शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

कसाब यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

By admin | Updated: May 7, 2014 00:29 IST

बदनापूर : नानेगाव येथील सरपंच मनोज कसाब यांच्या पार्थिवावर गावात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बदनापूर : नानेगाव येथील सरपंच मनोज कसाब यांच्या पार्थिवावर गावात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी मनोज कसाब यांच्या निधनाची वार्ता कळताच गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. पोलिस प्रशासनाने लगेचच या गावात मोठा बंदोबस्त वाढविला. संतप्त नातेवाईकांनी कसाब यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेल्यानंतर खळबळ उडाली. सर्व आरोपींना अटक करावी, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. यावेळी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अटकही करण्यात आली असल्याची माहिती दिल्यानंतर कसाब यांचा पार्थिव गावी आणण्यात आला. सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंंह, माजी मंत्री गंगाधर गाडे, रिपाइंचे नेते अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, मातंग मुक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक साबळे, भारिप बहुजन महासंघाचे सुधाकर निकाळजे, सुधाकर रत्नपारखे, मुकुंद सोनवणे, एन. डी. गायकवाड, बदनापूरचे सरपंच राजन मगरे, केळीगव्हाणचे राहुल तुपे आदी उपस्थित होते. कसाब यांच्या कुटुंबियांना २५ लाख रूपये आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे व हा खून खटला चालविण्याकरीता अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.सन २०१० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनोज कसाब हे राखीव जागेवर विजयी झाले होते. त्यानंतर ९ ग्रा.पं. सदस्य असलेल्या सरपंच पदाकरीता त्यांची निवड झाली. मनोज हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, ६ भाऊ, २ बहिणी असा मोठा परिवार आहे. (प्रतिनिधी)