शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याशी फारकत : आंदोलने कंपनीच्या आवारातअ

By admin | Updated: December 9, 2014 01:01 IST

ौरंगाबाद : पाणीपुरवठा आणि मनपाचा काहीही संबंध नाही, नागरिकांनी पाणीपुरवठ्याशी निगडित तक्रारी, आंदोलने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या आवारात करावीत.

ौरंगाबाद : पाणीपुरवठा आणि मनपाचा काहीही संबंध नाही, नागरिकांनी पाणीपुरवठ्याशी निगडित तक्रारी, आंदोलने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या आवारात करावीत. यासाठी मनपा प्रभाग अधिकारी विभागप्रमुखांना पत्र देण्याच्या तयारीत आहेत. या शिवाय आंदोलकांनी यापुढे मनपा कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली, तर त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्याची परवानगीदेखील वरिष्ठांकडून मागण्यात येणार आहे. १ सप्टेंबरपासून शहरातील पाणीपुरवठ्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे आहे. त्यामुळे मनपाचा पाणीपुरवठ्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. नागरिकांनी मनपा कार्यालयाच्या आवारात आंदोलने केली तरी कार्यालय बंद करणे, साहित्याची तोडफोड करण्याची गरजच नाही. नागरिकांनी त्यांच्या मागण्या, तक्रारी, आंदोलने ही कंपनीचे मुख्य कार्यालय, कॉल सेंटरवर केली पाहिजेत, असा सूर अधिकाऱ्यांनी आज आळविला. नाव न सांगण्याच्या अटीवर एका प्रभाग अधिकाऱ्याने सांगितले की, यापुढे पाण्यासाठी आमच्या प्रभाग कार्यालयात आंदोलन झाले, तर नागरिकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यात येईल. नागरिकांनी कंपनीकडे आपले गाऱ्हाणे केले पाहिजे.कंपनीकडे तक्रारी केल्या तर तातडीने काम होत नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत. दुसरीकडे मनपातील अधिकारी पाणीपुरवठ्याप्रकरणी हात वर करीत आहेत. टँकरने पाणीपुरवठा होण्यासाठी पैसे कुठे भरायचे, या प्रकरणीदेखील कंपनीचे अधिकारी उपलब्ध नाहीत. पाणीपुरवठा न झाल्यास काय करायचे, दूषित पाणी आल्यावर कुणाकडे तक्रार करायची, याबाबत दाद कुणाकडे मागावी असा नागरिकांचा सवाल आहे.