाबादमधील ७० हून अधिक उद्योजकांशी वेबिनारद्वारे संवाद साधला. 

सीआयआयच्या मराठवाडा झोनचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, रमण अजगावकर, रवींद्र कोंडेकर, रोहित दाशरथे यांच्या वतीने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. ‘लॉकडाऊन आणि चीनचे अनुभव’ या विषयावर या वेबिनारमध्ये येथील उद्योजकांना डोरले आणि वायकर यांनी मार्गदर्शन केले. कोरोनामुळे नवीन गुंतवणूक, ग्राहकांची खरेदी-विक्री, आयात-निर्यात ठप्प आहे त्यामुळे आगामी सहा ते आठ महिने उद्योगांसाठी कसे असतील याबाबत चीनने केलेल्या उपाययोजनांवर दोघांनाही माहिती दिली. उत्पादनाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंंग पाळावे लागेल. उद्योगांचे ले-आऊट यापुढे बदलावे लागेल, चीनऐवजी इतर देशांतून आयात करण्याच्या संधी कशा निर्माण होतील, यासाठी येथील एमएसएमईने पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

चीन सरकार सकारात्मक असून, उद्योगांना वीज आणि करसवलती जाहीर केल्या आहेत. आॅटोमेशनवर कंपन्यांनी उत्पादन वाढविले आहे. मार्केटिंग, वितरण, ग्राहकसेवा, पुरवठा या धोरणांवर चीनने लक्ष केंद्रित केल्याचे डोरले यांनी सांगितले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, गुजरात या राज्यांतील ग्राहक बाजारपेठ मोठी आहे. ही बाजारपेठ नजरेसमोर ठेवून सरकार आणि उद्योजकांना धोरणात्मक काम करावे लागेल, अशी अपेक्षा या वेबिनारमधून व्यक्त झाली. 

सर्व काही हळूहळू पूर्वपदावर येईल वाहतूक, पर्यटन, सार्वजनिक वाहतूक या सेवा हळूहळू पूर्वपदावर येतील. आयात- निर्यात पूर्वपदावर येण्यास थोडा उशीर लागणार आहे. इनोव्हेशनवर भर देण्याचा यापुढे सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. चीनमधील बीअर कंपन्यांनी इम्युनिटी वाढविणारी नॉनअल्कोहोलिक चार उत्पादने लॉकडाऊनमध्ये आणली, तसेच हळद आणि मसाल्यांची आयात वाढविली. ग्राहक वाढण्यासाठी कूपन सेवा, कोरोनावर विजय मिळविला म्हणून रिव्हेंज टुरिझमला चालना दिल्याची उदाहरणे डोरले आणि वायकर यांनी सांगितली. 

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद