शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

एसआरएफ निधीची घातली सांगड

By admin | Updated: July 4, 2014 00:15 IST

चेतन धनुरे , लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने बनवेगिरी उघड होण्याच्या शक्यतेने एसआरएफच्या निधीची कशीबशी सांगड घातल्याचाही आरोप केला जात आहे़

चेतन धनुरे , लातूरजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने बनवेगिरी उघड होण्याच्या शक्यतेने एसआरएफच्या निधीची कशीबशी सांगड घातल्याचाही आरोप केला जात आहे़ अगदी ५०० मीटर अंतराच्या कामालाही १५ लाख रुपयांचा निधी तर ३ किमी अंतराच्या कामालाही १५ लाख रुपये खर्च झाल्याचे बांधकाम विभागानेच दिलेल्या माहितीतून समोर आले आहे़ई-निविदा प्रक्रियेपासून लांब राहत मर्जीतील गुत्तेदारांना काम मिळावे यासाठी केवळ १ किमी अंतराचेही चार-चार तुकडे पाडून त्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी खर्चण्यात आले आहेत़ इतकेच नव्हे तर आता गेल्या आर्थिक वर्षात एसआरएफअंतर्गत प्राप्त झालेल्या जवळपास १४ कोटी ८७ लाख रुपयांचाही कसाबसा मेळ घालण्यात आल्याचे दिसून येत आहे. एकिकडे वित्त विभागाने १६० रस्ते कामांची बिले काढली आहेत. तर बांधकाम विभागाने दिलेल्या यादीनुसार १०८ कामेच झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मग या दोन विभागांपैकी खरी माहिती कोणाची, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. याची तपासणी होऊन चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणीही सभागृहात करण्यात आली होती. दरम्यान, बांधकाम विभागाने दिलेल्या रस्ते कामांच्या यादीतही बराचसा गोलमाल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. १४ कोटींहून अधिक निधीची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यादीतून स्पष्टपणे दिसत आहे. एकिकडे १, १.५, २ तसेच अगदी ३ किलोमीटरपर्यंतच्या कामांनाही १५ लाख रुपयेच खर्च दाखविण्यात आला आहे. दुसरीकडे अवघ्या ५००, ६००, ६५० मीटर्स रस्ता सुधारण्याच्या कामासाठीही १५ लाख रुपयेच लागल्याचे बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सरफराजपूर-उमरदरा-हलकी या ६५० मीटर अंतराच्या कामासाठी १५ लाख रुपये, औसा तालुक्यातील समदर्गा ते कोरंगळा या ५०० मीटर अंतराच्या कामासाठी १५ लाख रुपये तसेच पानचिंचोली- दगडवाडी-भंगेवाडी-किनीथोट या ५०० मीटर अंतराच्या कामासाठीही १५ लाख रुपये खर्च झाल्याचे बांधकाम विभाग सांगत आहे. दुसरीकडे रेणापूर तालुक्यातील सांगली-अंदलगाव या ३ किलोमीटर अंतराच्या कामासाठी १५ लाख रुपयेच खर्च आला आहे. म्हणजेच ५०० मीटर अंतराच्या कामासाठी १५ लाख रुपये लागत असतील, तर ३ किलोमीटर अंतराच्या कामाला हा खर्च कसा वाढला नाही, तो १५ लाख रुपयेच कसा राहिला, असे प्रश्नही निर्माण होत आहेत. एकंदरितच, एसआरएफच्या निधीची कशीबशी सांगड घातल्याचेच निदर्शनास येत आहे.३ किलोमीटर अंतराच्या रस्ते सुधारणा कामासाठी जर १५ लाख रुपये लागतात, तर ५०० मीटर अंतरासाठी १५ लाख रुपयांची आवश्यकता कशी लागते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर ३ कि.मी. अंतरावर खड्डे बुजवून डागडुजी करण्यात आल्याचे सांगण्यात येणार असेल, तर एसआरएफच्या निधीतून हे काम करता येत नाही. त्यासाठी गट-ब मधून शासनाची स्वतंत्र तरतूद असल्याचे भाजपा गटनेते रामचंद्र तिरुके यांनी सांगितले. त्यामुळे ही बनवाबनवीच असल्याचे आणखी स्पष्ट झाल्याचेही ते म्हणाले.