शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

संगणक परिचालकांचा मोर्चा

By admin | Updated: March 26, 2015 00:56 IST

लातूर : महा- आॅनलाईन कंपनीने संगणक परिचालकांवर अन्यायच केला आहे. मानधन देण्यास चालढकल तसेच नियमित मानधन न देणे असे प्रकार सुरू आहेत

लातूर : महा- आॅनलाईन कंपनीने संगणक परिचालकांवर अन्यायच केला आहे. मानधन देण्यास चालढकल तसेच नियमित मानधन न देणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे ई-पंचायत धोरणाला गालबोट लागत आहे. त्यामुळे कंपनीसोबतचा करार रद्द करून संगणक परिचालकांना जिल्हा परिषदेच्या सेवेत घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत संगणक परिचालक कामगार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर बुधवारी मोर्चा काढण्यात आला.लातूर जिल्ह्यात ७८७ ग्रामपंचायतींमध्ये ६५० संगणक परिचालक काम करतात. ग्रामपंचायतींचे आॅनलाईन कामकाज याच संगणक परिचालकांवर आहे. मात्र आॅनलाईन कंपनी या परिचालकांचे मानधन नियमित देत नाही. मागील तीन वर्षांपासूनचे मानधन थकित आहे. तसेच इंटरनेटचे बिलही तीन वर्षांपासून थकित आहे. त्यामुळे ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. महा-आॅनलाईन कंपनीसोबतचा करार शासनाने रद्द करून ग्रामपंचायत संगणक परिचालक कामगारांना जिल्हा परिषदेच्या सेवेत घ्यावे, अशी मागणी परिचालक कामगार संघटनेच्या वतीने जि.प.च्या सीईओंकडे करण्यात आली आहे. २३ मार्चपासून काम बंद आंदोलन आहे. बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर पार्क येथून निघालेला मोर्चा दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेवर धडकला. यावेळी सीईओंना आंदोलकांनी निवेदन दिले. या आंदोलनात शिवशंकर सोमवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, प्रदीप माने, विशाल लांडगे आदी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी) ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या कारभारात सुसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ई-पंचायत अंतर्गत संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) हा प्रकल्प चालू करण्यात आला. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर राज्यात २७ हजार संगणक परिचालकांची कंत्राटी नियुक्ती केली. परंतु, या परिचालकांच्या मानधनातून महा-आॅनलाईन कंपनीने आतापर्यंत ४५० कोटी रुपये हडप केले, असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.