शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

भरधाव टँकरने दुचाकीस्वाराला चिरडले, सिग्नल न पाळल्याने बेतले जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 16:55 IST

पिवळ्या सिग्नलमध्येच पुढे जाण्याच्या घाई एका दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. देवळाईकडून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी घाईत रस्ता ओलांडणा-या दुचाकीस्वाराला सुसाट निघालेल्या आॅईलच्या टँकरने चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालकाच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्यानंतर तो जागीच ठार झाला.

औरंगाबाद, दि. ८ : पिवळ्या सिग्नलमध्येच पुढे जाण्याच्या घाई एका दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. देवळाईकडून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी घाईत रस्ता ओलांडणा-या दुचाकीस्वाराला सुसाट निघालेल्या आॅईलच्या टँकरने चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालकाच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्यानंतर तो जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी १.२० वाजेच्या सुमारास देवळाई चौकात घडली.

दिलीप विठ्ठलराव गलधर(वय ५०,रा. घारेगाव, ता. औरंगाबाद)असे मृताचे नाव आहे. याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत दिलीप गलधर हे रविवारी दुपारी देवळाईकडून शहराकडे मोटारसायकलने (एमएच-२०बीएन १७६२)जात होते. दुपारी १.२० वाजेच्या सुमारास देवळाई चौकातील वाहतुक दिवा ग्रीनवरून पिवळा झाला. यावेळी गलधर हे वेगात निघाले. त्याचवेळी झाल्टा फाट्याकडून महानुभाव आश्रम चौकीकडे निघालेल्या टँकरसह अन्य वाहने (एमएच-२०डीई ७०७२) पुढे जाण्यासाठी वेगात निघाले. अर्ध्या रस्त्यावर आलेले असताना एका ट्रकचालकाने त्यांना वाचविले मात्र पुढच्या टँकरने त्यांना चिरडले. 

या भीषण घटनेत गलधर यांच्या डोक्यावरील हेल्मेटचा चुरडा होऊन त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यातच टॅँकरचालकाने त्यांना सुमारे आठ ते दहा फुट फरपटत नेले. यामुळे गलधर हे जागीच ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच देवळाई चौकीतील पोहेकॉ एन.के. ब-हाटे, सातारा ठाण्याचे चार्ली पोलीस, वाहतूक शाखेचे सुरेश तारो, ज्ञानदेव डिघुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांची गाडी आणि अ‍ॅम्ब्युलन्स बोलविण्यात आली.  मात्र तत्पूर्वीच लोकांनी गलधर यांना घटनास्थळावरून रुग्णालयातून हलविले. याप्रकरणी सातारा ठाण्यात नोंद करण्यात आली.