शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भरधाव टँकरने दुचाकीस्वाराला चिरडले, सिग्नल न पाळल्याने बेतले जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 16:55 IST

पिवळ्या सिग्नलमध्येच पुढे जाण्याच्या घाई एका दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. देवळाईकडून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी घाईत रस्ता ओलांडणा-या दुचाकीस्वाराला सुसाट निघालेल्या आॅईलच्या टँकरने चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालकाच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्यानंतर तो जागीच ठार झाला.

औरंगाबाद, दि. ८ : पिवळ्या सिग्नलमध्येच पुढे जाण्याच्या घाई एका दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. देवळाईकडून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी घाईत रस्ता ओलांडणा-या दुचाकीस्वाराला सुसाट निघालेल्या आॅईलच्या टँकरने चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालकाच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्यानंतर तो जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी १.२० वाजेच्या सुमारास देवळाई चौकात घडली.

दिलीप विठ्ठलराव गलधर(वय ५०,रा. घारेगाव, ता. औरंगाबाद)असे मृताचे नाव आहे. याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत दिलीप गलधर हे रविवारी दुपारी देवळाईकडून शहराकडे मोटारसायकलने (एमएच-२०बीएन १७६२)जात होते. दुपारी १.२० वाजेच्या सुमारास देवळाई चौकातील वाहतुक दिवा ग्रीनवरून पिवळा झाला. यावेळी गलधर हे वेगात निघाले. त्याचवेळी झाल्टा फाट्याकडून महानुभाव आश्रम चौकीकडे निघालेल्या टँकरसह अन्य वाहने (एमएच-२०डीई ७०७२) पुढे जाण्यासाठी वेगात निघाले. अर्ध्या रस्त्यावर आलेले असताना एका ट्रकचालकाने त्यांना वाचविले मात्र पुढच्या टँकरने त्यांना चिरडले. 

या भीषण घटनेत गलधर यांच्या डोक्यावरील हेल्मेटचा चुरडा होऊन त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यातच टॅँकरचालकाने त्यांना सुमारे आठ ते दहा फुट फरपटत नेले. यामुळे गलधर हे जागीच ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच देवळाई चौकीतील पोहेकॉ एन.के. ब-हाटे, सातारा ठाण्याचे चार्ली पोलीस, वाहतूक शाखेचे सुरेश तारो, ज्ञानदेव डिघुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांची गाडी आणि अ‍ॅम्ब्युलन्स बोलविण्यात आली.  मात्र तत्पूर्वीच लोकांनी गलधर यांना घटनास्थळावरून रुग्णालयातून हलविले. याप्रकरणी सातारा ठाण्यात नोंद करण्यात आली.